शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

‘अकरावी’ला प्रथम येणा-यास प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 22:59 IST

इयत्ता अकरावी प्रवेशासाठी यंदा पहिल्यांदाच ‘प्रथम येणा-या प्रथम प्राधान्य’ या तत्वानुसार आॅनलाइन प्रवेश फेरी राबविली जाणार आहे. या फेरीमध्ये गुणवत्तेचाही विचार केला जाणार असून विद्यार्थ्यांना रिक्त जागांनुसार थेट महाविद्यालय निवडता येणार आहे.

पुणे, दि. 18 -  इयत्ता अकरावी प्रवेशासाठी यंदा पहिल्यांदाच ‘प्रथम येणा-या प्रथम प्राधान्य’ या तत्वानुसार आॅनलाइन प्रवेश फेरी राबविली जाणार आहे. या फेरीमध्ये गुणवत्तेचाही विचार केला जाणार असून विद्यार्थ्यांना रिक्त जागांनुसार थेट महाविद्यालय निवडता येणार आहे. त्यासाठी गुणांच्या टक्केवारीनुसार तीन गट केले जाणार आहेत. अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठीच ही फेरी असणार आहे.

केंद्रीय प्रवेश समितीमार्फत पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेमध्ये सध्या पहिल्या विशेष फेरीतील प्रवेश सुरू आहेत. या फेरीमध्ये सुमारे ६ हजार विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी दि. १९ आॅगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यानंतर अद्याप कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांबरोबरच प्रवेश मिळूनही काही कारणांमुळे प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य’ ही फेरी घेतली जाणार आहे. या फेरीची प्रक्रिया दि. २१ आॅगस्टपासून सुरू होणार असून याबाबतचे सविस्तर वेळापत्रक, कार्यपध्दती व मार्गदर्शक सुचना दि. १९ आॅगस्ट रोजी संकेतस्थळावर प्रसिध्द केल्या जाणार आहेत. 

याविषयी अधिक माहिती देताना सहायक शिक्षण संचालिक मिनाक्षी राऊत म्हणाल्या, अकरावी प्रवेशासाठी यावर्षी पहिल्यांदाच ‘प्रथम येणाºया प्रथम प्राधान्य’ या तत्वानुसार प्रवेश फेरी राबविली जाणार आहे. पहिल्या विशेष फेरीअखेरीस सुमारे अकराशे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतील, असे दिसते. रिक्त जागांची संख्या सुमारे १५ हजार एवढी आहे. केवळ मोजक्याच महाविद्यालयांमधील काही शाखांचे प्रवेश शंभर टक्के पुर्ण झाले आहेत. तसेच प्रवेश प्रक्रियाही वेळेत संपवायची आहे. तुलनेने प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने नियमित फेरी न घेता प्रथम येणा-यास प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

‘प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य’ या फेरीमध्ये गुणवत्तेचाही विचार केला जाणार आहे. त्यासाठी ८० ते १०० टक्के, ६० ते १०० टक्के आणि ३५ ते १०० टक्के असे गुणांचे गट केले जातील. या गटानुसार अनुक्रमे विद्यार्थ्यांना रिक्त जागांनुसार महाविद्यालय निवडण्याची संधी दिली जाईल. त्यासाठी स्वतंत्र लिंक दिली जाईल. विद्यार्थ्यांना शाखा बदलण्याची संधीही मिळेल. त्यासाठी प्रत्येक गटाला वेगळा कालावधी दिला जाईल. जे विद्यार्थी प्रथम क्लिक करतील त्यांचा संबंधित महाविद्यालयातील प्रवेश निश्चित होईल. त्यानुसार रिक्त जागांचा आकडाही कमी होईल. मात्र, संबंधित विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जावून प्रवेश घेतल्याशिवाय प्रवेश अंतिम होणार नाही, असे राऊत यांनी सांगितले.

टॅग्स :Studentविद्यार्थी