शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पुढे ढकलणारी परीक्षा आणि जीवघेणी स्पर्धा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:09 IST

खरे पाहिले तर दोन्ही ही गटांच्या भावना योग्य होत्या कारण एकीकडे वाढते कोरोनाचे संकट, कोरोनाने बाधित विद्यार्थी, आणि त्यातच ...

खरे पाहिले तर दोन्ही ही गटांच्या भावना योग्य होत्या कारण एकीकडे वाढते कोरोनाचे संकट, कोरोनाने बाधित विद्यार्थी, आणि त्यातच दोन स्पर्धा परीक्षार्थींचे कोरोनामुळे गेलेले बळी,यामुळे भयभीत झालेले विद्यार्थी सर सलामत तो पगडी पचास म्हणत परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती करत होते; तर दुसरीकडे पाच-सहा वर्षांपासून अभ्यास करणारे ग्रामीण विशेषता दुष्काळी भागातील विद्यार्थी कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक परिस्थितीने डबघाईला आलेले होते.

पुण्यासारख्या इतर शहरांमध्ये एक महिना काढणे, या विद्यार्थ्यांना खूप कठीण जात होते. त्यासोबतच वाढत चाललेले वय, वाया जाणारे उमेदीची वर्षे, मानसिक तणाव, कोरोनाच्या सावट आणि या सावटाखाली किती दिवस जायचे, असा प्रश्न करणारे विद्यार्थी होते.

खरेतर परीक्षा पुढे ढकलणे, विद्यार्थी रस्त्यावर उतरणे हे नवे नव्हतेच. २०१४ पासून एमपीएससीला ग्रहण लागले होते. तेव्हापासूनच परीक्षाही अनियमित झाल्या होत्या, पुढे जाऊ लागल्या, आंदोलने सुरू झाली, परीक्षा ऑनलाईन घेण्याचा घाट घातला गेला, त्यातून कित्येक घोटाळे झाल्याचे निष्पन्न झाले, प्रत्येक परीक्षा कोर्टाची पायरी चढू लागली, अधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या रखडल्या, आरक्षणाचा प्रश्‍न उद्भवला आणि आता तर एमपीएससीमध्ये राजकीय हस्तक्षेप डोके वर काढू लागला ते वेगळेच. या सर्वाला जबाबदार ठरली ती राजकीय मानसिकता. हे सर्व होत असताना मात्र, विद्यार्थ्यांनी एक वास्तव समजून घेणे गरजेचे आहे.

पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ११ मार्च रोजी आंदोलने झाली. हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. परंतु, लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत, त्यामध्ये राज्यसेवा परीक्षा २०० पदांसाठी झाली आणि अर्ज केलेले विद्यार्थी २ लाख ६२ हजार एमपीएससीकडे २३ लाख विद्यार्थ्यांचे प्रोफाइल आहेत. त्यामुळे सरकारने जरी सर्व रिक्त जागा भरल्या तरी प्रत्येकाला नोकरी लागणे अशक्य आहे आणि हेच वास्तव आहे. याचा अर्थ प्रयत्नच करू नयेत अथवा अभ्यास बंद करावा किंवा या क्षेत्रात येऊ नये असे नक्कीच नाही. परंतु, या क्षेत्रात येताना आपण का? जात आहोत? आपण किती वर्षे या क्षेत्रात स्वतःला अजमावण्यासाठी द्यावेत? यश नाहीच मिळाले तर आपला काही प्लॅन बी तयार आहे का? या गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे.

कारण एमपीएससीचे हे मृगजळ अशा चक्रव्यूहामध्ये घेऊन जाते की, एक तर तेथून बाहेर निघण्यासाठी वाटा खूपच कमी आहेत आणि काहींना वाटा दिसूनही बाहेर पडता येत नाही. कारण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. कित्येक विद्यार्थी पाच-दहा वर्षांपासून अभ्यास करत आहेत. त्यांनीही अजून उमेदीचे किती वर्षे वाया घालवायचे हे ठरवायला हवे. वेळीच आपली कुवत ओळखून या मृगजळातून बाहेर पडणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षा हे अधिकारी बनण्याचे एकमेव साधन नाही. कारण प्रत्येक क्षेत्रातील काम करणारा व्यक्ती हा त्या क्षेत्रातील अधिकारीच असतो. जोपर्यंत शेतकरी, पत्रकार, व्यवसायिक, खेळाडू, यांसारखे इतर क्षेत्रातील लोक स्वतःला ‘मी अधिकारी’ संबोधत नाहीत. तोपर्यंत हे बदलणे कठीणच. कटू आहे, परंतु हे वास्तव आहे.

- किरण निंभोरे, एमपीएससी स्टुडंस् राईट