शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

थकबाकीमुळे पाणी योजनेचा वीज पुरवठा खंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:21 IST

राजगुरुनगर: येथील नरगपरिषदेच्या पाणी पुरवठा योजनेचे तीन कोटी ८५ लाख रुपये थकीत वीज बिल न भरल्याने गुरुवारी महावितरणने ...

राजगुरुनगर: येथील नरगपरिषदेच्या पाणी पुरवठा योजनेचे तीन कोटी ८५ लाख रुपये थकीत वीज बिल न भरल्याने गुरुवारी महावितरणने या योजनेचा वीज पुरवठा खंडीत केला. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शहरातील पाणी पुरवठा बंद झाला असून नागरिकांचे हाल सुरु झाले आहे. दरम्यान, याप्रकारामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

नगरपरिषदेच्या नगरसेवकांचा पंचवार्षिक कालावधी संपला असून लवकरच निवडणूक होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या नगर परिषेदेवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नगरपरिषदेचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. त्यामध्ये १७ कोटी शिल्लक दाखवण्यात आली, असे असताना शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचे तब्ब्ल पावणेचार कोटी रुपयांची वीजबिल थकित राहिल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे ही थकीत २०१८ पासून आहे. त्यावेळी प्रशासकाची नेमणूक नव्हती त्यामुळे २०१८ पासून ते प्रशासक नेमण्याच्या कालावधीपर्यंत थकीत बिल का भरण्यात आले नाही असा प्रश्न आता नागरिकांतून उपस्थित केला जाऊ लागल आहे. दुसरीकडे शहरात पाण्याची कमतरता भासू नये यासाठी कडून प्रादेशी पाणी पुरवठा योजना तयार करण्यात येत आहे. या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. टेस्टिंग होत आहे मात्र नागरिकांना पाणी अद्याप सुरू नाही. त्याचे कोटी रुपयांचे बिल मात्र भरण्यात आले आहे. याबद्दल नागरिकांनी कार्यालयात विचारणा केली असता कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही. वीज पुरवठा खंडित केल्यानंतर किमान ३३ टक्के बिल भरणा करण्याची कंपनीची अट आहे. नगरपरिषद प्रशासनाने सायंकाळी तातडीने ३५ लाख रुपयांचा धनादेश कंपनीला दिला. उर्वरित बिलाबाबत सोमवारी (दि १५) वरिष्ठ अधिकारी निर्णय घेतील असे सांगण्यात येत आहे..यामुळे दोन दिवस पाणी पुरवठा सुरळीत ठेवला जाईल.मात्र ही टांगती तलवार आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे.खुर्चीवर बसलेले नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष व सर्वच नगरसेवक काय करीत होते. असा प्रश्न नागरिक विचारत आहे.

राजगुरूनगर नगरपरिषद सन २०१८ पासूनचे थकीत विज बिल आहे. अनेकदा पत्रव्यवहार करून सुद्धा प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून विज वितरण कंपनीने वरिष्ठ स्तराहेवरून ही कारवाई केली.

अविनाश सांवत

सहायक अभियंता,वीज वितरण कंपनी, राजगुरूनगर