शहरं
Join us  
Trending Stories
1
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
2
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
3
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
4
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
5
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
6
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
7
आजपासून नेमके काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? पीएफच्या नियमांत मोठे बदल!
8
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
9
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
10
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
11
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
12
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
13
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
14
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
15
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
16
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
17
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
18
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
19
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
20
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीमुळे पाणी योजनेचा वीज पुरवठा खंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:21 IST

राजगुरुनगर: येथील नरगपरिषदेच्या पाणी पुरवठा योजनेचे तीन कोटी ८५ लाख रुपये थकीत वीज बिल न भरल्याने गुरुवारी महावितरणने ...

राजगुरुनगर: येथील नरगपरिषदेच्या पाणी पुरवठा योजनेचे तीन कोटी ८५ लाख रुपये थकीत वीज बिल न भरल्याने गुरुवारी महावितरणने या योजनेचा वीज पुरवठा खंडीत केला. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शहरातील पाणी पुरवठा बंद झाला असून नागरिकांचे हाल सुरु झाले आहे. दरम्यान, याप्रकारामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

नगरपरिषदेच्या नगरसेवकांचा पंचवार्षिक कालावधी संपला असून लवकरच निवडणूक होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या नगर परिषेदेवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नगरपरिषदेचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. त्यामध्ये १७ कोटी शिल्लक दाखवण्यात आली, असे असताना शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचे तब्ब्ल पावणेचार कोटी रुपयांची वीजबिल थकित राहिल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे ही थकीत २०१८ पासून आहे. त्यावेळी प्रशासकाची नेमणूक नव्हती त्यामुळे २०१८ पासून ते प्रशासक नेमण्याच्या कालावधीपर्यंत थकीत बिल का भरण्यात आले नाही असा प्रश्न आता नागरिकांतून उपस्थित केला जाऊ लागल आहे. दुसरीकडे शहरात पाण्याची कमतरता भासू नये यासाठी कडून प्रादेशी पाणी पुरवठा योजना तयार करण्यात येत आहे. या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. टेस्टिंग होत आहे मात्र नागरिकांना पाणी अद्याप सुरू नाही. त्याचे कोटी रुपयांचे बिल मात्र भरण्यात आले आहे. याबद्दल नागरिकांनी कार्यालयात विचारणा केली असता कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही. वीज पुरवठा खंडित केल्यानंतर किमान ३३ टक्के बिल भरणा करण्याची कंपनीची अट आहे. नगरपरिषद प्रशासनाने सायंकाळी तातडीने ३५ लाख रुपयांचा धनादेश कंपनीला दिला. उर्वरित बिलाबाबत सोमवारी (दि १५) वरिष्ठ अधिकारी निर्णय घेतील असे सांगण्यात येत आहे..यामुळे दोन दिवस पाणी पुरवठा सुरळीत ठेवला जाईल.मात्र ही टांगती तलवार आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे.खुर्चीवर बसलेले नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष व सर्वच नगरसेवक काय करीत होते. असा प्रश्न नागरिक विचारत आहे.

राजगुरूनगर नगरपरिषद सन २०१८ पासूनचे थकीत विज बिल आहे. अनेकदा पत्रव्यवहार करून सुद्धा प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून विज वितरण कंपनीने वरिष्ठ स्तराहेवरून ही कारवाई केली.

अविनाश सांवत

सहायक अभियंता,वीज वितरण कंपनी, राजगुरूनगर