शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

प्रथम वर्ष प्रवेशासाठी ‘प्रोव्हिजनल ॲडमिशन’चा विचार करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:12 IST

पुणे : कोरोनामुळे मागील शैक्षणिक वर्षाप्रमाणे २०२१-२२ हे शैक्षणिक वर्षसुद्धा विस्कळीत होऊ नये, यासाठी राज्य शासनाने प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी ...

पुणे : कोरोनामुळे मागील शैक्षणिक वर्षाप्रमाणे २०२१-२२ हे शैक्षणिक वर्षसुद्धा विस्कळीत होऊ नये, यासाठी राज्य शासनाने प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी ‘प्रोव्हिजनल ॲडमिशन’ देण्याचा विचार करावा. तसेच बारावीचा निकाल वाढणार असल्यामुळे राज्य शासनाने व विद्यापीठांनी महाविद्यालयांना तुकडी वाढ किंवा क्षमतावाढ देण्याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा प्राचार्यांकडून व्यक्त केले जात आहे.

सीबीएसई बोर्डासह राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानेसुद्धा इयत्ता बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दहावीचा निकाल अंतर्गत गुणांच्या आधारे जाहीर होणार असून, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाचे निकष अद्याप निश्चित झालेले नाहीत. परंतु बारावीचा निकालही शंभर टक्के लागण्याची शक्यता आहे.

बारावीचा निकाल वाढल्यास विद्यापीठ स्तरावरून महाविद्यालयांना प्रत्येक तुकडीत १० ते २० टक्‍क्‍यांपर्यंत वाढीव प्रवेश करण्यास मान्यता दिली जाते. मात्र, यावर्षी निकालात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्यामुळे २० टक्के वाढीव प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्यानंतरही अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य शासनाने मागेल त्याला तुकडी वाढ देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी केली आहे.

----------

इयत्ता बारावीचा निकाल जाहीर होण्यास उशीर होणार आहे. परिणामी यावर्षीसुद्धा शैक्षणिक वर्ष विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रथम वर्षासाठी ‘प्रोव्हिजनल ॲडमिशन’ देण्याबाबत शासनाने विचार करावा. इयत्ता दहावी व अकरावी उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र व बारावीचा परीक्षा अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षा घेण्याची प्रक्रिया सुरू करावी. तसेच तुकडी वाढीची प्रक्रिया वेळखाऊपणाची असल्यामुळे विद्यापीठाने एका तुकडीत २० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक प्रवेश करण्यास महाविद्यालयांना मान्यता देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा.

- डॉ. राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर

-----------

शहरी भागासह ग्रामीण भागातही प्रथम वर्षास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने मागेल त्याला तुकडी वाढ देण्याबाबत निर्णय घ्यावा. एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे.

- डॉ. संजय चाकणे, प्राचार्य, इंदापूर महाविद्यालय

--------------------------------

इयत्ता बारावीचा निकाल चांगला लागल्यानंतर विद्यापीठाकडून सर्वसाधारणपणे एका तुकडीत १२० विद्यार्थ्यांऐवजी १३२ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास महाविद्यालयांना मान्यता दिली जाते. यावर्षी तुकडीत केवळ दहा टक्के क्षमता वाढवून चालणार नाही. त्यामुळे राज्य शासनाने मागेल त्याला तुकडी वाढ देण्याबाबत सकारात्मक विचार करावा.

- डॉ. व्ही. बी. गायकवाड, प्राचार्य, के. टी. एच. एम. महाविद्यालय