शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
2
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
3
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
4
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
5
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
6
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
7
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
8
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’
9
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
10
Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद; पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार
11
रक्तसाठा मुबलक ठेवा; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर; तातडीची बैठक : सचिवांच्या आरोग्य विभागाला सूचना
12
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
14
आयपीएल आठवडाभर स्थगित; बीसीसीआय : राष्ट्रहित सर्वांत महत्त्वाचे, नवे वेळापत्रक योग्य वेळी देणार
15
‘हॅलो, मुरली तुमचा कोण? अन् आईला भोवळ; शहीद नाईक यांचा ‘तो’ व्हिडीओ कॉल अखेरचा
16
सखे मी निघतो... परत या वाट पाहते; मेहंदीच्या हातांची ‘सिंदूर’ला पाठवणी
17
लेकीच्या वाढदिवसासाठी गावी आले; अवघ्या चार तासांतच कर्तव्यावर परतले
18
भारताचा संयम, पाकचा पर्यायांवर विचार; संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत आहेत का?
19
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
20
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

‘स्मार्ट’साठी ७ लाख वेळा प्राधान्यक्रम पसंती

By admin | Updated: October 11, 2015 04:35 IST

स्मार्ट सिटीसाठी केंद्र सरकारकडे सादर करण्याच्या प्रस्तावाच्या दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत एकूण ५० हजार जणांनी ७ लाख वेळा प्राधान्यक्रम पसंती दिली. पहिल्या टप्प्यात निश्चित

पुणे : स्मार्ट सिटीसाठी केंद्र सरकारकडे सादर करण्याच्या प्रस्तावाच्या दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत एकूण ५० हजार जणांनी ७ लाख वेळा प्राधान्यक्रम पसंती दिली. पहिल्या टप्प्यात निश्चित झालेल्या एकूण ६ समस्या कशा सोडवता येतील, यासाठी प्रत्येकी ९ उद्दिष्टांवर या दुसऱ्या टप्प्यात नागरिकांकडून प्राधान्यक्रम पसंती घेण्यात येत आहे.सोमवारपर्यंत (दि. १२) हे काम चालणार असून किमान एक लाख नागरिकांनी तरी मत नोंदवणे प्रशासनाला अपेक्षित आहे. हे सर्व मतदान आॅनलाईन म्हणजे मोबाईल किंवा टॅबवर घेतले जात आहे. त्यासाठी प्रशासनाने महापालिका कर्मचारी, विद्यार्थी अशी साधारण ८०० जणांची टीम तयार केली आहे. महापालिकेचे प्रवेशद्वार, शहरातील काही गर्दीच्या ठिकाणी यासाठी केंद्र तयार करण्यात आले असून तिथे महापालिका कर्मचारी नागरिकांकडून अर्ज लिहून घेत आहेत. विद्यार्थ्यांना शहरातील विविध वसाहतींच्या ठिकाणी पाठवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात साधारण ३ लाख नागरिकांनी याला प्रतिसाद दिला असून त्यामध्ये भविष्यातील शहर कसे असावे, याला सर्वाधिक पसंती शहर स्वच्छ असावे, याला मिळाली आहे. तसेच वाहतूक, पाणी, विद्युत अशा एकूण ६ समस्या निश्चित झाल्या होत्या. (प्रतिनिधी) आयुक्त कुणाल कुमार यांच्या प्रशासनालाही स्मार्ट सिटीमध्ये गुंतवून टाकण्यावर लोकप्रतिनिधींकडून टीका होत आहे. त्यातच आयुक्तांनी पालिकेचे उत्पन्न घटत असल्याचे स्पष्ट करीत विकासकामांवर निर्बंध टाकले असल्याने बहुसंख्य नगरसेवकांनी स्मार्ट सिटीला लक्ष्य केले आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत प्रशासनाने आपले काम सुरूच ठेवले असून आता सोमवारनंतर या प्रस्तावाचा उद्दिष्टपूर्ती कशी करायची, ते निश्चित करण्याचा तिसरा टप्पा सुरू होईल.