शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पोलीस ठाणे मदत केंद्र व्हावे

By admin | Updated: April 5, 2015 00:46 IST

ब्रिटिशकालीन पोलिसांची तत्कालीन नागरिकांना भीती वाटायची. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजही तशी परिस्थिती काही प्रमाणात कायम आहे.

वारजे : ब्रिटिशकालीन पोलिसांची तत्कालीन नागरिकांना भीती वाटायची. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजही तशी परिस्थिती काही प्रमाणात कायम आहे. यात बदल घडवून पोलीस ठाण्याकडे समाजासाठी मदत केंद्र म्हणून पाहण्याची गरज आहे, असे मत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. खडकवासला (उत्तमनगर) पोलीस ठाण्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार भीमराव तापकीर, पोलीस आयुक्त सतीश माथूर, अपर आयुक्त संजय कुमार, चंद्रशेखर दैठणकर, अब्दुल रेहमान, सहआयुक्त शहाजी सोळुंके, सहायक आयुक्त अरविंद पाटील, निरीक्षक सूयर्कांत पवार, गणपत पिंगळे, विजय देशमुख, कल्लापा पुजारी आदी उपस्थित होते. उत्तमनगरच्या सरपंच सुमन पंडित या मात्र व्यासपीठाखाली सातव्याआठव्या रांगेत बसल्या होत्या. बापट म्हणाले, की जास्त पोलीस असणे हेदेखील समाजाला भूषवाह नाही. नुसतीच त्यांची संख्या वाढवूनही प्रश्न सुटत नाहीत. समाजाचा पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. सामाज व पोलीस एकमेकांच्या हातात हात घालून पुढे जावे. पोलीस समजाचाच एक घटक आहे, ही भावना रुढीस लागली पाहिजे. ‘पीएमआरडीए’च्या माध्यामातून जिल्ह्यासाठी व खडकवासलासाठी निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाहीही यांनी दिली. आमदार तापकीर म्हणाले, की पोलीस ठाण्याची हद्द ४० किमीपर्यंत लांब आहे. त्यामुळे जसे सिंहगड पोलीस ठाण्यात पोलिसांची संख्या कमी आहे, त्याचप्रमाणे इथेही कमी आहे. त्याकडे आयुक्तांनी लक्ष द्यावे. (प्रतिनिधी)1 खडकवासला व उत्तमनगरच्या नावाच्या गोंधळाबाबत बापट म्हणाले, की ज्याप्रमाणे मुलाचे पाळण्यातील नाव व बोली भाषेतील नावे वेगळी असतात; तसेच या पोलीस ठाण्याच्या नावाबाबत झाले आहे. नाव जरी खडकवासला असले, तरी पोलिसांनी पाठविलेल्या उत्तमनगर नावाचा प्रस्ताव लवकरच शासनाकडून मान्य करून आणू. 2 आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत बापट म्हणाले, कार्यकर्तादशेत आपणास अनेकदा अटक झाली होती. त्या वेळेस पत्नी - आपण कुठल्या चौकीत आहोत, हे पाहायला येत असे. आज तिला मुद्दाम कार्यक्रमाला आणले आहे व आज अटक नाही वेगळेच नाटक आहे, असे म्हणताच हशा पिकला.