शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून राजगडावर पुरातन लाकडाचे संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 01:47 IST

२५ वर्षे शिवरायांच्या स्वराज्याची यशोगाथा लिहिलेल्या राजगडावरील (ता. वेल्हे) सदरेच्या व मंदिरांच्या सागवानी लाकडास नवसंजीवनी मिळावी म्हणून त्यातील स्तंभास (खांब) पुठ्ठी लावून, त्यास पेंट करून पॉलिश करण्यात आले.

मार्गासनी : २५ वर्षे शिवरायांच्या स्वराज्याची यशोगाथा लिहिलेल्या राजगडावरील (ता. वेल्हे) सदरेच्या व मंदिरांच्या सागवानी लाकडास नवसंजीवनी मिळावी म्हणून त्यातील स्तंभास (खांब) पुठ्ठी लावून, त्यास पेंट करून पॉलिश करण्यात आले. राज्य पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राजगड संवर्धन या मोहिमेचे आयोजन दि. १५, १६ व १७ मार्च रोजी करण्यात आले होते. १५ मार्चपासून सुशांत मोकाशी, सिद्धेश कानडे, ओंकार शिंदे, आशुतोष बोरकर, दशरथ श्रीराम, आणि राजेश मारणर यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. सदरेच्या व मंदिरांच्या स्तंभाची पॉलिश पेपरने घासून स्वच्छता करण्यात आली. त्यात निर्माण झालेल्या छिद्रांमध्ये सुरुकात भुसा व फेव्हिकॉलचे मिश्रण भरून कीटकनाशक पॉलिश करण्यात आले. सलग दोन दिवस हे काम चालू होते.दि.१६ रोजी रात्री फर्जंद सिनेमाचे दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांचेसह नीलेश जेजुरकर, गौरव शेवाळे, जगदीश पवार, अतिष मुंगसे, शिव भांडेकरी, नगर जिल्ह्यातील डॉ. रमेश वामन, प्रशांत काकडे, अनिल दिवेकर, तेजस रोकडे, यशवंत कानडे, मयूर शिंदे, तुषार टेमकर व इतर सहकारीही यात सहभागी झाले. त्यांनी आतील व बाहेरील स्तंभ, दरवाजे, यांना पुढील ६ तासांमध्ये दुसरे कोटिंग चढवून सर्व प्रक्रिया पूर्ण केली. सह्याद्री प्रतिष्ठान अलिबाग दुर्ग सेवक सतीश हातमोडे, पनवेल येथील कल्पेश पवार, ललित पाटील, प्रवीण शिर्के व महेश बुलाख यांच्या टीमने तेथील स्तंभास शेवटचा तिसरा थर देऊन स्वच्छता केली.सह्याद्री प्रतिष्ठान अनेक वर्षांपासून गडकोटांच्या संवर्धनासाठी काम करीत आहे. संस्थेचे संस्थापक आणि महाराष्ट्र शासन दुर्गसंवर्धन समितीचे सदस्य चंद्रशेखर गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातशेहून अधिक दुर्गसंवर्धन मोहिमा राबविल्या. स्वराज्याचे प्रवेशद्वार या उपक्रमांतर्गत किल्ले तुंग, किल्ले तिकोणा, किल्ले गोरखगड, किल्ले कर्नाळा येथील प्रवेशद्वार लोकसहभागातून उभारली.३१ मार्च २०१९ रोजी किल्ले तोरणागडावरील प्रवेशद्वार लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. स्वराज्याचा तोफगाडा या माध्यमातून किल्ले सिंहगड, कुलाबा, कोथळीगड येथील बेवारस पडलेल्या तोफांना सागवानी तोफगाडे बसविण्यात आलेत.तसेच जंजिरा येथे कायमस्वरूपी राष्ट्रध्वज लावण्यात आला. किल्ले पद्मदुर्ग येथे सर्वांत उंच भगवा ध्वज लावण्यात यावा यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग नवी दिल्ली यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. या संदर्भात नीलेश जेजुुुरकर यांनी युवकांना आवाहन केले की मोठे काम झाले असले तरी अजूनही भरपूर काम शिल्लक आहे. जवळपास ६० स्तंभचे काम बाकी आहे. येत्या पावसाळ्याच्या अगोदर हे काम करण्यात येईल. आपण मिळूनच हे काम पूर्ण करू शकतो. सुशांत मोकाशी यांच्या पुढाकाराने पुढील मोहिमेची बांधणी लवकरच आखण्यात येईल.

टॅग्स :Puneपुणे