शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

Pune | वेताळ टेकडी बचावसाठी राजकीय नेते मैदानात; १५ एप्रिल रोजी महामोर्चा

By श्रीकिशन काळे | Updated: March 24, 2023 19:07 IST

पौड रस्ता ते बालभारती या प्रस्तावित रस्त्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे...

पुणे : टेकड्या या पुण्याचे फुप्फुसे आहेत. त्यांच्यावर घाला घातला जात असेल, तर आम्ही निश्चितच विरोध करू. ज्या कारणासाठी टेकडी फोडली जाणार आहे, त्याचा उद्देशच साध्य होणार नसेल, तर अडीचशे कोटींचा खर्च कशाला करायचा? हा प्रश्न आहे. यामध्ये नक्कीच भ्रष्टाचाराचा वास येत आहे. त्या विरोधात उभे राहू आणि वेताळ टेकडी बचावासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन काँग्रेस, राष्ट्रवादी, आम आदमी पक्ष, मनसे व भाजपच्या मेधा कुलकर्णी यांनी दिले आहे.

पौड रस्ता ते बालभारती या प्रस्तावित रस्त्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रस्तावित रस्त्यामुळे वेताळ टेकडीचे नुकसान होणार आहे. प्रकल्पासाठी २५६ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. ही टेकडी वाचावी म्हणून निसर्गप्रेमी एकत्र आले आहेत.

वेताळ टेकडी बचाव मोहिमेअंतर्गत टेकडीप्रेमींकडून सर्वपक्षीय नेत्यांना भेटून या प्रकल्पाची माहिती देण्यात आली. त्यामध्ये नक्की काय होणार आहे? लॉ कॉलेज रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा प्रकल्प प्रस्तावित केला असला, तरी रस्ता झाल्यास काहीच फायदा होणार नाही. तरीदेखील महापालिका हा प्रकल्प रेटत आहे, असा आरोप टेकडीप्रेमींनी केला आहे.

सर्वपक्षीय नेत्यांना भेटलो !

या बचाव मोहिमेच्या सुमिता काळे म्हणाल्या, सगळ्याच पक्षांच्या लोकप्रतिनिधींना आम्ही भेटून आम्ही आपली बाजू समजावून सांगत आहोत. गेल्या काही आठवड्यांमध्ये, काहींच्या मदतीने, आम्ही विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला आणि त्यापैकी काहींनी आम्हाला भेटायला बोलवले होते. आतापर्यंत अनिल शिदोरे (मनसे), मेधा कुलकर्णी (भाजप), दीपक मानकर (राष्ट्रवादी काँग्रेस), दत्ता बहिरट, मोहन जोशी, अरविंद शिंदे, रमेश बागवे आणि अभय छाजेड (काँग्रेस) यांच्याशी संवाद साधला. त्यांनीही आम्हाला पाठिंबा दिला आहे.

निषेध मोर्चा

पुणे महापालिका वेताळ टेकडीवर तीन प्रकल्पांचे नियोजन करत आहे. त्यामुळे टेकडीचे नुकसान होणार आहे. याच्या निषेधार्थ १५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता वेताळ बाबा चौक, सेनापती बापट रस्ता ते जर्मन बेकरीदरम्यान निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.

या रस्त्यामुळे वाहतूक कोंडी फुटणारच नसेल, तर प्रकल्प कशाला राबवीत आहे. एवढे कोटी रुपये कशाला खर्च केले जात आहेत. या प्रकल्पात भ्रष्टाचाराचा वास येतोय. त्यामुळे या प्रकल्पाविरोधात आम्ही वरिष्ठ पातळीवर चर्चा करू आणि १५ एप्रिलच्या मोर्चामध्ये सहभागी होऊ.

- अरविंद शिंदे, काँग्रेस

वेताळ टेकडी फोडणे हा विकास नाही, तर विनाश आहे. एवढं तुमच्या सरकारला व आयुक्त विक्रम कुमार यांना तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी म्हणून सांगावं अशी विनंती आहे. दादा, पुण्यात चाललेला विक्रम-वेताळ हा खेळ तत्काळ थांबवावा... अन्यथा हे वेताळ टेकडी नावाचं भूत भारतीय जनता पक्षाच्या डोक्यावर कधी बसेल हे कळणारदेखील नाही.

- डॉ. अभिजित मोरे, आम आदमी पार्टी

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड