शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
4
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
5
"ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
6
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
7
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
8
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
9
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
10
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
11
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
12
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
13
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
14
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
15
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
16
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
17
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
18
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
19
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून राजगडावर पुरातन लाकडाचे संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 01:47 IST

२५ वर्षे शिवरायांच्या स्वराज्याची यशोगाथा लिहिलेल्या राजगडावरील (ता. वेल्हे) सदरेच्या व मंदिरांच्या सागवानी लाकडास नवसंजीवनी मिळावी म्हणून त्यातील स्तंभास (खांब) पुठ्ठी लावून, त्यास पेंट करून पॉलिश करण्यात आले.

मार्गासनी : २५ वर्षे शिवरायांच्या स्वराज्याची यशोगाथा लिहिलेल्या राजगडावरील (ता. वेल्हे) सदरेच्या व मंदिरांच्या सागवानी लाकडास नवसंजीवनी मिळावी म्हणून त्यातील स्तंभास (खांब) पुठ्ठी लावून, त्यास पेंट करून पॉलिश करण्यात आले. राज्य पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राजगड संवर्धन या मोहिमेचे आयोजन दि. १५, १६ व १७ मार्च रोजी करण्यात आले होते. १५ मार्चपासून सुशांत मोकाशी, सिद्धेश कानडे, ओंकार शिंदे, आशुतोष बोरकर, दशरथ श्रीराम, आणि राजेश मारणर यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. सदरेच्या व मंदिरांच्या स्तंभाची पॉलिश पेपरने घासून स्वच्छता करण्यात आली. त्यात निर्माण झालेल्या छिद्रांमध्ये सुरुकात भुसा व फेव्हिकॉलचे मिश्रण भरून कीटकनाशक पॉलिश करण्यात आले. सलग दोन दिवस हे काम चालू होते.दि.१६ रोजी रात्री फर्जंद सिनेमाचे दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांचेसह नीलेश जेजुरकर, गौरव शेवाळे, जगदीश पवार, अतिष मुंगसे, शिव भांडेकरी, नगर जिल्ह्यातील डॉ. रमेश वामन, प्रशांत काकडे, अनिल दिवेकर, तेजस रोकडे, यशवंत कानडे, मयूर शिंदे, तुषार टेमकर व इतर सहकारीही यात सहभागी झाले. त्यांनी आतील व बाहेरील स्तंभ, दरवाजे, यांना पुढील ६ तासांमध्ये दुसरे कोटिंग चढवून सर्व प्रक्रिया पूर्ण केली. सह्याद्री प्रतिष्ठान अलिबाग दुर्ग सेवक सतीश हातमोडे, पनवेल येथील कल्पेश पवार, ललित पाटील, प्रवीण शिर्के व महेश बुलाख यांच्या टीमने तेथील स्तंभास शेवटचा तिसरा थर देऊन स्वच्छता केली.सह्याद्री प्रतिष्ठान अनेक वर्षांपासून गडकोटांच्या संवर्धनासाठी काम करीत आहे. संस्थेचे संस्थापक आणि महाराष्ट्र शासन दुर्गसंवर्धन समितीचे सदस्य चंद्रशेखर गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातशेहून अधिक दुर्गसंवर्धन मोहिमा राबविल्या. स्वराज्याचे प्रवेशद्वार या उपक्रमांतर्गत किल्ले तुंग, किल्ले तिकोणा, किल्ले गोरखगड, किल्ले कर्नाळा येथील प्रवेशद्वार लोकसहभागातून उभारली.३१ मार्च २०१९ रोजी किल्ले तोरणागडावरील प्रवेशद्वार लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. स्वराज्याचा तोफगाडा या माध्यमातून किल्ले सिंहगड, कुलाबा, कोथळीगड येथील बेवारस पडलेल्या तोफांना सागवानी तोफगाडे बसविण्यात आलेत.तसेच जंजिरा येथे कायमस्वरूपी राष्ट्रध्वज लावण्यात आला. किल्ले पद्मदुर्ग येथे सर्वांत उंच भगवा ध्वज लावण्यात यावा यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग नवी दिल्ली यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. या संदर्भात नीलेश जेजुुुरकर यांनी युवकांना आवाहन केले की मोठे काम झाले असले तरी अजूनही भरपूर काम शिल्लक आहे. जवळपास ६० स्तंभचे काम बाकी आहे. येत्या पावसाळ्याच्या अगोदर हे काम करण्यात येईल. आपण मिळूनच हे काम पूर्ण करू शकतो. सुशांत मोकाशी यांच्या पुढाकाराने पुढील मोहिमेची बांधणी लवकरच आखण्यात येईल.

टॅग्स :Puneपुणे