शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

भाव नसल्याने कांदा, टोमॅटो सडतोय, शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 03:00 IST

कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आला असून, साठवलेला कांदा सडू लागल्याने हा कांदा फेकून द्यायची पाळी शेतक-यांवर आली आहे.

राजुरी - कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आला असून, साठवलेला कांदा सडू लागल्याने हा कांदा फेकून द्यायची पाळी शेतक-यांवर आली आहे.जुन्नर तालुक्यात गेल्या वर्षी अतिशय मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाली होती. कारण एक-दीड वर्षापूर्वी कांद्याला जवळजवळ किलोला चाळीस ते पन्नास रुपये बाजारभाव मिळत होता. त्यामुळे कांद्याला चांगल्या प्रतीचा बाजारभाव मिळेल या आशेने मोठ्या प्रमाणात लागवड झाली होती. परंतुगेल्या वर्षापासून कांद्याला किलोमागे दोन ते तीन रुपये असा बाजारभाव मिळत आहे.इतका कमी बाजारभाव मिळत असल्याने कांद्याच्या पिकाचा झालेला खर्चसुद्धा निघत नसल्याने भविष्यात कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल या आशेने कांदा बराकीत साठवून ठेवला होता. सध्या कांद्याला किलोमागे सहा ते सात रुपये बाजारभाव आहे.कांद्याला बाजारभाव वाढत नसल्याने हा साठवून ठेवलेला कांदा विक्रीसाठी काढण्यात आला. परंतु शेतकºयांनी जो कांदा साठवून ठेवला आहे तो कांदा पूर्णपणे सडलेला आहे.-तालुक्याच्या पूर्व भागातील बोरी बुद्रुक या गावातील एका शेतकºयाने जवळजवळ पाचशे गोणी भरतील इतका कांदा साठवून ठेवला होता.-त्यांनी हा कांदा आता विक्रीसाठी काढला असता त्यांच्या पाचशे गोणींपैकी फक्त शंभर गोणी चांगल्या निघाल्या असून, त्यांच्या चारशे गोणी भरतील इतका कांदा सडलेला निघाला आहे.-हा सडलेला कांदा टाकायचा कुठे? तर त्यांनी हा कांदा त्याच्या शेतात पांगून दिला आहे. त्यातच या वर्षी नवीन कांदा बाजारात आला असून याही कांद्याला कमी बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.मांजरी उपबाजारात शेतकºयांनी काही टन भाजीपाला दिला फेकूनमांजरी : मांजरी बुद्रुक येथील पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अण्णासाहेब मगर उपबाजारात दलालांचा हस्तक्षेप वाढला आहे. दुबार बाजारामुळे शेतकºयांच्या भाजीपाल्याला भाव मिळत नाही. मार्केट प्रशासनाला वारंवार ही बाब लक्षात आणून दिल्यानंतरही यात फरक पडत नसल्याचे पाहून आज शेतकºयांनी काही टन भाजीपाला फेकून देऊन बाजार समिती प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे.शेतात दिवसरात्र काबाडकष्ट करून पिकवला जाणारा शेतमाल दलाल व व्यापाºयांच्या दुष्टचक्रात अडकून योग्य भाव व नफा कधीच शेतकºयापर्यंत पोहोचत नाही. त्याच वेळी भेसळयुक्त माल ग्राहकाच्या माथी चढ्या किमतीत मारला जातो.शेतकºयांच्या मालाला योग्य भाव मिळावा व ग्राहकांनाही शुद्ध व चांगल्या प्रतीचा भाजीपाला मिळावा, हा हेतू समोर ठेवून पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीने मांजरी बुद्रुक येथे अण्णासाहेब मगर उपबाजार सुरू केला आहे. शेतकरी ते थेट ग्राहक असा बाजार येथे होणे अपेक्षित आहे, मात्र गेल्या काही महिन्यांपासून प्रत्येक भाजीपाल्यात दलाल (मध्यस्थ) वाढले आहेत. त्यामुळे मूळ शेतकºयांना त्यांनी विक्रीस आणलेल्या भाजीपाल्याला भाव मिळत नाही. व्यापारी आणि माल घेणारे यांची साखळी तयार होत असल्याने शेतकºयांना संध्याकाळपर्यंत ग्राहक मिळत नाहीत. त्यामुळे एक अतिशय कमी भावाने किंवा उधारीवर शेतीमाल विकावा लागत आहे. येथे व्यापारीवर्गाचा वाढलेला सुळसुळाट आणि शेतकºयांची होणारी पिळवणूक याबाबत बाजार समितीच्या प्रशासनाला वारंवार कळवूनही त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे आज त्रासलेल्या शेतकºयांनी आपला शेतीमाल फेकून दिला, असे बाजार समितीत आलेल्या शेतकºयांनी सांगितले.व्यापारी लोक बाहेरून वेगवेगळ्या ठिकाणचा माल गोळा करून मार्केटमध्ये विक्रीस आणतात, त्या जादा मालामुळे बाजारभावात तफावत निर्माण होते. व्यापारी रोज मार्केटमध्ये माल आणतो. तसा शेतकरी दिवसाआड माल आणतो. तसेच व्यापाºयांना शेतमाल विक्रीस परवानगी नाही. त्यामुळे बाजार समितीने अशा घुसखोर व्यापाºयांवर निर्बंध आणले पाहिजेत, येत्या काही दिवसांत त्यांच्यावर निर्बंध आणले नाही तर मोठे आंदोलन करण्यात येईल.- अशोक आव्हाळे, शेतकरी, मांजरी खुर्दमांजरी उपबाजारात पूर्व हवेलीतून तर माल येतोच, परंतु दौंड, बारामती, श्रीगोंदा या ठिकाणाहून पण शेतमाल विक्रीस येतो. बाजार समितीने माल विक्रीस शेतकºयांसाठी खुला केला आहे, परंतु काही व्यापारी शेतकºयांकडूनच शेतात जाऊन माल खरेदी करतात व मार्केटमध्ये विक्रीस आणतात, त्यामुळे आपण त्यांना कसे रोखू शकतो? यासाठी सचिवांशी आमची चर्चा झाली आहे. लवकरच यावर तोडगा काढला जाईल.-देविदास शेवाळे, विभागप्रमुख अण्णासाहेब मगर उपबाजार समिती, मांजरी

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीagricultureशेतीMarketबाजार