शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश जावडेकर म्हणतात, अरविंद केजरीवाल यांच्याबाबत मी तसं बोललोच नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 15:57 IST

पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रकाश जावडेकर यांनी पक्षाच्या दिल्लीतील पराभवाबाबत भाष्य केले.

ठळक मुद्देगोली मारो आणि भारत पाक ही विधाने भोवली,  हे शहांचं निरीक्षण बरोबर अरविंद केजरीवाल यांना आपण अतिरेकी म्हटलेच नव्हतेभाजपा हा शिकणारा पक्ष आहे. त्यामुळे आम्ही या पराभवातून योग्य तो बोध घेऊ

पुणे -  दिल्ली विधानसभा निवडणुकीत सर्व शक्ती पणाला लावूनही भारतीय जनता पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागला होता. दरम्यान, या पराभवानंतर भाजपा नेत्यांकडून पराभवाबाबत विविध कारणे समोर केली जात आहेत. त्यातच अरविंद केजरीवाल यांच्यावर केलेली बेछूट टीका, गोली मारो, भारत पाकिस्तानसारखी वक्तव्ये भाजपाला भोवल्याचे सांगण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांना आपण अतिरेकी म्हटलेच नव्हते, असा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. पुण्यात  प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रकाश जावडेकर यांनी पक्षाच्या दिल्लीतील पराभवाबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, ''अरविंद केजरीवाल हे अतिरेकी आहेत आणि त्याचे अनेक पुरावे आहेत, असे मी बोललोच नव्हतो. दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहिल्यावर काँग्रेस पक्ष दिल्लीतून लुप्त झालेला दिसत आहे. आता काँग्रेसची ही मते आपकडे वळली का हे माहीत नाही. मात्र त्यामुळे आप आणि भाजपामध्ये थेट लढत झाली. तसेच गोली मारो आणि भारत पाक ही विधाने भोवली,  हे शहांचं निरीक्षण बरोबर आहे. पण या पराभवा मागे इतरही कारणे आहेत. खरंतर भाजपा हा शिकणारा पक्ष आहे. त्यामुळे आम्ही या पराभवातून योग्य तो बोध घेऊ.''असेही जावडेकर यांनी सांगितले. 

संबंधित महत्त्वाच्या बातम्या 

Delhi Election Results : ...म्हणून केजरीवालांच्या शपथविधीला इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही

Delhi Election Results : भाजपा नेत्यांची वादग्रस्त विधाने भोवली, अमित शाह यांनी चूक कबूल केली 

गंभीर नसता तर भाजपाची अवस्था झाली असती आणखी गंभीर; जाणून घ्या कशी?दरम्यान,  केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे माजी अध्यक्ष अमित शाह यांनी पक्षाच्या पराभवाची  कारणमीमांसा केली. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पक्षाचे नुकसान झाल्याचे अमित शाह यांनी म्हटले होते. 'भाजपाच्या नेत्यांनी केलेल्या विधानांची जेवढी चर्चा केली गेली, त्या तुलनेत राहुल गांधींच्या वादग्रस्त वक्तव्यांची चर्चा झाली नाही, असा दावाही अमित शाह यांनी केला. दरम्यान, काही निवडणुकांमध्ये पराभव झाला म्हणजे जनतेचा पक्षावरील विश्वास उडाला असे होत नाही. महाराष्ट्रात आम्ही जिंकलो होतो. हरयाणात आम्ही केवळ ६ जागा गमावल्या.  नक्कीच झारखंडमध्ये आमचा पराभव झाला. तर दिल्लीच आम्ही आधीच पराभूत झालो होतो. मात्र दिल्लीत  आमच्या जागा आणि मतांची टक्केवारी वाढली,'असेही अमित शाह यांनी यावेळी सांगितले.  

टॅग्स :Prakash Javadekarप्रकाश जावडेकरdelhi electionदिल्ली निवडणूकBJPभाजपा