शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून राजगडावर पुरातन लाकडाचे संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 01:47 IST

२५ वर्षे शिवरायांच्या स्वराज्याची यशोगाथा लिहिलेल्या राजगडावरील (ता. वेल्हे) सदरेच्या व मंदिरांच्या सागवानी लाकडास नवसंजीवनी मिळावी म्हणून त्यातील स्तंभास (खांब) पुठ्ठी लावून, त्यास पेंट करून पॉलिश करण्यात आले.

मार्गासनी : २५ वर्षे शिवरायांच्या स्वराज्याची यशोगाथा लिहिलेल्या राजगडावरील (ता. वेल्हे) सदरेच्या व मंदिरांच्या सागवानी लाकडास नवसंजीवनी मिळावी म्हणून त्यातील स्तंभास (खांब) पुठ्ठी लावून, त्यास पेंट करून पॉलिश करण्यात आले. राज्य पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राजगड संवर्धन या मोहिमेचे आयोजन दि. १५, १६ व १७ मार्च रोजी करण्यात आले होते. १५ मार्चपासून सुशांत मोकाशी, सिद्धेश कानडे, ओंकार शिंदे, आशुतोष बोरकर, दशरथ श्रीराम, आणि राजेश मारणर यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. सदरेच्या व मंदिरांच्या स्तंभाची पॉलिश पेपरने घासून स्वच्छता करण्यात आली. त्यात निर्माण झालेल्या छिद्रांमध्ये सुरुकात भुसा व फेव्हिकॉलचे मिश्रण भरून कीटकनाशक पॉलिश करण्यात आले. सलग दोन दिवस हे काम चालू होते.दि.१६ रोजी रात्री फर्जंद सिनेमाचे दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांचेसह नीलेश जेजुरकर, गौरव शेवाळे, जगदीश पवार, अतिष मुंगसे, शिव भांडेकरी, नगर जिल्ह्यातील डॉ. रमेश वामन, प्रशांत काकडे, अनिल दिवेकर, तेजस रोकडे, यशवंत कानडे, मयूर शिंदे, तुषार टेमकर व इतर सहकारीही यात सहभागी झाले. त्यांनी आतील व बाहेरील स्तंभ, दरवाजे, यांना पुढील ६ तासांमध्ये दुसरे कोटिंग चढवून सर्व प्रक्रिया पूर्ण केली. सह्याद्री प्रतिष्ठान अलिबाग दुर्ग सेवक सतीश हातमोडे, पनवेल येथील कल्पेश पवार, ललित पाटील, प्रवीण शिर्के व महेश बुलाख यांच्या टीमने तेथील स्तंभास शेवटचा तिसरा थर देऊन स्वच्छता केली.सह्याद्री प्रतिष्ठान अनेक वर्षांपासून गडकोटांच्या संवर्धनासाठी काम करीत आहे. संस्थेचे संस्थापक आणि महाराष्ट्र शासन दुर्गसंवर्धन समितीचे सदस्य चंद्रशेखर गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातशेहून अधिक दुर्गसंवर्धन मोहिमा राबविल्या. स्वराज्याचे प्रवेशद्वार या उपक्रमांतर्गत किल्ले तुंग, किल्ले तिकोणा, किल्ले गोरखगड, किल्ले कर्नाळा येथील प्रवेशद्वार लोकसहभागातून उभारली.३१ मार्च २०१९ रोजी किल्ले तोरणागडावरील प्रवेशद्वार लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. स्वराज्याचा तोफगाडा या माध्यमातून किल्ले सिंहगड, कुलाबा, कोथळीगड येथील बेवारस पडलेल्या तोफांना सागवानी तोफगाडे बसविण्यात आलेत.तसेच जंजिरा येथे कायमस्वरूपी राष्ट्रध्वज लावण्यात आला. किल्ले पद्मदुर्ग येथे सर्वांत उंच भगवा ध्वज लावण्यात यावा यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग नवी दिल्ली यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. या संदर्भात नीलेश जेजुुुरकर यांनी युवकांना आवाहन केले की मोठे काम झाले असले तरी अजूनही भरपूर काम शिल्लक आहे. जवळपास ६० स्तंभचे काम बाकी आहे. येत्या पावसाळ्याच्या अगोदर हे काम करण्यात येईल. आपण मिळूनच हे काम पूर्ण करू शकतो. सुशांत मोकाशी यांच्या पुढाकाराने पुढील मोहिमेची बांधणी लवकरच आखण्यात येईल.

टॅग्स :Puneपुणे