शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-औरंगाबाद रस्ता हस्तांतरण प्रक्रिया रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:12 IST

महामार्गावरील वाहतूककोंडी कधी सुटणार : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे वर्ग केल्याची केली होती घोषणा भाग - १ पुणे : राज्य ...

महामार्गावरील वाहतूककोंडी कधी सुटणार : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे वर्ग केल्याची केली होती घोषणा

भाग - १

पुणे : राज्य सरकारकडून २०१७ साली पुणे-औरंगाबाद महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (भारतमाला) वर्ग केल्याची घोषणा करण्यात आली होती. तसेच, रस्त्याला ५५३ (एफ) असा क्रमांकही देण्यात आला. मात्र, चार वर्षे होत आली तरी रस्त्याची हस्तांतरण प्रक्रियाच झाली नसल्याची माहिती समोर आले आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. सध्या या रस्त्यावर खराडी बायपास ते शिक्रापूर या २५ किलोमीटरवर रस्ता रुंदीकरण सुरू आहे.

पुणे-अहमदनगर-औरंगाबाद असा २३५ किलोमीटर रस्ता हा आठ पदरी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या रस्त्यावर आता यापुढे फक्त राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे काम करणार असल्याची माहिती देण्यात आली. यासाठी अहमदनगर येथे मध्यवर्ती कार्यालय देखील सुरू करण्यात आले आहे. मात्र, राज्य सरकार आणि प्राधिकरण यांच्यात पुढील कार्यवाही करण्यासाठी बैठकच झाली नाही. त्यामुळे ही प्रक्रिया रखडल्याचे अधिकाऱ्यांनी ''लोकमत''ला सांगितले. त्यामुळे हा महामार्ग हस्तांतरण कधी होणार आणि प्रत्यक्ष काम केव्हा सुरू होणार, असा प्रश्न वाहनचालक तसेच स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.

सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रामवाडी (चंदननगर) ते शिक्रापूर असा २५ किलोमीटरवर रस्तारुंदीकरण करण्यात येत आहे. राज्य शासनाने यासाठी ३ मे २०२० ला २१९ कोटी रुपये मंजूर करून काम सुरू देखील झाले आहे. या कामासाठी २ मे २०२२ पर्यंतची म्हणजे एकूण दोन वर्षांची मुदत दिली आहे. मात्र लोणीकंद, तुळापूर फाटा, पेरणे फाटा, कोरेगाव भीमा, सणसवाडी आणि शिक्रापूर येथील अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभागाने काढून दिलेले नाही. त्यामुळे पुढील एक वर्षात अतिक्रमण काढणार का आणि रस्त्याचे काम पूर्ण होणार का, असा प्रश्न वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.

कोट

आम्ही एकूण २५ किलोमीटरचे काम करत आहोत. मात्र, प्रशासनाने आम्हाला ठिकठिकाणचे अतिक्रमण काढून दिलेले नाही. तसेच, रस्त्याचा अंतिम आराखडा तयार झालेला नाही. त्यामुळे आम्हाला काम वेगाने करण्यास अडचणी येत आहेत. जेथे परवानगी मिळाली आहे, तेथे काम सुरू केले आहे. काही स्थानिक लोक कामगारांना दमबाजी करत असल्याने देखील अडचणी येत आहेत.

- सोपान बेल्हेकर, ठेकेदार