शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

ग्रामवर्गणीतून करणार दुष्काळावर मात, नाम फाऊंडेशन व डोणजे ग्रामस्थांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 18:38 IST

नाम फाऊंडेशन व ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून उभे राहणारे असे काम निश्चितच प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे. डोंगर उतार, खडक व मुरमाड जमीन यांच्यामुळे पाणी जिरण्याचे प्रमाण तसे कमी आहे. अशा परिस्थितीत पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून असते .

ठळक मुद्देधरणापासून जवळ असला तरी धरणापेक्षा उंच हा प्रदेश उन्हाळ्यातील पाणी टंचाई दूर होण्यास या कामाचा निश्चित उपयोग

खडकवासला: सिंहगडाच्या पायथ्याशी असलेला या परिसरात पावसाळ्यात धुवांधार पाऊस पडतो. येथील पावसाचे प्रमाण १२५० मिलिमीटर इतके आहे. या परिसरात डोंगर उतार असल्यामुळे सर्व पाणी वेगाने वाहते. परिणामी पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण कमी आहे. तसेच पाणलोट विकासाच्या कोणत्याही योजना या भागात आजतागायत राबविण्यात आल्या नाही. त्यामुळे पावसाळ्यात दोन- तीन मीटरवर असणारी भूजल पातळी उन्हाळ्यात सहा मीटरपर्यंत खालावलेली असते. डोंगर उतार, खडक व मुरमाड जमीन यांच्यामुळे पाणी जिरण्याचे प्रमाण तसे कमी आहे. अशा परिस्थितीत पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून असते. पावसाळा संपला की, शेती सिंचनासाठी जमिनीतील पाण्यावर अवलंबून राहावे लागते. परिणामी शेती करणे खर्चिक आणि अवघड जाते.  या पार्श्वभूमीवर नाम फाउंडेशनच्या सहकार्याने आणि ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून सुरू किल्ले सिंहगड पायथ्याच्या डोणजे गाव परिसरातील ओढ्याचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. लोकवर्गणीतून करण्यात येणाऱ्या या कामासाठी एक कोटी रुपये खर्च अपेक्षित असून नाम ने या कामासाठी पोकलेन दिले आहे. दैनंदिन खर्च लोकवर्गणीतून करण्यात येणार आहे. या कामानंतर ओढ्यात साखळी बंधारे बांधण्यात येणार आहे. गडाच्या पायथ्यापासून सीताबाईचा दरा येथून पुढे सहा किमी.पर्यंत या ओढ्यात काम करण्यात येणार आहे. ..........................पावसाळ्यात येथे भरपूर पाऊस पडतो. भातशेती हा येथील प्रमुख शेती पीक आहे. धरणापासून जवळ असला तरी धरणापेक्षा उंच हा प्रदेश आहे. शेतीसिंचनासाठी पाणी पुरवठ्याची कोणतीही योजना येथे नाही. पावसाळ्यातील चार महिन्यात पावसावरच येथील शेती अवलंबून आहे. पडणाऱ्या पाण्यावर पुणे जिल्ह्यातील शेती सुपीक झाली आहे. शासनाचे यासाठी कोट्यावधी रुपये खर्च होतात. तथापि शासनाने हा परिसर सुपीक होण्यासाठी विचार केलेला नाही अशी भावना येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. .......................या कामांमुळे पाण्याच्या पातळीत वाढ होवून हे पाणी नंतर उपलब्ध होते. विहिरींची पाणी पातळी सुधारण्यासाठी मदत होईल.ओढ्याच्या खोलीकरण आणि रुंदीकरणामुळे पावसाळ्यातील पाणी साठवून आणि टिकून राहील. उन्हाळ्यातील पाणी टंचाई काहीप्रमाणात दूर होण्यास या कामाचा निश्चित उपयोग होणार आहे. नाम फाऊंडेशन व ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून उभे राहणारे असे काम निश्चितच प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे.  गुलाब कडलग, मंडल कृषी अधिकारी, हवेली

टॅग्स :Puneपुणेsinhagad fortसिंहगड किल्ला