शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

Pune | वेताळ टेकडी बचावसाठी राजकीय नेते मैदानात; १५ एप्रिल रोजी महामोर्चा

By श्रीकिशन काळे | Updated: March 24, 2023 19:07 IST

पौड रस्ता ते बालभारती या प्रस्तावित रस्त्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे...

पुणे : टेकड्या या पुण्याचे फुप्फुसे आहेत. त्यांच्यावर घाला घातला जात असेल, तर आम्ही निश्चितच विरोध करू. ज्या कारणासाठी टेकडी फोडली जाणार आहे, त्याचा उद्देशच साध्य होणार नसेल, तर अडीचशे कोटींचा खर्च कशाला करायचा? हा प्रश्न आहे. यामध्ये नक्कीच भ्रष्टाचाराचा वास येत आहे. त्या विरोधात उभे राहू आणि वेताळ टेकडी बचावासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन काँग्रेस, राष्ट्रवादी, आम आदमी पक्ष, मनसे व भाजपच्या मेधा कुलकर्णी यांनी दिले आहे.

पौड रस्ता ते बालभारती या प्रस्तावित रस्त्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रस्तावित रस्त्यामुळे वेताळ टेकडीचे नुकसान होणार आहे. प्रकल्पासाठी २५६ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. ही टेकडी वाचावी म्हणून निसर्गप्रेमी एकत्र आले आहेत.

वेताळ टेकडी बचाव मोहिमेअंतर्गत टेकडीप्रेमींकडून सर्वपक्षीय नेत्यांना भेटून या प्रकल्पाची माहिती देण्यात आली. त्यामध्ये नक्की काय होणार आहे? लॉ कॉलेज रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा प्रकल्प प्रस्तावित केला असला, तरी रस्ता झाल्यास काहीच फायदा होणार नाही. तरीदेखील महापालिका हा प्रकल्प रेटत आहे, असा आरोप टेकडीप्रेमींनी केला आहे.

सर्वपक्षीय नेत्यांना भेटलो !

या बचाव मोहिमेच्या सुमिता काळे म्हणाल्या, सगळ्याच पक्षांच्या लोकप्रतिनिधींना आम्ही भेटून आम्ही आपली बाजू समजावून सांगत आहोत. गेल्या काही आठवड्यांमध्ये, काहींच्या मदतीने, आम्ही विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला आणि त्यापैकी काहींनी आम्हाला भेटायला बोलवले होते. आतापर्यंत अनिल शिदोरे (मनसे), मेधा कुलकर्णी (भाजप), दीपक मानकर (राष्ट्रवादी काँग्रेस), दत्ता बहिरट, मोहन जोशी, अरविंद शिंदे, रमेश बागवे आणि अभय छाजेड (काँग्रेस) यांच्याशी संवाद साधला. त्यांनीही आम्हाला पाठिंबा दिला आहे.

निषेध मोर्चा

पुणे महापालिका वेताळ टेकडीवर तीन प्रकल्पांचे नियोजन करत आहे. त्यामुळे टेकडीचे नुकसान होणार आहे. याच्या निषेधार्थ १५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता वेताळ बाबा चौक, सेनापती बापट रस्ता ते जर्मन बेकरीदरम्यान निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.

या रस्त्यामुळे वाहतूक कोंडी फुटणारच नसेल, तर प्रकल्प कशाला राबवीत आहे. एवढे कोटी रुपये कशाला खर्च केले जात आहेत. या प्रकल्पात भ्रष्टाचाराचा वास येतोय. त्यामुळे या प्रकल्पाविरोधात आम्ही वरिष्ठ पातळीवर चर्चा करू आणि १५ एप्रिलच्या मोर्चामध्ये सहभागी होऊ.

- अरविंद शिंदे, काँग्रेस

वेताळ टेकडी फोडणे हा विकास नाही, तर विनाश आहे. एवढं तुमच्या सरकारला व आयुक्त विक्रम कुमार यांना तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी म्हणून सांगावं अशी विनंती आहे. दादा, पुण्यात चाललेला विक्रम-वेताळ हा खेळ तत्काळ थांबवावा... अन्यथा हे वेताळ टेकडी नावाचं भूत भारतीय जनता पक्षाच्या डोक्यावर कधी बसेल हे कळणारदेखील नाही.

- डॉ. अभिजित मोरे, आम आदमी पार्टी

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड