शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

सकारात्मक विचारातून करू शकतो नैराश्यावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:08 IST

अचानक आलेल्या बदलांमुळे मनाचे आजार होतात. म्हणजे, जादा बोलणारा माणूस शांत हाेणे, आनंदी राहणारा माणूस दु:खी राहणे, चिडचिड ...

अचानक आलेल्या बदलांमुळे मनाचे आजार होतात. म्हणजे, जादा बोलणारा माणूस शांत हाेणे, आनंदी राहणारा माणूस दु:खी राहणे, चिडचिड होणे, भावनिक होणे, जास्त झाेपणे किंवा खाणे हे बदल जर सलग दोन आठवडे आढळले तर अशा व्यक्तींना तत्काळ मनोरुग्ण किंवा मानसोपचारतज्ज्ञांकडे घेऊन जाणे गरजेचे आहे. दुसरं असं विचारलं जातं की, नैराश्याला आपण दूर ठेवू शकतो का, सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर नकारात्मक स्वत:बद्दलचे विचार, आजूबाजूच्या वातावरणाचे विचार, भविष्याबद्दलचे विचार हे या गोष्टींमुळे नैराश्याचे प्रमाण वाढत असते. रडू येणे, उदास वाटणे, भूक न लागणे, झोप न लागणे, जास्तीचे व्यसन करणे आदी लक्षणे ही नैराश्याची आहेत. हे नैराश्य कमी करण्यासाठी चांगली जीवनशैली आत्मसात करणे आवश्यक आहे.

अजून एक गोष्ट नेहमी विचारली जाते ती म्हणजे नैराश्यातील व्यक्तींना मदत कशी करायची किंवा कोणाला मदत करायची अथवा कोणाला नाही. केली तर ती कोणत्या प्रकाराची, असे विविध प्रश्न विचारले जातात. साधारण ज्यांना नैराश्य येते त्या वेळी त्यांच्या प्रत्येक वेळी बोलायलाय हवं असं काही नाही. त्या व्यक्तीला फक्त आपण जवळ आहोत याची जाणीव करून द्या किंवा आपण बोलू शकतो हे समजावा. बऱ्याच वेळा आपण नैराश्यात असलेल्या व्यक्तीवर बोलण्यासाठी दबाव आणतो. परंतु, त्याची मानसिक स्थिती बरी नसते. त्या वेळी असा दबाव आणणे चुकीचे आहे. त्याला केवळ आपण आहोत याची जाणीव करून द्यावी, अन्यथा गडबड होऊ शकते. थोडक्यात, ते सुरक्षित असले पाहिजे आणि आपण त्यांच्या जवळ आहोत हे सांगावं. दुसरी गोष्ट म्हणजे जिमला जाणे किंवा बाहेर एखाद्या गोष्टीत त्यांना गुंतवणे आदी करू शकतो.

सध्या एक नवीन मानसिक आजार आला आहे तो म्हणजे, सोशल ॲडिक्ट, स्क्रीन टाइम. सर्वसाधारण चिंतारोग हा सर्वत्र पाहायला मिळत असतो. अनेक जण विचार असतात की, कायमस्वरूपी गोळ्या घ्यावा लागतात का, तसे काही नाही. आजार कोणत्या स्वरूपाचा आहे त्यावर औषधे किती दिवस द्यायची हे ठरवले जाते. म्हणजे काही आजारांवर कायमस्वरूपी गोळ्या घ्यावा लागतात तर काही आजारांसाठी ठराविक काळच उपचार घ्यावे लागतात. अर्थात आजार कोणता आहे त्यावरच उपचार किती दिवस घ्यावे लागतील हे ठरवले जाते, असेही डॉ. जहागीरदार यांनी सांगितले.