शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पुढे ढकलणारी परीक्षा आणि जीवघेणी स्पर्धा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:09 IST

खरे पाहिले तर दोन्ही ही गटांच्या भावना योग्य होत्या कारण एकीकडे वाढते कोरोनाचे संकट, कोरोनाने बाधित विद्यार्थी, आणि त्यातच ...

खरे पाहिले तर दोन्ही ही गटांच्या भावना योग्य होत्या कारण एकीकडे वाढते कोरोनाचे संकट, कोरोनाने बाधित विद्यार्थी, आणि त्यातच दोन स्पर्धा परीक्षार्थींचे कोरोनामुळे गेलेले बळी,यामुळे भयभीत झालेले विद्यार्थी सर सलामत तो पगडी पचास म्हणत परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती करत होते; तर दुसरीकडे पाच-सहा वर्षांपासून अभ्यास करणारे ग्रामीण विशेषता दुष्काळी भागातील विद्यार्थी कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक परिस्थितीने डबघाईला आलेले होते.

पुण्यासारख्या इतर शहरांमध्ये एक महिना काढणे, या विद्यार्थ्यांना खूप कठीण जात होते. त्यासोबतच वाढत चाललेले वय, वाया जाणारे उमेदीची वर्षे, मानसिक तणाव, कोरोनाच्या सावट आणि या सावटाखाली किती दिवस जायचे, असा प्रश्न करणारे विद्यार्थी होते.

खरेतर परीक्षा पुढे ढकलणे, विद्यार्थी रस्त्यावर उतरणे हे नवे नव्हतेच. २०१४ पासून एमपीएससीला ग्रहण लागले होते. तेव्हापासूनच परीक्षाही अनियमित झाल्या होत्या, पुढे जाऊ लागल्या, आंदोलने सुरू झाली, परीक्षा ऑनलाईन घेण्याचा घाट घातला गेला, त्यातून कित्येक घोटाळे झाल्याचे निष्पन्न झाले, प्रत्येक परीक्षा कोर्टाची पायरी चढू लागली, अधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या रखडल्या, आरक्षणाचा प्रश्‍न उद्भवला आणि आता तर एमपीएससीमध्ये राजकीय हस्तक्षेप डोके वर काढू लागला ते वेगळेच. या सर्वाला जबाबदार ठरली ती राजकीय मानसिकता. हे सर्व होत असताना मात्र, विद्यार्थ्यांनी एक वास्तव समजून घेणे गरजेचे आहे.

पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ११ मार्च रोजी आंदोलने झाली. हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. परंतु, लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत, त्यामध्ये राज्यसेवा परीक्षा २०० पदांसाठी झाली आणि अर्ज केलेले विद्यार्थी २ लाख ६२ हजार एमपीएससीकडे २३ लाख विद्यार्थ्यांचे प्रोफाइल आहेत. त्यामुळे सरकारने जरी सर्व रिक्त जागा भरल्या तरी प्रत्येकाला नोकरी लागणे अशक्य आहे आणि हेच वास्तव आहे. याचा अर्थ प्रयत्नच करू नयेत अथवा अभ्यास बंद करावा किंवा या क्षेत्रात येऊ नये असे नक्कीच नाही. परंतु, या क्षेत्रात येताना आपण का? जात आहोत? आपण किती वर्षे या क्षेत्रात स्वतःला अजमावण्यासाठी द्यावेत? यश नाहीच मिळाले तर आपला काही प्लॅन बी तयार आहे का? या गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे.

कारण एमपीएससीचे हे मृगजळ अशा चक्रव्यूहामध्ये घेऊन जाते की, एक तर तेथून बाहेर निघण्यासाठी वाटा खूपच कमी आहेत आणि काहींना वाटा दिसूनही बाहेर पडता येत नाही. कारण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. कित्येक विद्यार्थी पाच-दहा वर्षांपासून अभ्यास करत आहेत. त्यांनीही अजून उमेदीचे किती वर्षे वाया घालवायचे हे ठरवायला हवे. वेळीच आपली कुवत ओळखून या मृगजळातून बाहेर पडणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षा हे अधिकारी बनण्याचे एकमेव साधन नाही. कारण प्रत्येक क्षेत्रातील काम करणारा व्यक्ती हा त्या क्षेत्रातील अधिकारीच असतो. जोपर्यंत शेतकरी, पत्रकार, व्यवसायिक, खेळाडू, यांसारखे इतर क्षेत्रातील लोक स्वतःला ‘मी अधिकारी’ संबोधत नाहीत. तोपर्यंत हे बदलणे कठीणच. कटू आहे, परंतु हे वास्तव आहे.

- किरण निंभोरे, एमपीएससी स्टुडंस् राईट