शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

प्रज्ञासिंह ठाकूर यांनी हेमंत करकरे नव्हे संपूर्ण पोलीस दलाचा अपमान केला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 14:18 IST

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी तत्कालीन एटीएस अधिकाऱ्यांवर मारहाणीचे आरोप केले आहेत. शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे.

पुणे : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी तत्कालीन एटीएस अधिकाऱ्यांवर मारहाणीचे आरोप केले आहेत. शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री व लोकसभा अध्यक्षांनीही प्रज्ञासिंह यांची बाजू घेतली आहे. भाजपाकडून हा केवळ एका अधिकाऱ्याचा अपमान नसून महाराष्ट्र पोलिस दलाचा अपमान केला जात असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. 

काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी, अभय छाजेड व सचिव संजय बालगुडे यांनी पत्रकार परिषदेत ही टीका केली. प्रज्ञासिंग यांनी तत्कालीन एटीएस अधिकारी व ठाण्याचे पोलिस आयुक्त परमविरसिंग यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांवर मारहाणीचे आरोप केले आहेत. प्रज्ञासिंह यांनी महाराष्ट्र पोलिसांविरूध्द तक्रार दिल्यास आपण कारवाई करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले होते. आता मुख्यमंत्री परमविरसिंग यांना अटक करणार का? असा सवाल बालगुडे यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी व लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन प्रज्ञासिंह यांची पाठराखण करतात.  महाराष्ट्र पोलिसांनी इंदौरमधील काही मुलांना अटक केली. पण त्यातील काही युवक परत आले नाहीत, असा आरोप महाजन यांनी केला आहे. या सर्व बाबी पोलिस दलाचे मानसिक खच्चीकरण करणाऱ्या  आहेत, अशी टीका जोशी यांनी केली.  

प्रज्ञासिंह यांच्या करकरेविषयीच्या वक्तव्यावर निवडणुक आयोगाने काहीच कारवाई केलेली नाही. इतर वक्तव्यांबाबतच त्यांच्यावर ७२ तासांची बंदी घालण्यात आली आहे. त्यांच्याकडून सातत्याने लोकशाही व्यवस्थेचा अपमान केला जात आहे, अशी टीका छाजेड यांनी केली.

टॅग्स :Sadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञाcongressकाँग्रेस