शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

घोरपडी रेल्वे उड्डाणपुलाला प्राधान्य

By admin | Updated: October 23, 2014 05:04 IST

शहरी भाग असून पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. घोरपडी गाव आणि बाजारपेठ परिसरातील नागरिकांना सर्वाधिक भेडसावणा-या रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न सोडविण्याला मी प्राधान्य देणार आहे

पुणे : शहरी भाग असून पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. घोरपडी गाव आणि बाजारपेठ परिसरातील नागरिकांना सर्वाधिक भेडसावणा-या रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न सोडविण्याला मी प्राधान्य देणार आहे. त्यादृष्टीने आजच केंद्रीय सरंक्षण राज्यमंत्री राव इंदरजित सिंह यांच्याशी बोलणे झाले असल्याचे पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार दिलीप कांबळे यांनी सांगितले़कांबळे यांनी आज लोकमत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली़ ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांनी त्यांचे स्वागत केले़ या वेळी मतदारसंघातील प्रश्न आणि भावी योजना याविषयी त्यांनी ‘लोकमत’च्या संपादकीय सहकाऱ्यांशी संवाद साधला.या वेळी डॉ. शिवाजीराव सरोदे, रवींद्र पाटील, हरीश भाबड आणि प्रवीण ओसवाल उपस्थित होते. कांबळे म्हणाले, ‘‘घोरपडी गाव व मुंढवा येथून दोन रेल्वेमार्ग जातात़ दिवसातील १२ तासांपैकी किमान ६ तास हे रेल्वे फाटक बंद असते़ फाटक बंद असल्याने नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक यांना खूप त्रास सहन करावा लागतो़ अनेकदा रुग्णवाहिकाही त्यात अडकून पडते़ हा उड्डाणपूल व्हावा, याला मी प्राधान्य दिले असून राव इंदरजित सिंह पुण्यात आले असता त्यांना निवेदन दिले होते़ त्या वेळी त्यांनी आचारसंहिता संपल्यावर यावर कार्यवाही करू, असे आश्वासन दिले़ आज त्यांच्याशी दूरध्वनीवरून बोलल्यावर त्यांनी हे निवेदन संबंधित विभागात पुढील कार्यवाहीसाठी दिले आहे. खासदार अनिल शिरोळेही केंद्रीय पातळीवरून या विषयाचा पाठपुरावा करीत आहेत़ पुणे कॅन्टोन्मेंट, हडपसर आणि वडगाव शेरी या तिन्ही मतदारसंघांतील नागरिकांच्या दृष्टीने हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. येथील भाजपचे तिन्ही आमदार त्याचा एकत्रितपणे पाठपुरावा करू. या उड्डाणपुलाजवळ सरंक्षण खात्याची काही संवेदनशील कार्यालये असल्याचे सांगण्यात येत आहे. ती अन्यत्र हलवून इतर कार्यालये येथे आणावीत, असा प्रस्ताव संरक्षण विभागाला दिला आहे. सर्व अडथळे पार करून हा उड्डाणपूल लवकरात लवकर होईल, याला प्राधान्य देणार आहे़ ’’ते पुढे म्हणाले, ‘‘पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात झोपडपट्टीवासीयांची संख्या मोठी आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या (एसआरए) नियमावलीमध्ये अनेक त्रुटी आहेत़ त्या दूर करून तिच्या अंमलबजावणीला गती देण्याचा प्रयत्न असणार आहे. या योजनेतून बांधकाम व्यावसायिकांपेक्षा नागरिकांचा जास्त फायदा व्हावा, अशी आपली भूमिका आहे.’’विजयाविषयी कांबळे म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनांच्या पूर्तीला सुरुवात झाली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध प्रचार केला. आपणही निवडणुकीत भपका दाखविण्यापेक्षा सामान्य नागरिकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचण्यासाठी प्रयत्न केला. बूथवाईज नियोजन केले. त्यामुळे मतदारसंघात घरोघरी पोहोचणे शक्य झाले. याबरोबरच केंद्र सरकारबाबत सकारात्मक प्रतिमा होती.’’ (प्रतिनिधी)