शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

स्पर्धा परीक्षा अाहे मनाेहर तरी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 21:04 IST

स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक प्रयत्नानंतरही काहींना अपयशाचा सामाना करावा लागताे. अशावेळी उमेदीची वर्ष या स्पर्धा परीक्षांच्या तयारीत गेल्याने अनेकांना नैराश्य येते. त्यामुळे या क्षेत्रात येण्याअाधी तुमचा प्लॅन बी तयार ठेवा असा संदेश या क्षेत्रात येणाऱ्यांना या परीक्षांची तयारी करणारे देत अाहेत.

पुणे : नुकताच युपीएससी परीक्षेचा निकाल लागला. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. दुसरीकडे ज्यांना यश मिळवता नाही अाले त्यांची परंतु निराशा झाली. अनेक वर्ष प्रयत्न करुनही यश मिळत नसल्याने काहींना नैराश्याने ग्रासलं तर काहींना हा मार्गच साेडला. अशीच परिस्थिती एमपीएससी परीक्षा देणाऱ्यांची. अायुष्यातील उमेदीची वर्ष स्पर्धा परीक्षांच्या तयारीत गेल्याने पुढे अाता करायचे काय, असा प्रश्न अनेकांना पडताे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करा, मात्र प्लॅन बी तयार ठेवा असा संदेश या क्षेत्रात येण्याची इच्छा असणाऱ्यांना या परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी देत अाहेत.     सध्या पुण्यात विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अडीच लाखांपेक्षा अधिक अाहे. यातील बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातील अाहेत. त्यातही अधिक विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातील अाहेत. अापला मुलगा तहसीलदार, कलेक्टर, अायपीएस हाेईल अाणि अापले सर्व दैन्य दूर करेल या भावेनेने ग्रामीण भागातले पालक पदरमाेड करुन अापल्या मुला-मुलीला पुण्यात या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी पाठवतात. ग्रामीण भागात बीए, बीकाॅम, बीएसस्सी या पारंपारिक काेर्सेस पलिकडे इतर व्यवसायिक काेर्सेसची संख्या कमी असते. साहजिकच तरुण बीए, बीकाॅम करुन स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचा निर्णय घेतात. परंतु तीन-चार प्रयत्नानंतरही यश न मिळाल्याने विद्यार्थ्यांना नैराश्य येत अाहे. त्यातही उमेदीची अनेक वर्ष ही तयारी मध्येच गेल्याने पुढे काय करायचे असा प्रश्न त्यांच्या समाेर उभा राहत अाहे. अनेकांचा प्लॅन बी नसताे. त्यामुळे त्यांना पुन्हा अापल्या गावाकडे परतून छाेटी माेठी कामे करावी लागत अाहेत.     ग्रामीण भागात या परीक्षांमध्ये येणाऱ्या अपयशाकडे वेगळ्या नजरेतून पाहिलं जातं. दाेन-तीनदा प्रयत्न करुनही पास न झाल्यास मुलाने पुण्याला जाऊन मजा केली, हुल्लड बाजी केली असे समजले जाते. पालकांना मुलांना पुण्यात राहण्यासाठी पैसे द्यावे लागत असल्याने कुटुंबाची अार्थिक उन्नती खुंटत अाहे. दर महा सात ते अाठ हजार रुपये अापल्या पाल्याला त्यांना द्यावे लागतात. अनेक विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षा हे अाता चक्रव्यूह वाटू लागले अाहे. एकदा यात अडकलाे की मागे फिरणे अवघड जाते. वयाच्या 28-32 वयापर्यंत अनेकांना यश मिळत नाही. परंतु ते प्रयत्न करायचे साेडत नाहीत. सातत्याने येणाऱ्या अपयशामुळे त्यांचे लग्नाचे वयही अनेकदा निघून जाते. खासकरुन मुलींना जर दाेन-तीन प्रयत्नात यश मिळाले नाही तर पुन्हा त्या घर अाणि मूल यात अडकून जात अाहेत. त्यामुळे या क्षेत्रात पाऊल टाकण्याअाधी अापला प्लॅन बी हा पक्का करा असचा सल्ला अाता हे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना देत अाहेत.     याबाबत बाेलताना निलेश निंबाळकर म्हणाला, मी गेली अनेक वर्ष स्पर्धा परीक्षांची तयारी करताेय. 12 वी नंतर गावातील अनेकांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचा सल्ला दिला म्हणून अार्टस ला अॅडमिशन घेतले. अाणि ग्रॅज्युएेशन नंतर तयारी करण्यासाठी पुण्यात अालाे. माझ्यासारखी अनेक मुले अशी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी पुण्यात येतात. परंतु यश न मिळाल्यास त्यांना निराश हाेऊन परतावे लागते. बहुतांश मुलांचा प्लॅन बी तयार नसल्याने अपयशामुळे त्यांना नैराश्य येते. त्याने ते खचून जातात. वैफल्यग्रस्त झाल्यामुळे त्यांना शेती असल्यास शेती किंवा मग गावी छाेटीमाेठी कामे करावी लागतात. ग्रामीण भागातील काहीजण ही परीक्षा देऊन माेठ्या पदांवर गेले अाहेत. त्यांची भाषणे, सेमिनारही ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये हाेत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षांचे अाकर्षण निर्माण हाेते. मला वाटतं या स्पर्धा परीक्षा म्हणजे एक भयानक चक्रव्यूह असून त्यातून बाहेर पडणे कठीण असते. त्यामुळे या क्षेत्रात येण्याअाधी प्रत्येकाने प्लॅन बी हा तयार ठेवायला हवा.     अमित मिलख याचे ही सारखेच म्हणणे अाहे. अमित हा 2013 पासून एसपीएससीची तयारी करताेय. यंदा ताे यशस्वी हाेईल अशी त्याला अाशा अाहे. परंतु अाधिच्या अनेक प्रयत्नात अपयश अाल्याने अनेकदा नैराश्य अाल्याचे ताे म्हणताे. सातत्याने अपयश अाल्यास घरच्यांचा तसेच गावाकडील लाेकांचा अापल्याकडे पाहण्याचा दृष्टीकाेन बदलताे. ही भावना खूप भायनक असते. त्यामुळे अापल्याला एकदा-दाेनदा अपयश अाल्यास अापली क्षमता लक्षात घेत वेगळा मार्ग निवडणे अावश्यक अाहे. असे त्याला वाटते. 

टॅग्स :Puneपुणेupscकेंद्रीय लोकसेवा आयोगStudentविद्यार्थीexamपरीक्षा