शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

पुणे : व्यापा-याचे अपहरण करुन 20 कोटींची खंडणी मागणा-या तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 11:59 IST

टिंबर मार्केटमधून एका व्यापा-याचे अपहरण करुन 20 कोटी रुपयांची खंडणी मागणा-या तीन जणांना गुन्हे शाखेनं अटक केली आहे. अपहृत व्यापा-याची पोलिसांनी सुखरुप सुटका केली आहे.

पुणे - टिंबर मार्केटमधून एका व्यापा-याचे अपहरण करुन 20 कोटी रुपयांची खंडणी मागणा-या तीन जणांना गुन्हे शाखेनं अटक केली आहे. अपहृत व्यापा-याची पोलिसांनी सुखरुप सुटका केली आहे. शनिवारी (6 ऑक्टोबर) संध्याकाळी या व्यापाऱ्याचं अपहरण करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, टिंबर मार्केटमधील एका व्यापा-याचे शनिवारी संध्याकाळी मोटारीतून अपहरण करण्यात आले. ही माहिती पोलिसांना संध्याकाळी 6.30 वाजता मिळाली व्यापा-याच्या जिवाचा प्रश्न असल्याने पोलिसांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि खबरदारी घेऊन या प्रकरणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला 20 कोटी रुपयांची खंडणी मागणा-या या गुन्हेगारांनी त्यानंतर आपली मागणी कमी करीत 15 लाखांवर आणली. दरम्यान, गुन्हेगारांनी व्यापा-याला कोठे नेले आहे, याची माहिती घेण्याचे काम पोलीस करत होते.  

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीश सरदेशपांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख तसेच गुन्हे शाखेची सर्व पथके संपूर्ण पुणे शहरात त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. त्याच दरम्यान मध्यरात्रीनंतर ते कात्रज परिसरात असल्याचे समजले. त्यामुळे संपूर्ण पुणे शहरात पसरलेले गुन्हे शाखेचे युनिट कात्रज परिसरात एकवटले. 

पोलिसांनी गुन्हेगारांनी ज्या गाडीतून व्यापा-याला पळवून नेले होते. ती गाडी शोधून काढली. ते या व्यापा-याला शिवापूरकडे घेऊन जात होते. चालत्या गाडीला ओव्हरटेक करुन पोलिसांनी चारही बाजूने ती गाडी घेरुन तिला थांबायला भाग पाडले. त्यातील व्यापा-याची आधी सुटका केली. त्यानंतर गाडीतील तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गावठी कट्टे आणि कोयते आढळून आले आहेत. गुन्हे शाखेने तिघांना पकडून खडक पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्यांच्या आणखी दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी