शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

आळंदी नगर परिषदेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 03:00 IST

आळंदी नगर परिषदेने मात्र प्रस्तावित हद्दवाढीस विरोध केला आहे.

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदी नगर परिषदेची हद्दवाढ करून आळंदी ग्रामीण क्षेत्र आळंदी नगर परिषदेत समाविष्ट करण्यास भविष्यातील नागरीकरणाचा विचार करून हद्दवाढ करण्याची शिफारस खेड तहसीलदार यांनी केली असल्याचा अहवाल पुणे जिल्हा प्रशासनास सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद यांनी पुढील कार्यवाहीसाठी पाठविला आहे. आळंदी नगर परिषदेने मात्र प्रस्तावित हद्दवाढीस विरोध केला आहे.या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते नीलेश कड यांनी आळंदी नगर परिषद हद्दवाढीसाठी अर्ज करून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. यात आळंदी नगर परिषदेच्या बाबत पुणे जिल्हा प्रशासनाने स्थानिक चौकशी करून अहवाल जिल्हा प्रशासनास सादर करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद यांनी खेड तहसीलदार आणि आळंदी नगर परिषद यांच्याकडून चौकशीसह वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागविला. यात खेड तहसीलदारांनी आळंदी नगर परिषदेची हद्दवाढ करण्याची गरज भविष्यातील वाढत्या नागरीकरणाची गरज व्यक्त करीत हद्दवाढ करण्याची शिफारस केली आहे. यासाठी जनगणना सन २०११ गृहीत घरून अहवाल दिला आहे. आळंदी व चºहोली खुर्दलगतचे आळंदी ग्रामीणचे क्षेत्र आळंदी नगर परिषदेत समाविष्ट करण्याची शिफारस करण्यात आली आहे.आळंदी नगर परिषदेने मात्र हद्दवाढीला विरोध करणारा ठराव केला आहे. मात्र, वाढती लोकसंख्या, नागरीकरण आणि नागरी सुविधांची आळंदी ग्रामीण भागात असलेली वानवा, परिसरातील औद्योगिक क्षेत्र यांचा विचार करून खेडचे तहसीलदार यांनी, ‘आळंदी शहर म्हणून वाढते आहे. यात नागरीकरणाची टक्केवारीदेखील वाढत आहे. त्यामुळे आळंदीची हद्दवाढ करण्याची गरज असल्याचा’ अहवाल दिला आहे.चौकशीतील पत्राप्रमाणे विविध मुद्द्यांची तपासणी करून आळंदी नगर परिषदेची हद्दवाढीची प्राथमिक उद्घोषणा अधिसूचनेसाठी सविस्तर अहवाल सादर करण्यात आला आहे. आळंदी नगर परिषदेच्या हद्दीत आळंदी ग्रामीणचे क्षेत्र समावेशासाठी अहवाल देण्यात आला आहे. यात आळंदी ग्रामीण हे क्षेत्र महसुली गाव चºहोली खुर्द ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट आहे. तसेच, चºहोली खुर्द ग्रामपंचायतीचे महसुली क्षेत्र स्वतंत्र आहे. आळंदीत समाविष्ट होणाऱ्या गावाची लोकसंख्या सन २०११च्या जनगणनेनुसार २५ हजार ५६८ आहे. यात सरासरी अकृषक रोजगाराची टक्केवारी ४५ टक्के आहे. वस्तुस्थितीच्या अहवालात आळंदी नगर परिषद हद्दवाढ करणे इष्ट वाटते, असा अहवाल देण्यात आला आहे.आळंदी ग्रामीणमध्ये नागरी सुविधांचा अभावतीर्थक्षेत्र आळंदीलगत असलेल्या आळंदी ग्रामीण क्षेत्रात नागरीकरण वाढत आहे. मोठ्या प्रमाणात शेतीचे क्षेत्र कमी होत आहे. आळंदीलगतच्या भागात लोकवस्ती वाढली आहे. मात्र, नागरी सुविधा देण्यास स्थानिक प्रशासन तोकडे पडत आहे. आळंदी ग्रामीण क्षेत्रात नागरी सुविधा मिळत नसल्याने नव्याने विकसित होत असलेल्या नागरी वसाहतीमधील नागरिक तसेच राज्यातून येणाºया भाविकांमध्येदेखील नाराजी आहे. राज्यातील भाविकांनी यात्राकाळात निवाºयाची व्यवस्था व्हावी, यासाठी आपापल्या कुवतीप्रमाणे आळंदीलगतच्या आळंदी ग्रामीण क्षेत्रात जागाखरेदी करून निवाºयाची व्यवस्था केली आहे. मात्र रस्ते,ड्रेनेज, वीज पथदिवे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन आदी नागरी सुविधांचा अभाव आहे.तीर्थक्षेत्र आळंदी शहरासाठी प्रभावी प्रखर निर्णय घेण्याची क्षमता आळंदी नगर परिषद कमिटीत नाही. याचे वाईट परिणाम भविष्यात आळंदी व परिसराच्या नियोजनावर होतील. मात्र, खेडचे प्रांत व तहसीलदार यांनी भविष्याचा वेध घेऊन आळंदी नगर परिषद हद्दवाढ आवश्यक असल्याचा सकारात्मक अहवाल जिल्हाधिकाºयांना पाठविलेला आहे. या प्रशासकीय निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

टॅग्स :AlandiआळंदीAlandi Nagar Parishadआळंदी नगर परिषद