शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

नारायणगाव बसस्थानक समस्यांचे आगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 02:21 IST

नारायणगाव हे आगार असतानादेखील येथील एसटी़ बसस्थानकाची अत्यंत दुरवस्था झालेली आहे़ बसस्थानकात ठिकठिकाणी गळती सुरू आहे. या गळतीमुळे नारायणगाव बसस्थानक हे जीर्ण बसस्थानक झाले आहे़ या बसस्थानकातील बांधकामाच्या कॉलमलादेखील तडे गेलेले आहेत.

- सचिन कांकरिया नारायणगाव : नारायणगाव हे आगार असतानादेखील येथील एसटी़ बसस्थानकाची अत्यंत दुरवस्था झालेली आहे़ बसस्थानकात ठिकठिकाणी गळती सुरू आहे. या गळतीमुळे नारायणगाव बसस्थानक हे जीर्ण बसस्थानक झाले आहे़ या बसस्थानकातील बांधकामाच्या कॉलमलादेखील तडे गेलेले आहे़ या बसस्थानकाची त्वरित दुरुस्ती अथवा नवीन बांधकाम न केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते़ येथील बसस्थानकात येणारा प्रवासी बसस्थानकाची दयनीय अवस्था पाहून बसस्थानकात न थांबता बाहेर थांबणेच पसंत करीत आहे़पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव एसटी बसस्थानक हे प्रमुख व महत्वाचा थांबा समजला जातो़ नाशिक ते पुणे दरम्यान संगमनेरनंतर नारायणगाव हेच बसस्थानक अनेक बसेससाठी थांबा आहे़हे बस स्थानक सन १९४१-४२ मध्ये सुरू झालेले हे बसस्थानक ब्रिटिशकालिन बसस्थानक आहे. आज या बसस्थानकाची दुरवस्था झालेली आहे़या बसस्थानकामध्ये विविध राज्यातील एसटी बस या ठिकाणी येतात. यामध्ये गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यांमधील बसेस या ठिकाणी येतात़ तर बसस्थानकामध्ये दररोज ३५० बस ये-जा करतात़ जुन्नर तालुक्यासह आंबेगाव तालुक्यातील अर्धा भाग नारायणगाव आगाराशी जोडला गेलेला आहे़ आंबेगाव तालुक्यात २२६ बसेस या ठिकाणाहून ये-जा करतात़पुणे-नाशिककडे जाणाºया विनावाहक, निमआराम बसेस तसेच शिवनेरी या वातानुकूलित बसदेखील या ठिकाणी ये-जा करतात़ त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांची २४ तास वर्दळ असते़नारायणगाव हे आगार असताना देखील येथील बसस्थानक जीर्ण अवस्थेत होऊनदेखील कोणीही याबाबत दखल घेत नाही़ या बसस्थानकातील पुढील भाग खाजगी व्यक्तींनी फलक तयार केल्याने चांगला वाटतो़ परंतु आतमध्ये गेल्यानंतर प्रवासी या ठिकाणी बसण्यासदेखील तयार होत नाहीत़ बसस्थानकात ठिकठिकाणी गळती आहे़रंगकाम कधी केले होते का? हे सांगणे अवघड आहे़ छतास अनेक भागांत पाझर येऊन गळती सुरू झाली आहे़ पावसाळ्यात प्रवाशांच्या अंगावर पाणी गळत असते़बसस्थानकामध्ये बाहेरगावाहून आलेल्या चालक-वाहकांसाठी बसण्याची किंवा राहण्याची योग्य अशी व्यवस्था नाही़ प्रवाशी बसस्थानकामध्ये वाहने लावून बाहेर निघून जातात. यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही़नारायणगाव बसस्थानक अद्ययावत होणार की नाही? असा प्रश्न सर्वच प्रवाशांना पडत आहे. जर जीर्ण झालेले बसस्थानक लवकरात लवकर नव्याने बांधले गेले नाही तर भविष्यात मोठी दुर्घटना होऊ शकते़एस़ टी़ बसचे आॅफीस, कंट्रोल रूम याची दुरवस्था झालेली आहे. कॉलम बिमला तडे जाण्यास सुरूवात झालेली आहे़ ठिकठिकाणी कचरा पडून अस्वच्छता निर्माण झालेली आहे़प्रवाशांसाठी कोणतीही सुविधा नाही़ शौचालयालगत सर्व भाग दुर्गंधी युक्त झाला आहे़ ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे़ . एस़टी ़स्टॅन्डच्या मागील बाजूस दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या अवस्थेत आहेत़ तर रात्रीच्या वेळी अनेक मद्यपी आढळून येतात़या एस ़टी स्थानकात मुंबई, पुणे, नगर, ठाणे, औरंगाबाद, बारामती येथील प्रवाशांसह अन्य भागातील प्रवाशी याठिकाणी येतात़ या प्रवाशांना बस स्थानकाची दुरवस्था व अस्वच्छता पाहील्यानंतर नारायणगाव हे मोठे शहर असूनही जीर्ण असे बस स्थानक पाहून आश्चर्य व्यक्त करतात़नारायणगाव बसस्थानक हे जुने बसस्थानक आहे़ राज्य परिवहन विभागाचे विभागीय अभियंता कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वी बसस्थानकाचा सर्वे करून मोजणी केलेली आहे़ पुन्हा एकदा मुख्य मोजणी होणार आहे. मात्र अद्याप झालेली नाही. नव्याने प्लॅन तयार करून नवीन बांधकामाचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे़- महेश विटे, वाहतूक नियंत्रक, नारायणगाव बसस्थानक