शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
5
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
6
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
7
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
8
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
9
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
10
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
12
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
14
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
16
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
17
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
18
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
19
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
20
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सकारात्मक विचारातून करू शकतो नैराश्यावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:08 IST

अचानक आलेल्या बदलांमुळे मनाचे आजार होतात. म्हणजे, जादा बोलणारा माणूस शांत हाेणे, आनंदी राहणारा माणूस दु:खी राहणे, चिडचिड ...

अचानक आलेल्या बदलांमुळे मनाचे आजार होतात. म्हणजे, जादा बोलणारा माणूस शांत हाेणे, आनंदी राहणारा माणूस दु:खी राहणे, चिडचिड होणे, भावनिक होणे, जास्त झाेपणे किंवा खाणे हे बदल जर सलग दोन आठवडे आढळले तर अशा व्यक्तींना तत्काळ मनोरुग्ण किंवा मानसोपचारतज्ज्ञांकडे घेऊन जाणे गरजेचे आहे. दुसरं असं विचारलं जातं की, नैराश्याला आपण दूर ठेवू शकतो का, सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर नकारात्मक स्वत:बद्दलचे विचार, आजूबाजूच्या वातावरणाचे विचार, भविष्याबद्दलचे विचार हे या गोष्टींमुळे नैराश्याचे प्रमाण वाढत असते. रडू येणे, उदास वाटणे, भूक न लागणे, झोप न लागणे, जास्तीचे व्यसन करणे आदी लक्षणे ही नैराश्याची आहेत. हे नैराश्य कमी करण्यासाठी चांगली जीवनशैली आत्मसात करणे आवश्यक आहे.

अजून एक गोष्ट नेहमी विचारली जाते ती म्हणजे नैराश्यातील व्यक्तींना मदत कशी करायची किंवा कोणाला मदत करायची अथवा कोणाला नाही. केली तर ती कोणत्या प्रकाराची, असे विविध प्रश्न विचारले जातात. साधारण ज्यांना नैराश्य येते त्या वेळी त्यांच्या प्रत्येक वेळी बोलायलाय हवं असं काही नाही. त्या व्यक्तीला फक्त आपण जवळ आहोत याची जाणीव करून द्या किंवा आपण बोलू शकतो हे समजावा. बऱ्याच वेळा आपण नैराश्यात असलेल्या व्यक्तीवर बोलण्यासाठी दबाव आणतो. परंतु, त्याची मानसिक स्थिती बरी नसते. त्या वेळी असा दबाव आणणे चुकीचे आहे. त्याला केवळ आपण आहोत याची जाणीव करून द्यावी, अन्यथा गडबड होऊ शकते. थोडक्यात, ते सुरक्षित असले पाहिजे आणि आपण त्यांच्या जवळ आहोत हे सांगावं. दुसरी गोष्ट म्हणजे जिमला जाणे किंवा बाहेर एखाद्या गोष्टीत त्यांना गुंतवणे आदी करू शकतो.

सध्या एक नवीन मानसिक आजार आला आहे तो म्हणजे, सोशल ॲडिक्ट, स्क्रीन टाइम. सर्वसाधारण चिंतारोग हा सर्वत्र पाहायला मिळत असतो. अनेक जण विचार असतात की, कायमस्वरूपी गोळ्या घ्यावा लागतात का, तसे काही नाही. आजार कोणत्या स्वरूपाचा आहे त्यावर औषधे किती दिवस द्यायची हे ठरवले जाते. म्हणजे काही आजारांवर कायमस्वरूपी गोळ्या घ्यावा लागतात तर काही आजारांसाठी ठराविक काळच उपचार घ्यावे लागतात. अर्थात आजार कोणता आहे त्यावरच उपचार किती दिवस घ्यावे लागतील हे ठरवले जाते, असेही डॉ. जहागीरदार यांनी सांगितले.