शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

दिलखुलास गप्पांमधून उलगडले ‘पांडेपुराण’, पियूष पांडे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 3:03 AM

नरेंद्र मोदींबरोबर केलेली कॅम्पेन... अमिताभ बच्चन यांच्यासह केलेल्या सामाजिक विषयांवरील जाहिराती... उत्पादन ते ब्रँड असा प्रवास, अशा अनेक आठवणींना उजाळा देत प्रसिद्ध जाहिरातींमागचे किमयागार आणि अ‍ॅडगुरू पीयूष पांडे यांनी जाहिरात क्षेत्रातील प्रवासाचा पट उपस्थितांसमोर उलगडला.

पुणे : सर्जनशील व्यक्तींचा सहवास आणि वाचनाची आवड यातून झालेले ग्रूमिंग... ‘कुछ मीठा हो जाये’, ‘पप्पू पास हो गया’ अशा ‘कॅची’ वाक्यांमधून मनावर कोरल्या गेलेल्या जाहिराती... कल्पनेचे मूळ कायम धरून जाहिरात क्षेत्रात घेतलेली झेप... नरेंद्र मोदींबरोबर केलेली कॅम्पेन... अमिताभ बच्चन यांच्यासह केलेल्या सामाजिक विषयांवरील जाहिराती... उत्पादन ते ब्रँड असा प्रवास, अशा अनेक आठवणींना उजाळा देत प्रसिद्ध जाहिरातींमागचे किमयागार आणि अ‍ॅडगुरू पीयूष पांडे यांनी जाहिरात क्षेत्रातील प्रवासाचा पट उपस्थितांसमोर उलगडला. ‘करिअरचे नियोजन न करता आवडीचे काम करा. पाय कायम जमिनीवर राहू द्या,’ असा मूलमंत्रही दिला.मनोविकास प्रकाशनातर्फे पीयूष पांडे यांच्या प्रसाद नामजोशी यांनी अनुवादित केलेल्या ‘पांडेपुराण : जाहिरात आणि मी’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्योत्स्ना भोळे सभागृहात पार पडले. या वेळी पांडे यांच्यासह प्रसाद नामजोशी, अरविंद पाटकर, आशिष पाटकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.सुधीर गाडगीळ यांनी साधलेल्या दिलखुलास संवादातून पीयूष पांडे यांचा प्रवास उपस्थितांना जाणून घेता आला. ‘आयुष्याकडून जितके मिळेल तितके घ्यावे. सकारात्मक विचार करावा, नैराश्य कधीही मदतीला येत नाही; त्यामुळे ते सोडून देणेच चांगले,’ अशा भावना व्यक्त करून त्यांनी आशावाद जागवला.अरविंद पाटकर यांनी प्रास्ताविक केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.पांडे म्हणाले, ‘‘सध्याचा जमाना सोशल मीडियाचा असला तरी त्याचा पाया छोटा आहे. आजही सामान्यांवर टीव्हीचे गारूड आहे. सोशल मीडियावर वावरण्याची प्रत्येकाला सवय लागली आहे. मात्र, इथे मी कशासाठी आहे, काय करणार आहे, याबाबत स्पष्टता असायला हवी. अनेक माध्यमे येतात आणि जातात. सर्जनशीलतेचे मूळ कायम असेल तर आपली घोडदौड कोणीही रोखू शकत नाही. काळाप्रमाणे बदलण्याची तयारी ठेवायला हवी. हिºयाला पैलू पाडले जातात त्याप्रमाणे कल्पकता आणि सर्जनशीलतेचे विविध कंगोरे तपासून पाहता येतात.’’‘माझा प्रेझेंटेशनवर विश्वास नाही, मी लोकांशी संवाद साधतो. सकारात्मक विचार केला, तर आयुष्यही सकारात्मक दिसू लागते. जीवनाला प्रेरणा देणारी वाक्ये, मनाला भावलेल्या भावना जाहिरातीत उतरवल्या. आयुष्यात भावनांना खूप महत्त्व असते. माणसाच्या भावना वैश्विक असतात. जाहिराती याही आयुष्याचाच एक भाग असताना त्या भावनारहित कशा असू शकतात?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, ‘‘जाहिरात क्षेत्रात काम करताना क्लायंटला आपल्या कल्पना समजावून सांगण्याची तयारी असायला हवी. एका माणसाला आपली कल्पना समजावून सांगता येत नसेल तर ती लाखो लोकांपर्यंत कशा पोहोचणार? याचा विचार करायला हवा.’’सही घेण्यासाठी वाचकांची झुंबडपीयूष पांडे यांचे आकर्षक व्यक्तिमत्त्व, मिस्कील स्वभाव, हजरजबाबी उत्तरे यांतून श्रोतृवर्ग प्रभावित झाला होता. कार्यक्रमानंतर पुस्तकावर त्यांची सही घेण्यासाठी वाचकांची झुंबड उडाली होती. यामध्ये तरुण, महिला, आबालवृद्धांचा समावेश होता. पांडे यांनीही पुस्तकांवर सह्या करीत वाचकांशी दिलखुलास संवाद साधला.

राजकारण आणि धर्म कोणावरही थोपवता येत नाही. राजकारणात हरल्यानंतर शत्रूच निर्माण होतात,’ असा कानमंत्र गुरू डेव्हिड ओगिल्व्ही यांनी दिला होता. मीही राजकारणाशी संबंधित जाहिरात करायची नाही, हे धोरण अनेक वर्षे जपले. मात्र, नरेंद्र मोदी यांच्याबरोबर गुजरात टुरिझम कँपेनचे काम करीत होतो. त्यांनी कायम माझे म्हणणे ऐकून घेतले, कल्पनांचा आदर करीत स्वातंत्र्य जपले. त्यामुळे मी माझ्या धोरणाला मुरड घालून भाजपासाठी जाहिरात करण्यास तयार झालो. पक्षाने केलेल्या संशोधनानुसार, पक्षापेक्षा मोदींची लोकप्रियता जास्त असल्याचे लक्षात आले होते. त्यामुळे जाहिरातीतही मोदींना केंद्रस्थानी ठेवण्यात आले. ते श्रेय माझे नसून, त्यांचे आहे.- पीयूष पांडे, अ‍ॅडगुरूअनुवाद हा स्वतंत्र साहित्यप्रकार आहे. अनुवाद करताना एका संस्कृतीचे दुसºया संस्कृतीत संक्रमण होत असते. पीयूष पांडे यांच्या सर्जनाच्या प्रक्रियेचा झंकार माझ्या मनात उमटवण्याचा मी प्रयत्न केला. त्यांच्या सर्जनाच्या सुगंधाने माझा हातही सुगंधित झाला. हा सर्जनशीलतेचा सुगंध अनेकांपर्यंत पोहोचून ही प्रक्रिया वृद्धिंगत व्हावी.- प्रसाद नामजोशी, लेखक