शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

नारायणगाव बसस्थानक समस्यांचे आगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 02:21 IST

नारायणगाव हे आगार असतानादेखील येथील एसटी़ बसस्थानकाची अत्यंत दुरवस्था झालेली आहे़ बसस्थानकात ठिकठिकाणी गळती सुरू आहे. या गळतीमुळे नारायणगाव बसस्थानक हे जीर्ण बसस्थानक झाले आहे़ या बसस्थानकातील बांधकामाच्या कॉलमलादेखील तडे गेलेले आहेत.

- सचिन कांकरिया नारायणगाव : नारायणगाव हे आगार असतानादेखील येथील एसटी़ बसस्थानकाची अत्यंत दुरवस्था झालेली आहे़ बसस्थानकात ठिकठिकाणी गळती सुरू आहे. या गळतीमुळे नारायणगाव बसस्थानक हे जीर्ण बसस्थानक झाले आहे़ या बसस्थानकातील बांधकामाच्या कॉलमलादेखील तडे गेलेले आहे़ या बसस्थानकाची त्वरित दुरुस्ती अथवा नवीन बांधकाम न केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते़ येथील बसस्थानकात येणारा प्रवासी बसस्थानकाची दयनीय अवस्था पाहून बसस्थानकात न थांबता बाहेर थांबणेच पसंत करीत आहे़पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव एसटी बसस्थानक हे प्रमुख व महत्वाचा थांबा समजला जातो़ नाशिक ते पुणे दरम्यान संगमनेरनंतर नारायणगाव हेच बसस्थानक अनेक बसेससाठी थांबा आहे़हे बस स्थानक सन १९४१-४२ मध्ये सुरू झालेले हे बसस्थानक ब्रिटिशकालिन बसस्थानक आहे. आज या बसस्थानकाची दुरवस्था झालेली आहे़या बसस्थानकामध्ये विविध राज्यातील एसटी बस या ठिकाणी येतात. यामध्ये गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यांमधील बसेस या ठिकाणी येतात़ तर बसस्थानकामध्ये दररोज ३५० बस ये-जा करतात़ जुन्नर तालुक्यासह आंबेगाव तालुक्यातील अर्धा भाग नारायणगाव आगाराशी जोडला गेलेला आहे़ आंबेगाव तालुक्यात २२६ बसेस या ठिकाणाहून ये-जा करतात़पुणे-नाशिककडे जाणाºया विनावाहक, निमआराम बसेस तसेच शिवनेरी या वातानुकूलित बसदेखील या ठिकाणी ये-जा करतात़ त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांची २४ तास वर्दळ असते़नारायणगाव हे आगार असताना देखील येथील बसस्थानक जीर्ण अवस्थेत होऊनदेखील कोणीही याबाबत दखल घेत नाही़ या बसस्थानकातील पुढील भाग खाजगी व्यक्तींनी फलक तयार केल्याने चांगला वाटतो़ परंतु आतमध्ये गेल्यानंतर प्रवासी या ठिकाणी बसण्यासदेखील तयार होत नाहीत़ बसस्थानकात ठिकठिकाणी गळती आहे़रंगकाम कधी केले होते का? हे सांगणे अवघड आहे़ छतास अनेक भागांत पाझर येऊन गळती सुरू झाली आहे़ पावसाळ्यात प्रवाशांच्या अंगावर पाणी गळत असते़बसस्थानकामध्ये बाहेरगावाहून आलेल्या चालक-वाहकांसाठी बसण्याची किंवा राहण्याची योग्य अशी व्यवस्था नाही़ प्रवाशी बसस्थानकामध्ये वाहने लावून बाहेर निघून जातात. यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही़नारायणगाव बसस्थानक अद्ययावत होणार की नाही? असा प्रश्न सर्वच प्रवाशांना पडत आहे. जर जीर्ण झालेले बसस्थानक लवकरात लवकर नव्याने बांधले गेले नाही तर भविष्यात मोठी दुर्घटना होऊ शकते़एस़ टी़ बसचे आॅफीस, कंट्रोल रूम याची दुरवस्था झालेली आहे. कॉलम बिमला तडे जाण्यास सुरूवात झालेली आहे़ ठिकठिकाणी कचरा पडून अस्वच्छता निर्माण झालेली आहे़प्रवाशांसाठी कोणतीही सुविधा नाही़ शौचालयालगत सर्व भाग दुर्गंधी युक्त झाला आहे़ ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे़ . एस़टी ़स्टॅन्डच्या मागील बाजूस दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या अवस्थेत आहेत़ तर रात्रीच्या वेळी अनेक मद्यपी आढळून येतात़या एस ़टी स्थानकात मुंबई, पुणे, नगर, ठाणे, औरंगाबाद, बारामती येथील प्रवाशांसह अन्य भागातील प्रवाशी याठिकाणी येतात़ या प्रवाशांना बस स्थानकाची दुरवस्था व अस्वच्छता पाहील्यानंतर नारायणगाव हे मोठे शहर असूनही जीर्ण असे बस स्थानक पाहून आश्चर्य व्यक्त करतात़नारायणगाव बसस्थानक हे जुने बसस्थानक आहे़ राज्य परिवहन विभागाचे विभागीय अभियंता कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वी बसस्थानकाचा सर्वे करून मोजणी केलेली आहे़ पुन्हा एकदा मुख्य मोजणी होणार आहे. मात्र अद्याप झालेली नाही. नव्याने प्लॅन तयार करून नवीन बांधकामाचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे़- महेश विटे, वाहतूक नियंत्रक, नारायणगाव बसस्थानक