शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

पोलीस ठाणे मदत केंद्र व्हावे

By admin | Updated: April 5, 2015 00:46 IST

ब्रिटिशकालीन पोलिसांची तत्कालीन नागरिकांना भीती वाटायची. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजही तशी परिस्थिती काही प्रमाणात कायम आहे.

वारजे : ब्रिटिशकालीन पोलिसांची तत्कालीन नागरिकांना भीती वाटायची. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजही तशी परिस्थिती काही प्रमाणात कायम आहे. यात बदल घडवून पोलीस ठाण्याकडे समाजासाठी मदत केंद्र म्हणून पाहण्याची गरज आहे, असे मत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. खडकवासला (उत्तमनगर) पोलीस ठाण्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार भीमराव तापकीर, पोलीस आयुक्त सतीश माथूर, अपर आयुक्त संजय कुमार, चंद्रशेखर दैठणकर, अब्दुल रेहमान, सहआयुक्त शहाजी सोळुंके, सहायक आयुक्त अरविंद पाटील, निरीक्षक सूयर्कांत पवार, गणपत पिंगळे, विजय देशमुख, कल्लापा पुजारी आदी उपस्थित होते. उत्तमनगरच्या सरपंच सुमन पंडित या मात्र व्यासपीठाखाली सातव्याआठव्या रांगेत बसल्या होत्या. बापट म्हणाले, की जास्त पोलीस असणे हेदेखील समाजाला भूषवाह नाही. नुसतीच त्यांची संख्या वाढवूनही प्रश्न सुटत नाहीत. समाजाचा पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. सामाज व पोलीस एकमेकांच्या हातात हात घालून पुढे जावे. पोलीस समजाचाच एक घटक आहे, ही भावना रुढीस लागली पाहिजे. ‘पीएमआरडीए’च्या माध्यामातून जिल्ह्यासाठी व खडकवासलासाठी निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाहीही यांनी दिली. आमदार तापकीर म्हणाले, की पोलीस ठाण्याची हद्द ४० किमीपर्यंत लांब आहे. त्यामुळे जसे सिंहगड पोलीस ठाण्यात पोलिसांची संख्या कमी आहे, त्याचप्रमाणे इथेही कमी आहे. त्याकडे आयुक्तांनी लक्ष द्यावे. (प्रतिनिधी)1 खडकवासला व उत्तमनगरच्या नावाच्या गोंधळाबाबत बापट म्हणाले, की ज्याप्रमाणे मुलाचे पाळण्यातील नाव व बोली भाषेतील नावे वेगळी असतात; तसेच या पोलीस ठाण्याच्या नावाबाबत झाले आहे. नाव जरी खडकवासला असले, तरी पोलिसांनी पाठविलेल्या उत्तमनगर नावाचा प्रस्ताव लवकरच शासनाकडून मान्य करून आणू. 2 आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत बापट म्हणाले, कार्यकर्तादशेत आपणास अनेकदा अटक झाली होती. त्या वेळेस पत्नी - आपण कुठल्या चौकीत आहोत, हे पाहायला येत असे. आज तिला मुद्दाम कार्यक्रमाला आणले आहे व आज अटक नाही वेगळेच नाटक आहे, असे म्हणताच हशा पिकला.