शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

Pune | मुलींच्या वसतिगृहात निकृष्ट जेवण; मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील प्रकार

By अजित घस्ते | Updated: April 8, 2023 17:18 IST

मेरिटनुसार शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतल्यानंतर या विद्यार्थ्यांना साेयी-सुविधांऐवजी विविध समस्यांचाच सामना करावा लागत आहे...

पुणे : शासनाचा काेट्यवधींचा खर्च हाेऊनही शासकीय वसतिगृहांत मुला-मुलींना ना धड राहण्याची सुविधा व्यवस्थित मिळते, ना जेवण चांगले मिळते. हीच स्थिती आंबेगाव कात्रज येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात अनुभवायला येत आहे.

घरची परिस्थिती बेताची असल्याने अनेकांना शिक्षण अर्धवट साेडून मिळेल ते राेजगार करत असतात. आवड असूनही परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही. आज किमान शासकीय वसतिगृहांमुळे राहणे आणि जेवणाची सोय हाेते म्हणून तरी काही गरीब विद्यार्थी शिक्षणासाठी गावाबाहेर पडण्याचे धाडस करू शकतात.

मेरिटनुसार शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतल्यानंतर या विद्यार्थ्यांना साेयी-सुविधांऐवजी विविध समस्यांचाच सामना करावा लागत आहे. जेवणाचा दर्जा सुधारून सामाजिक न्याय मिळणार का, असा प्रश्न सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह खडकवासला आंबेगाव कात्रज येथील विद्यार्थिनी विचारत आहेत. याबाबत वरिष्ठांना तक्रार केली, तर धमकावत असल्याने नाईलाजास्तव मुली गप्प बसतात, असे येथील विद्यार्थिनींनी नाव न छापण्याच्या अटींवर सांगितले.

१०० क्षमता असलेल्या मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहातील जेवणाचा दर्जा दिवसेंदिवस खराब होत आहे. याबाबत वसतिगृह प्रमुखाकडे तक्रारी घेऊन गेल्यावर आम्हालाच रागावले जाते. तुमच्या कारवाई केली जाईल, असे सांगितले जात असल्याने कितीही समस्या असल्या तरी तक्रार करण्याचे धाडस काेणी करत नाही, असे मुलींनी सांगितले.

वसतिगृहातील समस्या

- जेवणाचा दर्जा नाही की, सरकारी नियमांप्रमाणे मेनू नाहीत

- ग्रंथालयाची सोय नाही

जेवणासाठी प्रतिविद्यार्थी मिळतात ४,८०० रुपये

- सामाजिक न्याय विभागातील वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी जेवणासाठी दरमहा ४,८०० रुपये दिले जातात. यात नाष्टा, दूध, चहा, दोन वेळचे जेवण आदींचा समावेश असतो. जेवणात पापड, लोणचे, सॅलेड, रविवारी चिकन/मटन, शुक्रवारी अंडाकरी असा समावेश असणे अपेक्षित आहे.

जेवणाच्या दर्जाबाबत काही तक्रार असेल त्याची नोंद घेऊन आवश्यक सुधारणा केली जाईल. याबाबत तेथील गृहपाल यांना सूचना देण्यात येईल.

- संगीता डावखर, सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग, पुणे

 

जेवणाच्या दर्जाबाबत मी तक्रार केली असता वसतिगृहप्रमुख माझ्यावरच खडसावल्या. त्यानंतर मी सामाजिक न्याय विभागाच्या पुणे कार्यालयात जाऊन तक्रार केले. ते प्रमुखांना समजले आणि त्या मला खूप बोलल्या. माझ्या सोबत असणाऱ्या मैत्रिणींनाही बोलल्या. तेव्हापासून त्या मुलीही माझ्याशी बोलत नाहीत. तेव्हापासून आम्ही तक्रार न करता जे समाेर येईल ते खात आहाेत.

- त्रस्त विद्यार्थिनी

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे