शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

मेंढ्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रिंगण सोहळ्याची तयारी, संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराममहाराज पालखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 00:59 IST

अवघ्या सात दिवसांनी संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराममहाराज पालखी सोहळ्यातील काटेवाडी येथे मेंढ्यांचे वैशिष्ट्यपूर्ण रिंगण सोहळा होणार आहे. या सोहळ्याची काटेवाडीमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. ग्रामपंचायत प्रशासन त्यासाठी सज्ज झाले आहे.

काटेवाडी - अवघ्या सात दिवसांनी संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराममहाराज पालखी सोहळ्यातील काटेवाडी येथे मेंढ्यांचे वैशिष्ट्यपूर्ण रिंगण सोहळा होणार आहे. या सोहळ्याची काटेवाडीमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. ग्रामपंचायत प्रशासन त्यासाठी सज्ज झाले आहे.पालखी सोहळा पोहोचल्यावर अनोख्या पद्धतीने धोतराच्या पायघड्या अंथरून स्वागत करण्यात येते. पालखी सोहळा रस्त्यानजीक असलेल्या धर्मशाळेत विसावा घेत असे कांलातराने धर्मशाळा मोडकळीस आल्याने ग्रामस्थांनी पालखी सोहळा विसाव्यासाठी गावामध्ये नेण्याचे नियोजन केले. पालखीरथ रस्त्यावर थांबवून रथामधून तुकाराममहाराजांची पालखी ग्रामस्थ खांद्यावरून गावामध्ये दर्शनासाठी घेऊन जातात. धोतराच्या पायघड्या अंथरून पालखी सोहळ्याचे स्वागत करतात. हा अनोखा स्वागत सोहळा पाहण्यासाठी वैष्णव या ठिकाणी हजेरी लावतात. दुपारी परिसरातील मेंढ्यांंचा वैशिष्ट्यपूर्ण रिंगण सोहळा पार पडतो. हा क्षण पाहण्यासाठी आबालवृद्धांसह वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. हा रिंगण सोहळा शनिवारी (दि. १४) आहे.यावेळी पालखी सोहळ्यातील पहिले रथाभोवती मेंढ्यांचे वैशिष्ट्यपूर्ण रिंगण पार पडणार आहे.बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी सूचना दिल्या आहेत. पालखी सोहळा दुपारचे भोजन व विश्रांतीसाठी येथे विसावतो. येथील दर्शनमंडपाचे नुकतेच सुशोभीकरण करण्यात आले आहे. सर्वत्र पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत. ग्रामपंचायत प्रशासन आरोग्य विभाग, वीज वितरण विभागासह ग्रामस्थ सज्ज झाले आहेत. पालखी सोहळ्याचे आगमन झाल्यावर व सोहळा पुढील मुक्कामी गेल्यावर विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती सरपंच विद्याधर काटे यांनी दिली.- राज्यात स्वच्छताग्राम म्हणून काटेवाडी गावची ओळख आहे. पालखी सोहळ्यात राज्यातून येणारा लाखो वैष्णवांचा मेळा या गावाची आवर्जून माहिती घेतो.- या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासन नियोजन करीत आहेत. ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्याची तयारी सुरू आहे. या मार्गावर दोन्ही बाजूंनी दुतर्फा केलेली वृक्षलागवड लक्षवेधी ठरली आहे.- सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा, परिसर स्वच्छता, परिसरातील विहिरीतील शुद्धीकरण, पालखी सोहळ्यात आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परिसरातील स्वच्छता करण्यात आली आहे.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या