शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

कुरकुंभकरांना प्रदूषणाचा त्रास, ग्रामीण भागातील प्रदूषणाकडे दुर्लक्ष?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 03:20 IST

नुकत्याच दिल्लीत झालेल्या प्रदूषणाच्या प्रश्नावर सर्वत्र गोंधळ माजला आहे. देशाची राजधानी व मोठ्या राजकीय उलाढालीचे शहर म्हणून कदाचित दिल्लीतील प्रदूषणावर उच्चस्तरीय उपाययोजना राबविण्याचा प्रयत्न झाला.

कुरकुंभ : नुकत्याच दिल्लीत झालेल्या प्रदूषणाच्या प्रश्नावर सर्वत्र गोंधळ माजला आहे. देशाची राजधानी व मोठ्या राजकीय उलाढालीचे शहर म्हणून कदाचित दिल्लीतील प्रदूषणावर उच्चस्तरीय उपाययोजना राबविण्याचा प्रयत्न झाला. दिल्लीसारख्या मोठ्या शहरात वाढत्या लोकसंख्येने या प्रदूषणाच्या प्रश्नावर आणखीनच गंभीर स्वरूप धारण केले आहे. दिल्लीत पसरणारे धूर व धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. याचाच परिणाम म्हणून अगदी शाळा बंद ठेवाव्या लागल्या होत्या.याच्या विपरीत परिस्थिती ग्रामीण भागात दिसते. कुरकुंभ (ता. दौंड) येथे असणारा रासायनिक प्रकल्प व त्यातून होणारे जीवघेणे प्रदूषण याबाबत जणू सामान्य माणसाचे जीवन धोक्यात घालण्याचे प्रमाणपत्र मिळाले असल्याच्या दिमाखात येथील कारखानदार व त्यांचे अधिकारी वावरत आहेत.तीस वर्षांपेक्षा जास्त काळापासून येथील नागरिक रासायनिक प्रदूषणाच्या समस्येपासून त्रस्त आहेत. विविध आजार व व्याधी अंगावर घेऊन जीवन व्यतित करीत असताना याकडे राजकीय व प्रशासकीय दुर्लक्ष कसे जाणूनबुजून करण्यात आले याचा प्रत्यय सध्या कुरकुंभ येथील नागरिक घेत आहेत.केंद्र सरकार एकीकडे नद्या स्वच्छ करण्यासाठी करोडो रुपये खर्च करून मोठ्या स्वरूपाचे देशपातळीवर योजना-आराखडे तयार करत असून, यावर वेगळ्या मंत्रालयामार्फत काम केले जात आहे. मात्र औद्योगिक मंत्रालयाला लागलेली कुंभकर्णी झोप काही केल्या उडत नाही याचे जिवंत उदाहरण म्हणजे कुरकुंभ येथील रासायनिक प्रकल्प. गेल्या तीस वर्षांत एकाही उद्योग मंत्र्याने किंवा त्याच्या संबंधातील कुठल्याही उच्चस्तरीय अधिकाºयाने याची दखल घेतलेली नाही.ग्रामस्थांच्या या लढ्यातून संघर्ष करता करता दुसºया पिढीकडे याचे नेतृत्व आले. मात्र कदाचित याला आता उशीर झाला आहे. कुरकुंभ येथील नैसर्गिक पाण्याचा स्रोत हा कायमचा खराब झाला आहे. कुरकुंभ येथील लोकसंख्या आता पाण्यासाठी परावलंबी झालेली आहे. कुरकुंभ औद्योगिक विकास मंडळाकडून होणाºया पाणीपुरवठ्यावर निर्भर राहावे लागत असून, जवळ असणाºया पाण्याचा वापर करणे शक्य नसल्याचे वास्तव चित्र कुरकुंभ व परिसरात पाहावयास मिळते.सामाजिक चळवळ उभी व्हावीपाण्याच्या प्रदूषित होण्याबरोबरच हवेतील प्रदूषणदेखील मोठे आवाहन बनून समोर उभे ठाकत आहे. मोठ्या स्वरूपात होणाºया रासायनिक अभिक्रिया व त्यासाठी विविध रसायनांचा होत असणारा अतिरेक वापर यातून मोठ्या प्रमाणात हवा दूषित होत आहे. मात्र, याचा दुरुपयोग प्रत्यक्ष कुरकुंभ येथील नागरिक व चतुर्थ श्रेणीत काम करणाºया कामगारांना होत आहे.एकंदरीतच काय, तर शहरी व ग्रामीण भागात होणाºया कारवायांमध्ये किती मोठ्या प्रमाणात फरक असतो हे दिसून येते. त्यामुळे यासाठी लागणारे राजकीय नेतृत्व खंबीर असण्याची गरज आहे. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सामाजिक चळवळ उभी करणेदेखील आवश्यक आहे.

टॅग्स :Puneपुणे