शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

ग्रामवर्गणीतून करणार दुष्काळावर मात, नाम फाऊंडेशन व डोणजे ग्रामस्थांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 18:38 IST

नाम फाऊंडेशन व ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून उभे राहणारे असे काम निश्चितच प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे. डोंगर उतार, खडक व मुरमाड जमीन यांच्यामुळे पाणी जिरण्याचे प्रमाण तसे कमी आहे. अशा परिस्थितीत पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून असते .

ठळक मुद्देधरणापासून जवळ असला तरी धरणापेक्षा उंच हा प्रदेश उन्हाळ्यातील पाणी टंचाई दूर होण्यास या कामाचा निश्चित उपयोग

खडकवासला: सिंहगडाच्या पायथ्याशी असलेला या परिसरात पावसाळ्यात धुवांधार पाऊस पडतो. येथील पावसाचे प्रमाण १२५० मिलिमीटर इतके आहे. या परिसरात डोंगर उतार असल्यामुळे सर्व पाणी वेगाने वाहते. परिणामी पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण कमी आहे. तसेच पाणलोट विकासाच्या कोणत्याही योजना या भागात आजतागायत राबविण्यात आल्या नाही. त्यामुळे पावसाळ्यात दोन- तीन मीटरवर असणारी भूजल पातळी उन्हाळ्यात सहा मीटरपर्यंत खालावलेली असते. डोंगर उतार, खडक व मुरमाड जमीन यांच्यामुळे पाणी जिरण्याचे प्रमाण तसे कमी आहे. अशा परिस्थितीत पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून असते. पावसाळा संपला की, शेती सिंचनासाठी जमिनीतील पाण्यावर अवलंबून राहावे लागते. परिणामी शेती करणे खर्चिक आणि अवघड जाते.  या पार्श्वभूमीवर नाम फाउंडेशनच्या सहकार्याने आणि ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून सुरू किल्ले सिंहगड पायथ्याच्या डोणजे गाव परिसरातील ओढ्याचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. लोकवर्गणीतून करण्यात येणाऱ्या या कामासाठी एक कोटी रुपये खर्च अपेक्षित असून नाम ने या कामासाठी पोकलेन दिले आहे. दैनंदिन खर्च लोकवर्गणीतून करण्यात येणार आहे. या कामानंतर ओढ्यात साखळी बंधारे बांधण्यात येणार आहे. गडाच्या पायथ्यापासून सीताबाईचा दरा येथून पुढे सहा किमी.पर्यंत या ओढ्यात काम करण्यात येणार आहे. ..........................पावसाळ्यात येथे भरपूर पाऊस पडतो. भातशेती हा येथील प्रमुख शेती पीक आहे. धरणापासून जवळ असला तरी धरणापेक्षा उंच हा प्रदेश आहे. शेतीसिंचनासाठी पाणी पुरवठ्याची कोणतीही योजना येथे नाही. पावसाळ्यातील चार महिन्यात पावसावरच येथील शेती अवलंबून आहे. पडणाऱ्या पाण्यावर पुणे जिल्ह्यातील शेती सुपीक झाली आहे. शासनाचे यासाठी कोट्यावधी रुपये खर्च होतात. तथापि शासनाने हा परिसर सुपीक होण्यासाठी विचार केलेला नाही अशी भावना येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. .......................या कामांमुळे पाण्याच्या पातळीत वाढ होवून हे पाणी नंतर उपलब्ध होते. विहिरींची पाणी पातळी सुधारण्यासाठी मदत होईल.ओढ्याच्या खोलीकरण आणि रुंदीकरणामुळे पावसाळ्यातील पाणी साठवून आणि टिकून राहील. उन्हाळ्यातील पाणी टंचाई काहीप्रमाणात दूर होण्यास या कामाचा निश्चित उपयोग होणार आहे. नाम फाऊंडेशन व ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून उभे राहणारे असे काम निश्चितच प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे.  गुलाब कडलग, मंडल कृषी अधिकारी, हवेली

टॅग्स :Puneपुणेsinhagad fortसिंहगड किल्ला