शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

मुलीला ‘प्रपोज’ केले, तिने नाकारले...त्यावर पोलिस आयुक्त म्हणतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “सर मला आवडणारी मुलगी बालाजीनगरला काल राहायला आली. मी तिला प्रपोज केले. परंतु तिने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “सर मला आवडणारी मुलगी बालाजीनगरला काल राहायला आली. मी तिला प्रपोज केले. परंतु तिने नकार दिला. आपण फक्त मित्र असल्याचे ती म्हणाली सांगितले. काहीतरी करा सर...,” असा प्रश्न एका तरुणाने थेट पोलीस आयुक्त अभितभ गुप्ता यांनाच विचारला.

“त्या मुलीची इच्छा नसेल तर तू काहीच करू नकोस. आम्हीही काही करु शकणार नाही. पण आमच्या शुभेच्छा नेहमीच तुझ्यासोबतच आहे,” असे मिश्किल उत्तर देत गुप्ता यांनी त्या तरुणाची समजूत काढली. बऱ्याच दिवसात भेट झाली नसल्याचे सांगत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सोमवारी (दि. ८) ट्विटरवरून पुणेकरांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पुणेकरांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. यातच संबंधित तरुणाने स्वत:च्या नाकारल्या गेलेल्या ‘प्रपोजल’विषयी प्रश्न केला होता.

अन्य पुणेकरांनी वाहतूक, मास्क, पोलिसांची वागणूक, महिला सुरक्षा, नियम याबाबत गुप्ता यांच्याशी संवाद साधला. काही जणांनी खासगी आयुष्यातलेही प्रश्न त्यांना विचारले. गुप्ता यांनी जास्तीत जास्त पुणेकरांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला.

चौकट

मास्कबाबत अनेक प्रश्न

आम्ही मास्क घालू का, ‘चारचाकी’मध्ये अनिवार्य आहे का, अजून किती दिवस मास्क घालावे लागेल, असे प्रश्न पुणेकरांनी विचारले. यावर गुप्ता म्हणाले, “सद्यस्थितीत नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहणे फारच महत्वाचे आहे. मास्क घातल्याने तुम्ही कोरोना आजारापासून दूर राहू शकता. दंड आकारण्यापेक्षा तुमची आरोग्य आणि सुरक्षा माझ्या दृष्टीने महत्वाची आहे. तरुण हे भारताचे भविष्य आहेत. त्यांनी तर मास्क घालणे अनिवार्य आहे. तरुणांकडून नियमांचे पालन होत नसेल. तर ती अत्यंत निराशाजनक बाब आहे.”

चौकट

हेल्मेट आणि तरुणांमधली गुन्हेगारी

हेल्मेट घालणे योग्य आहे का या प्रश्नावर पोलिस आयुक्त गुप्ता म्हणाले की, हेल्मेटची निवड सुरक्षेसाठी करा. हा आवडीचा मुद्दा नाही. शाळा, महाविद्यालयीन तरुणांमध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारीबद्दल गुप्ता म्हणाले, “विद्यार्थ्यांमध्ये गुन्हेगारी वाढण्यास सोशल मीडिया आणि आजूबाजूचे वातावरणच जबाबदार आहे. आई-वडिलांनी यात लक्ष देणे गरजेचे आहे.” स्त्रियांच्या सुरक्षेसाठी पोलीस नेहमीच सतर्क राहणार आहेत. रात्री-अपरात्री कधीही मदत लागल्यास पोलीसांचे प्राधान्य पहिल्यांदा स्त्रियांच्या सुरक्षेला राहिल. त्यांनी अजिबात घाबरू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.