शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

अहिल्यादेवींच्या आदर्शाप्रमाणेच पंतप्रधान मोदी यांचे काम - देवेंद्र फडणवीस

By राजू इनामदार | Updated: May 30, 2025 18:47 IST

केंद्र सरकारचे सगळे काम हे आहिल्यादेवींच्या राज्यकारभाराप्रमाणेच आदर्श आहे असे फडणवीस यांनी थेट तुलना न करता स्पष्ट केले

पुणे: तीर्थस्थळांचा विकास, समान न्याय, महिलांची सैनिकी तुकडी, स्वदेशी शस्त्रात्रांची निर्मिती या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या आदर्श राज्यकारभाराप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही काम सुरू आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. देशात खरी आत्मनिर्भरता त्यांनीच आणली असे ते म्हणाले.

अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मत्रीशताब्दीनिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने युवा संवाद कार्यक्रमाचे शुक्रवारी दुपारी मॉडर्न महाविद्यालयाच्या मैदानात आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी उपस्थित युवकांशी संवाद साधला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हेमंत रासने, योगेश टिळेकर, युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रभारी विक्रांत पाटील, प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे व भाजपचे अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

फडणीस म्हणाले, “पतीनिधनानंतर सासरे मल्हारबा होळकर यांनी अहिल्यादेवींना सती जाऊ न देता राज्यकारभार करण्याचा आदेश दिला. तो त्यांनी पाळला. सलग २८ वर्षे त्यांनी राज्य केले. राजमाता असूनही त्यांनी साधी राहणी आचरली. त्यांनी असा कारभार केला की आजही त्याचा आदर्श कायम आहे. तीर्थस्थळांचा त्यांनी विकास केला. केंद्र सरकारला काशी विश्वेश्वर स्थळी विकासकामे करता आली, याचे कारण तिथे अहिल्यादेवींनी आधीच कितीतरी कामे केली होती. महिलांची स्वतंत्र सैनिकी तुकडी करून त्यांना संरक्षणाचे काम देणाऱ्या त्या महाराणी होत्या. शस्त्रात्रांचे संशोधन तर त्यांनी केलेच, शिवाय त्याचे कारखानेही काढले. सर्वांना समान न्याय हे त्यांच्या कामकाजाचे वैशिष्ट्य होते. त्यामुळेच २८ वर्षांच्या कार्यकाळात त्यांच्या राज्याकडे कोणीही वाकडी नजर टाकू शकले नाही.”

पंतप्रधान मोदी यांनीही ऑपरेशन सिंदूर ची ब्रिफिंग करण्याचे काम दोन महिला सैनिकी अधिकाऱ्यांना दिले. आपण विकसीत केलेल्या ब्रह्मोस या प्रणालीने पाकिस्तानचे एअरबेस उध्वस्त केले. मोदींनी राम मंदिराचे पुनर्निमाण केले. केंद्र सरकारचे सगळे काम हे आहिल्यादेवींच्या राज्यकारभाराप्रमाणेच आदर्श आहे असे फडणवीस यांनी थेट तुलना न करता स्पष्ट केले. अहिल्यादेवींच्या कामाचा आदर्श युवकांनी घ्यायला हवा. छत्रपती शिवाजी महाराज ज्याप्रमाणे महाराज असूनही कशाचाही उपभोग न घेणारे श्रीमंत योगी होते, अगदी त्याप्रमाणेच अहिल्यादेवीसुद्धा राजमाता, महाराणी असूनही अतीशय साध्या रहात असत. कोणत्याही संपत्तीचा किंवा श्रीमंतीचा त्यांनी उपभोग घेतला नाही. देवभक्ती करत त्या कारभार पहात असत असे फडणवीस म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदी