शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सैनिकांनी केलेला गोळीबार हा संरक्षणासाठी : लेफ्टनंट जनरल देवराज अंबू; चौकशी नंतर निर्णय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 15:16 IST

जम्मु काश्मिर मध्ये सैनिकांच्या गोळीबारात सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला ही घटना दुर्दैवी आहे. लष्करही याबाबत चौकशी करणार आहे. त्यानंतर योग्य कारवाई केली जाईल,’’ अशी माहिती लष्कराच्या उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल देवराज अंबू यांनी पत्रकारांना दिली.

ठळक मुद्देबॉम्बे सॅपर्सचे १९८व्या वर्धापन दिनानिमित्त संचलनजवानांनी त्यांच्या सरंक्षणासाठी गोळीबार केला : अंबू

पुणे : ‘‘जम्मु काश्मिर मध्ये सैनिकांच्या गोळीबारात सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला ही घटना दुर्दैवी आहे. हा गोळीबार  सैनिकांनी स्वत: च्या आणि लष्कराच्या संसाधनांच्या रक्षणासाठी केला. या प्रकरणी स्थानिक प्रशासनाने गुन्हा नोंदवला आहे, असे असले तरी लष्करही याबाबत चौकशी करणार आहे. त्यानंतर योग्य कारवाई केली जाईल,’’ अशी माहिती लष्कराच्या उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल देवराज अंबू यांनी पत्रकारांना दिली.बॉम्बे सॅपर्सच्या १९८व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या संचलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते. अंबू म्हणाले, जम्मु काश्मिरमध्ये जवानांवर स्थानिकांचा एक समूह चालून आला. जवानांनी त्यांच्या सरंक्षणासाठी केला. यापुढेही अशी परिस्थिती आल्यास सरकारी मालमत्तेच्या रक्षणासाठी लष्कर असे निर्णय घेईल.सीमेवरील होणारी घुसखोरी आणि गोळीबाराबाबत अंबू म्हणाले, की राजुरी भागात काल पाकिस्तानकडून गोळीबार झाला. गेल्या काही दिवसांत भारतीय सीमेवर गोळीबाराचे प्रमाण वाढले आहे. घुसखोरांना भारतीय सीमेत प्रविष्ठ करण्यासाठी पाकिस्तान कडून या प्रकारची फायरिंग केली जाते. मात्र, भारतीय लष्कर त्याला चोख प्रत्युत्तर देत असून घुसघोरांना धडा शिकवत आहे. सीमेवर भारतीय लष्कराची परिस्थीती भक्कम आहे. कुठल्याही परिस्थितीशी सामोरे जाण्यास लष्कर तयार आहे. 

२०१७ मध्ये २१३ दहशतवाद्यांना कंठस्नान जम्मु काश्मिरमध्ये दहशतवाद्यांविरोधात आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवामुळे मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांवर लष्कराने नियंत्रण मिळवले आहे. घुसखोर असो वा दहशतवाद लष्कर त्यांच्या विरोधात कठार पावले उचलत आहेत. २०१७ मध्ये जवळपास २१३ दहशदवादी मारले गेले आहेत. मोठ्या प्रमाणात त्यांचे नेतृत्व हे सीमेपलिकडून येत आहे. ते स्थानिक युवकांना भडकवण्याचे काम करत आहेत. मात्र, त्यांच्यावरही नियंत्रण मिळवण्यास लष्कराला यश आले आहे.  

टॅग्स :Puneपुणे