शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Pune: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी बिबट्याच्या पिंजऱ्यात अन्नत्याग आंदोलन, प्रशासनाची धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 17:11 IST

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख दत्ता गांजाळे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते....

मंचर (पुणे) : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मागील पाच दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख दत्ता गांजाळे यांच्या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे त्यांनी चक्क आज चांडोली येथे बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात बसून अन्नत्याग आंदोलन सुरू केले. त्यानंतर प्रशासनाची धावपळ उडाली. तहसीलदार, वन विभागाचे अधिकारी यांनी शेतावर जाऊन दत्ता गांजाळे यांच्या मागण्या समजावून घेत आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतले.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख दत्ता गांजाळे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. त्यासाठी मंचर शहराच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंडप टाकून मागील पाच दिवस त्यांचे आंदोलन सुरू होते. अनेक संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला; मात्र प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे गांजाळे यांनी आज अभिनव आंदोलन केले. चांडोली बुद्रुक गावच्या हद्दीतील बेलदत्तवाडी येथील संतोष बाजीराव थोरात यांच्या उसाच्या शेतालगत पंधरा दिवसांपूर्वी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे.

आज सकाळी दत्ता गांजाळे यांनी पिंजऱ्यात बसून अन्नत्याग आंदोलन सुरू केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मी लढा देत आहे. बिबट्याने मला खाल्ले तरी काही हरकत नाही; मात्र आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी केला. प्रशासनाला ही माहिती समजताच तहसीलदार संजय नागटिळक, वनपरिक्षेत्राधिकारी स्मिता राजहंस, जलसंपदा विभागाचे दत्ता कोकणे, पोलिस कर्मचारी यांनी पिंजरा ठेवलेल्या ठिकाणी धाव घेतली. यावेळी प्रशासनाच्या वतीने गांजाळे यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यांच्या मागण्या समजावून घेण्यात आल्या व शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर तहसीलदार संजय नागटिळक यांच्या हातून नारळ पाणी पीत दत्ता गांजाळे यांनी अन्नत्याग आंदोलन समाप्त केले.

याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर, मंचर शहराध्यक्ष विकास जाधव, ज्येष्ठ नेते अरुण नाना बाणखेले, रंगनाथ थोरात, वनपाल शशिकांत मडके आदी उपस्थित होते. आगामी काळात मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुन्हा अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा गांजाळे यांनी दिला आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, जलसंपदा विभागाने वाढीव पाणीपट्टी वसूल करू नये, बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पशुधनाची नुकसान भरपाई मिळावी, बिबट प्रवण क्षेत्रात दिवसा वीज द्यावी तसेच पिंजऱ्यांची संख्या वाढवून प्रत्येक गावात जनजागृती करावी. वीज बिल माफी मिळावी. मोजणीची कामे तसेच तहसील कार्यालयातील कामे जलदगतीने व्हावीत आदी विविध मागण्यांसाठी दत्ता गांजाळे यांनी हे अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. चांडोली येथील बेलदत्तवाडीत संतोष थोरात यांच्या शेतालगत चार ते पाच बिबटे व दोन पिल्ले यांचा वावर असल्याने पंधरा दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता. अन्नत्याग आंदोलन करण्यासाठी हेच ठिकाण गांजाळे यांनी निवडले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड