शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
2
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
3
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
4
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
5
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
6
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
7
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
8
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
9
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
10
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
11
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
12
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
13
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
14
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
15
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
16
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
17
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
18
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
19
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
20
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली

घोरपडी रेल्वे उड्डाणपुलाला प्राधान्य

By admin | Updated: October 23, 2014 05:04 IST

शहरी भाग असून पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. घोरपडी गाव आणि बाजारपेठ परिसरातील नागरिकांना सर्वाधिक भेडसावणा-या रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न सोडविण्याला मी प्राधान्य देणार आहे

पुणे : शहरी भाग असून पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. घोरपडी गाव आणि बाजारपेठ परिसरातील नागरिकांना सर्वाधिक भेडसावणा-या रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न सोडविण्याला मी प्राधान्य देणार आहे. त्यादृष्टीने आजच केंद्रीय सरंक्षण राज्यमंत्री राव इंदरजित सिंह यांच्याशी बोलणे झाले असल्याचे पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार दिलीप कांबळे यांनी सांगितले़कांबळे यांनी आज लोकमत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली़ ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांनी त्यांचे स्वागत केले़ या वेळी मतदारसंघातील प्रश्न आणि भावी योजना याविषयी त्यांनी ‘लोकमत’च्या संपादकीय सहकाऱ्यांशी संवाद साधला.या वेळी डॉ. शिवाजीराव सरोदे, रवींद्र पाटील, हरीश भाबड आणि प्रवीण ओसवाल उपस्थित होते. कांबळे म्हणाले, ‘‘घोरपडी गाव व मुंढवा येथून दोन रेल्वेमार्ग जातात़ दिवसातील १२ तासांपैकी किमान ६ तास हे रेल्वे फाटक बंद असते़ फाटक बंद असल्याने नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक यांना खूप त्रास सहन करावा लागतो़ अनेकदा रुग्णवाहिकाही त्यात अडकून पडते़ हा उड्डाणपूल व्हावा, याला मी प्राधान्य दिले असून राव इंदरजित सिंह पुण्यात आले असता त्यांना निवेदन दिले होते़ त्या वेळी त्यांनी आचारसंहिता संपल्यावर यावर कार्यवाही करू, असे आश्वासन दिले़ आज त्यांच्याशी दूरध्वनीवरून बोलल्यावर त्यांनी हे निवेदन संबंधित विभागात पुढील कार्यवाहीसाठी दिले आहे. खासदार अनिल शिरोळेही केंद्रीय पातळीवरून या विषयाचा पाठपुरावा करीत आहेत़ पुणे कॅन्टोन्मेंट, हडपसर आणि वडगाव शेरी या तिन्ही मतदारसंघांतील नागरिकांच्या दृष्टीने हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. येथील भाजपचे तिन्ही आमदार त्याचा एकत्रितपणे पाठपुरावा करू. या उड्डाणपुलाजवळ सरंक्षण खात्याची काही संवेदनशील कार्यालये असल्याचे सांगण्यात येत आहे. ती अन्यत्र हलवून इतर कार्यालये येथे आणावीत, असा प्रस्ताव संरक्षण विभागाला दिला आहे. सर्व अडथळे पार करून हा उड्डाणपूल लवकरात लवकर होईल, याला प्राधान्य देणार आहे़ ’’ते पुढे म्हणाले, ‘‘पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात झोपडपट्टीवासीयांची संख्या मोठी आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या (एसआरए) नियमावलीमध्ये अनेक त्रुटी आहेत़ त्या दूर करून तिच्या अंमलबजावणीला गती देण्याचा प्रयत्न असणार आहे. या योजनेतून बांधकाम व्यावसायिकांपेक्षा नागरिकांचा जास्त फायदा व्हावा, अशी आपली भूमिका आहे.’’विजयाविषयी कांबळे म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनांच्या पूर्तीला सुरुवात झाली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध प्रचार केला. आपणही निवडणुकीत भपका दाखविण्यापेक्षा सामान्य नागरिकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचण्यासाठी प्रयत्न केला. बूथवाईज नियोजन केले. त्यामुळे मतदारसंघात घरोघरी पोहोचणे शक्य झाले. याबरोबरच केंद्र सरकारबाबत सकारात्मक प्रतिमा होती.’’ (प्रतिनिधी)