शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अहिल्यादेवींच्या आदर्शाप्रमाणेच पंतप्रधान मोदी यांचे काम - देवेंद्र फडणवीस

By राजू इनामदार | Updated: May 30, 2025 18:47 IST

केंद्र सरकारचे सगळे काम हे आहिल्यादेवींच्या राज्यकारभाराप्रमाणेच आदर्श आहे असे फडणवीस यांनी थेट तुलना न करता स्पष्ट केले

पुणे: तीर्थस्थळांचा विकास, समान न्याय, महिलांची सैनिकी तुकडी, स्वदेशी शस्त्रात्रांची निर्मिती या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या आदर्श राज्यकारभाराप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही काम सुरू आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. देशात खरी आत्मनिर्भरता त्यांनीच आणली असे ते म्हणाले.

अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मत्रीशताब्दीनिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने युवा संवाद कार्यक्रमाचे शुक्रवारी दुपारी मॉडर्न महाविद्यालयाच्या मैदानात आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी उपस्थित युवकांशी संवाद साधला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हेमंत रासने, योगेश टिळेकर, युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रभारी विक्रांत पाटील, प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे व भाजपचे अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

फडणीस म्हणाले, “पतीनिधनानंतर सासरे मल्हारबा होळकर यांनी अहिल्यादेवींना सती जाऊ न देता राज्यकारभार करण्याचा आदेश दिला. तो त्यांनी पाळला. सलग २८ वर्षे त्यांनी राज्य केले. राजमाता असूनही त्यांनी साधी राहणी आचरली. त्यांनी असा कारभार केला की आजही त्याचा आदर्श कायम आहे. तीर्थस्थळांचा त्यांनी विकास केला. केंद्र सरकारला काशी विश्वेश्वर स्थळी विकासकामे करता आली, याचे कारण तिथे अहिल्यादेवींनी आधीच कितीतरी कामे केली होती. महिलांची स्वतंत्र सैनिकी तुकडी करून त्यांना संरक्षणाचे काम देणाऱ्या त्या महाराणी होत्या. शस्त्रात्रांचे संशोधन तर त्यांनी केलेच, शिवाय त्याचे कारखानेही काढले. सर्वांना समान न्याय हे त्यांच्या कामकाजाचे वैशिष्ट्य होते. त्यामुळेच २८ वर्षांच्या कार्यकाळात त्यांच्या राज्याकडे कोणीही वाकडी नजर टाकू शकले नाही.”

पंतप्रधान मोदी यांनीही ऑपरेशन सिंदूर ची ब्रिफिंग करण्याचे काम दोन महिला सैनिकी अधिकाऱ्यांना दिले. आपण विकसीत केलेल्या ब्रह्मोस या प्रणालीने पाकिस्तानचे एअरबेस उध्वस्त केले. मोदींनी राम मंदिराचे पुनर्निमाण केले. केंद्र सरकारचे सगळे काम हे आहिल्यादेवींच्या राज्यकारभाराप्रमाणेच आदर्श आहे असे फडणवीस यांनी थेट तुलना न करता स्पष्ट केले. अहिल्यादेवींच्या कामाचा आदर्श युवकांनी घ्यायला हवा. छत्रपती शिवाजी महाराज ज्याप्रमाणे महाराज असूनही कशाचाही उपभोग न घेणारे श्रीमंत योगी होते, अगदी त्याप्रमाणेच अहिल्यादेवीसुद्धा राजमाता, महाराणी असूनही अतीशय साध्या रहात असत. कोणत्याही संपत्तीचा किंवा श्रीमंतीचा त्यांनी उपभोग घेतला नाही. देवभक्ती करत त्या कारभार पहात असत असे फडणवीस म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदी