शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
2
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
3
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
4
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...
5
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?
6
Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान!
7
एल्विशची सिस्टम हँग होणार! सापाचे विष आणि ड्रग्जच्या वापराप्रकरणात युट्यूबरला कोर्टाचा दणका
8
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
9
पाकिस्तानात आज पुन्हा भूकंपाचे धक्का; ७ दिवसांत तिसऱ्यांदा हादरली पाकची जमीन
10
सचिन वर्सेस विराट; कसोटीत कोण ठरलं भारी! इथं पाहा खास रेकॉर्ड
11
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
12
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"
13
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
14
"देशात परिस्थिती काय अन् ही थायलंडमध्ये...", नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगमुळे भारती सिंहला रडू कोसळलं
15
व्यवसायातही कोहलीची 'विराट' कामगिरी; फक्त टॅक्सच ६६ कोटींचा भरला; नेटवर्थ किती असेल?
16
अरेच्चा! तालिबान सरकारने अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर घातली बंदी, कारण...
17
7 मे रोहित अन् 12 मे विराट; टेस्ट क्रिकेटमधून 'ROKO' युगाचा अंत, अशी होती दोघांची कारकीर्द
18
हैदराबादच्या प्रसिद्ध 'कराची बेकरी'ची तोडफोड; पाकिस्तानविरोधी घोषणा देत केली 'ही' मागणी
19
लग्नाच्या पहिल्याच रात्री पती टेरेसवर झोपला, नववधूचा शाळेपासूनचा प्रियकर आला, अन्...
20
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार

सकारात्मक विचारातून करू शकतो नैराश्यावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:08 IST

अचानक आलेल्या बदलांमुळे मनाचे आजार होतात. म्हणजे, जादा बोलणारा माणूस शांत हाेणे, आनंदी राहणारा माणूस दु:खी राहणे, चिडचिड ...

अचानक आलेल्या बदलांमुळे मनाचे आजार होतात. म्हणजे, जादा बोलणारा माणूस शांत हाेणे, आनंदी राहणारा माणूस दु:खी राहणे, चिडचिड होणे, भावनिक होणे, जास्त झाेपणे किंवा खाणे हे बदल जर सलग दोन आठवडे आढळले तर अशा व्यक्तींना तत्काळ मनोरुग्ण किंवा मानसोपचारतज्ज्ञांकडे घेऊन जाणे गरजेचे आहे. दुसरं असं विचारलं जातं की, नैराश्याला आपण दूर ठेवू शकतो का, सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर नकारात्मक स्वत:बद्दलचे विचार, आजूबाजूच्या वातावरणाचे विचार, भविष्याबद्दलचे विचार हे या गोष्टींमुळे नैराश्याचे प्रमाण वाढत असते. रडू येणे, उदास वाटणे, भूक न लागणे, झोप न लागणे, जास्तीचे व्यसन करणे आदी लक्षणे ही नैराश्याची आहेत. हे नैराश्य कमी करण्यासाठी चांगली जीवनशैली आत्मसात करणे आवश्यक आहे.

अजून एक गोष्ट नेहमी विचारली जाते ती म्हणजे नैराश्यातील व्यक्तींना मदत कशी करायची किंवा कोणाला मदत करायची अथवा कोणाला नाही. केली तर ती कोणत्या प्रकाराची, असे विविध प्रश्न विचारले जातात. साधारण ज्यांना नैराश्य येते त्या वेळी त्यांच्या प्रत्येक वेळी बोलायलाय हवं असं काही नाही. त्या व्यक्तीला फक्त आपण जवळ आहोत याची जाणीव करून द्या किंवा आपण बोलू शकतो हे समजावा. बऱ्याच वेळा आपण नैराश्यात असलेल्या व्यक्तीवर बोलण्यासाठी दबाव आणतो. परंतु, त्याची मानसिक स्थिती बरी नसते. त्या वेळी असा दबाव आणणे चुकीचे आहे. त्याला केवळ आपण आहोत याची जाणीव करून द्यावी, अन्यथा गडबड होऊ शकते. थोडक्यात, ते सुरक्षित असले पाहिजे आणि आपण त्यांच्या जवळ आहोत हे सांगावं. दुसरी गोष्ट म्हणजे जिमला जाणे किंवा बाहेर एखाद्या गोष्टीत त्यांना गुंतवणे आदी करू शकतो.

सध्या एक नवीन मानसिक आजार आला आहे तो म्हणजे, सोशल ॲडिक्ट, स्क्रीन टाइम. सर्वसाधारण चिंतारोग हा सर्वत्र पाहायला मिळत असतो. अनेक जण विचार असतात की, कायमस्वरूपी गोळ्या घ्यावा लागतात का, तसे काही नाही. आजार कोणत्या स्वरूपाचा आहे त्यावर औषधे किती दिवस द्यायची हे ठरवले जाते. म्हणजे काही आजारांवर कायमस्वरूपी गोळ्या घ्यावा लागतात तर काही आजारांसाठी ठराविक काळच उपचार घ्यावे लागतात. अर्थात आजार कोणता आहे त्यावरच उपचार किती दिवस घ्यावे लागतील हे ठरवले जाते, असेही डॉ. जहागीरदार यांनी सांगितले.