शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

पुणे-औरंगाबाद रस्ता हस्तांतरण प्रक्रिया रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:12 IST

महामार्गावरील वाहतूककोंडी कधी सुटणार : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे वर्ग केल्याची केली होती घोषणा भाग - १ पुणे : राज्य ...

महामार्गावरील वाहतूककोंडी कधी सुटणार : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे वर्ग केल्याची केली होती घोषणा

भाग - १

पुणे : राज्य सरकारकडून २०१७ साली पुणे-औरंगाबाद महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (भारतमाला) वर्ग केल्याची घोषणा करण्यात आली होती. तसेच, रस्त्याला ५५३ (एफ) असा क्रमांकही देण्यात आला. मात्र, चार वर्षे होत आली तरी रस्त्याची हस्तांतरण प्रक्रियाच झाली नसल्याची माहिती समोर आले आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. सध्या या रस्त्यावर खराडी बायपास ते शिक्रापूर या २५ किलोमीटरवर रस्ता रुंदीकरण सुरू आहे.

पुणे-अहमदनगर-औरंगाबाद असा २३५ किलोमीटर रस्ता हा आठ पदरी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या रस्त्यावर आता यापुढे फक्त राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे काम करणार असल्याची माहिती देण्यात आली. यासाठी अहमदनगर येथे मध्यवर्ती कार्यालय देखील सुरू करण्यात आले आहे. मात्र, राज्य सरकार आणि प्राधिकरण यांच्यात पुढील कार्यवाही करण्यासाठी बैठकच झाली नाही. त्यामुळे ही प्रक्रिया रखडल्याचे अधिकाऱ्यांनी ''लोकमत''ला सांगितले. त्यामुळे हा महामार्ग हस्तांतरण कधी होणार आणि प्रत्यक्ष काम केव्हा सुरू होणार, असा प्रश्न वाहनचालक तसेच स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.

सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रामवाडी (चंदननगर) ते शिक्रापूर असा २५ किलोमीटरवर रस्तारुंदीकरण करण्यात येत आहे. राज्य शासनाने यासाठी ३ मे २०२० ला २१९ कोटी रुपये मंजूर करून काम सुरू देखील झाले आहे. या कामासाठी २ मे २०२२ पर्यंतची म्हणजे एकूण दोन वर्षांची मुदत दिली आहे. मात्र लोणीकंद, तुळापूर फाटा, पेरणे फाटा, कोरेगाव भीमा, सणसवाडी आणि शिक्रापूर येथील अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभागाने काढून दिलेले नाही. त्यामुळे पुढील एक वर्षात अतिक्रमण काढणार का आणि रस्त्याचे काम पूर्ण होणार का, असा प्रश्न वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.

कोट

आम्ही एकूण २५ किलोमीटरचे काम करत आहोत. मात्र, प्रशासनाने आम्हाला ठिकठिकाणचे अतिक्रमण काढून दिलेले नाही. तसेच, रस्त्याचा अंतिम आराखडा तयार झालेला नाही. त्यामुळे आम्हाला काम वेगाने करण्यास अडचणी येत आहेत. जेथे परवानगी मिळाली आहे, तेथे काम सुरू केले आहे. काही स्थानिक लोक कामगारांना दमबाजी करत असल्याने देखील अडचणी येत आहेत.

- सोपान बेल्हेकर, ठेकेदार