शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
4
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
5
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
6
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
7
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
8
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
9
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
10
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
11
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
12
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
13
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
14
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
15
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
16
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
17
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
18
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
19
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
20
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर

उमेदवार संख्येनुसार मतदान यंत्रे

By admin | Updated: January 31, 2017 03:59 IST

चार सदस्यांचा एक प्रभाग यामुळे राजकीय बदल तर झालेच; पण प्रशासनालाही बरेच वाढीव काम लागले आहे. मतदान केंद्रांची संख्या तर वाढलीच आहे; पण आता एखाद्या प्रभागातील

पुणे : चार सदस्यांचा एक प्रभाग यामुळे राजकीय बदल तर झालेच; पण प्रशासनालाही बरेच वाढीव काम लागले आहे. मतदान केंद्रांची संख्या तर वाढलीच आहे; पण आता एखाद्या प्रभागातील ‘अ’, ‘ब’, ‘क’ किंवा ‘ड’ अथवा चारही गटांत उमेदवारांची संख्या वाढली, तर मतदान यंत्रांची संख्याही वाढणार आहे. तसेच प्रत्येक मतदाराला चार मते देणे बंधनकारक असून एखाद्या गटात मतदान करायचे नसेल, तर तिथेही त्याला नोटाचा (नकाराधिकार) पर्याय वापरावाच लागेल.प्रत्येक प्रभागात ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’, असे चार गट आहेत. मतदान यंत्रावर ‘अ’चे उमेदवार, त्यानंतर एक कोरी पट्टी व नंतर ‘ब’ गटाचे उमेदवार याप्रमाणे सर्व गटांचे उमेदवार या प्रकारे मतदान यंत्रावर रचना असेल. प्रमुख राजकीय पक्षांचे प्रत्येक गटात चार उमेदवार जमेस धरता एका प्रभागात १६ अधिकृत उमदेवार तेच होतात. त्यानंतर अन्य राजकीय पक्षांचे उमेदवार येतील. मतदान यंत्रावर उमेदवाराचे पूर्ण नाव, त्याला दिलेले चिन्ह व त्यापुढे मतदान करण्याकरिता बटण असेल. एका मतदान केंद्रावर ७०० मतदार याप्रमाणे एकूण ११ लाख ९९ हजार ४७ मतदारांसाठी साधारण १६१४ मतदान केंद्रे, त्यात ६ हजारांपेक्षा अधिक मतदान यंत्रे असतील. एका केंद्रावर किमान ६ कर्मचारी याप्रमाणे १२ हजार कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत असतील. या सर्वांचे नियोजन करण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये, खासगी कार्यालये यातून कर्मचारी घेण्यात आले आहेत. या सर्वांना तीन टप्प्यांत निवडणूक प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात येईल. शहरातील काही सोसायट्यांमध्येही मतदानाची सोय करण्यात येणार आहे.(प्रतिनिधी) एका यंत्राची क्षमता १५ नावांची : नोटासाठी एक जागाएका मतदान यंत्राची क्षमता १५ नावांची आहे. त्यातील एक नाव नकाराधिकारासाठी (नोटा) असेल. म्हणजे एका यंत्रावर १४ नावे असतील. त्यामुळेच प्रत्येक मतदान केंद्रात किमान २ मतदान यंत्रे असतील. हीच संख्या ६ हजारांपेक्षा जास्त आहे. त्यातच एखाद्या प्रभागातील एखाद्या गटात उमेदवारांची संख्या जास्त असेल, तर तिथे जास्त मतदान यंत्रे लागू शकतात. उमेदवारांची नावे अंतिम होताच निवडणूक शाखेला मतदान यंत्रांच्या संख्येचा अंदाज घेऊन तेवढ्या यंत्रांची मागणी निवडणूक आयोगाकडे नोंदवावी लागेल. यंत्रावर उमेदवाराच्या चिन्हाबरोबरच त्याचे छायाचित्रही असावे, अशी मागणी आहे. त्यासाठी प्रयत्नही सुरू आहेत; मात्र ते शक्य झालेले नाही.चार मते दिल्यावरच प्रक्रिया पूर्ण होणार : मतदाराने चार मते दिल्याशिवाय त्याची मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही. चार मते दिल्यानंतरच केंद्राधिकाऱ्याच्या समोरच्या यंत्रावर ‘बीप’ असा आवाज येईल. तीन किंवा दोनच मते दिली, तर असा आवाज येणार नाही. त्यामुळे एखाद्या मतदाराला दोनच मते देऊन बाहेर यायचे असेल, तर ते शक्य नाही. त्याला उर्वरित गटांसाठी ‘नोटा’चा म्हणजे नकाराधिकाराचा पर्याय वापरावाच लागेल. त्यानंतरच त्याची मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल. मतदार हा पर्याय वापरत नसेल, तर केंद्राधिकारी त्याला तशी विनंती करून मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगतील.