शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकांनी केलेला गोळीबार हा संरक्षणासाठी : लेफ्टनंट जनरल देवराज अंबू; चौकशी नंतर निर्णय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 15:16 IST

जम्मु काश्मिर मध्ये सैनिकांच्या गोळीबारात सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला ही घटना दुर्दैवी आहे. लष्करही याबाबत चौकशी करणार आहे. त्यानंतर योग्य कारवाई केली जाईल,’’ अशी माहिती लष्कराच्या उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल देवराज अंबू यांनी पत्रकारांना दिली.

ठळक मुद्देबॉम्बे सॅपर्सचे १९८व्या वर्धापन दिनानिमित्त संचलनजवानांनी त्यांच्या सरंक्षणासाठी गोळीबार केला : अंबू

पुणे : ‘‘जम्मु काश्मिर मध्ये सैनिकांच्या गोळीबारात सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला ही घटना दुर्दैवी आहे. हा गोळीबार  सैनिकांनी स्वत: च्या आणि लष्कराच्या संसाधनांच्या रक्षणासाठी केला. या प्रकरणी स्थानिक प्रशासनाने गुन्हा नोंदवला आहे, असे असले तरी लष्करही याबाबत चौकशी करणार आहे. त्यानंतर योग्य कारवाई केली जाईल,’’ अशी माहिती लष्कराच्या उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल देवराज अंबू यांनी पत्रकारांना दिली.बॉम्बे सॅपर्सच्या १९८व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या संचलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते. अंबू म्हणाले, जम्मु काश्मिरमध्ये जवानांवर स्थानिकांचा एक समूह चालून आला. जवानांनी त्यांच्या सरंक्षणासाठी केला. यापुढेही अशी परिस्थिती आल्यास सरकारी मालमत्तेच्या रक्षणासाठी लष्कर असे निर्णय घेईल.सीमेवरील होणारी घुसखोरी आणि गोळीबाराबाबत अंबू म्हणाले, की राजुरी भागात काल पाकिस्तानकडून गोळीबार झाला. गेल्या काही दिवसांत भारतीय सीमेवर गोळीबाराचे प्रमाण वाढले आहे. घुसखोरांना भारतीय सीमेत प्रविष्ठ करण्यासाठी पाकिस्तान कडून या प्रकारची फायरिंग केली जाते. मात्र, भारतीय लष्कर त्याला चोख प्रत्युत्तर देत असून घुसघोरांना धडा शिकवत आहे. सीमेवर भारतीय लष्कराची परिस्थीती भक्कम आहे. कुठल्याही परिस्थितीशी सामोरे जाण्यास लष्कर तयार आहे. 

२०१७ मध्ये २१३ दहशतवाद्यांना कंठस्नान जम्मु काश्मिरमध्ये दहशतवाद्यांविरोधात आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवामुळे मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांवर लष्कराने नियंत्रण मिळवले आहे. घुसखोर असो वा दहशतवाद लष्कर त्यांच्या विरोधात कठार पावले उचलत आहेत. २०१७ मध्ये जवळपास २१३ दहशदवादी मारले गेले आहेत. मोठ्या प्रमाणात त्यांचे नेतृत्व हे सीमेपलिकडून येत आहे. ते स्थानिक युवकांना भडकवण्याचे काम करत आहेत. मात्र, त्यांच्यावरही नियंत्रण मिळवण्यास लष्कराला यश आले आहे.  

टॅग्स :Puneपुणे