शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

कोरोना महामारीत लांबलेल्या पोलीस भरतीला अखेर मुहुर्त; १४ हजार जागांसाठी होणार मेगा भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 19:35 IST

भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण

बारामती : कोरोनासह विविध कारणांमुळे २०१९ पासून लांबलेल्या पोलीस भरती प्रक्रियेला अखेर मुहुर्त मिळाला आहे. राज्यात मेगा पोलीस भरती प्रक्रिया सुरू अखेर सुरु होणार आहे. त्यामुळे भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

बहुप्रतिक्षीत पोलीस भरती प्रक्रिया ३ नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. त्याबाबतचे परिपत्रक पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके यांनी प्रसिध्द केले आहे. त्यानुसार फक्त पोलीस शिपाई पदांसाठीची ही भरती प्रक्रिया १४९५६ जागांसाठी आहे. राज्य राखीव पोलीस दल व पोलीस वाहन चालक यांची या व्यतीरिक्त स्वतंत्र भरती प्रक्रिया त्याच वेळी सुरू होणार आहे. त्यामुळे जागांमध्ये काही बदल होऊ शकतो. पोलीस शिपाई पदासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया ३ नोव्हेंबर पासून ३० नोव्हेंबर पर्यंत म्हणजेच साधरणत: २७ दिवस असणार आहे.

पोलीस शिपाई पदासांठी होणाऱ्या या भरतीप्रक्रियेमध्ये प्रथम ५० गुणांची शारीरीक चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. ही लेखी परीक्षा मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यातील पोलीस घटकांची एकाच दिवसी आयोजित केली जाणार आहे. शारीरीक चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार ११० प्रमाणात १०० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी पात्र असणार आहेत. लेखी परीक्षेत सुध्दा किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य केले आहे. अशा प्रकारे उमेदवारांची अंतिम निवड शारीरीक चाचणी व लेखी परीक्षा अशा एकूण १५० गुणांमधून केली जाणार आहे.

बारामतीतील सह्याद्री करीअर अकॅडमीचे संचालक उमेश रूपनवर यांनी सांगितले की,  सन २०१९  पासून कोरोना महामारीमुळे व इतर कारणांनी पोलीस भरती प्रक्रिया लांबत गेली होती. उमेदवार खुप आशेने या भरती प्रक्रियेची वाट पाहत होते. शासनाने सर्वात मोठी भरती प्रक्रिया सुरू केल्यामुळे उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शहरासह ग्रामीण भागातील तरुणांनी यासाठी मोठी तयारी केली आहे. यामध्ये मुली देखील मागे नाहीत. कोरोनानंतर सरकारी नोकरीचे महत्व अधोरेखित झाले आहे. त्यामुळे या भरतीसाठी मोठी उत्सुकता असल्याचे रुपनवर म्हणाले.

टॅग्स :BaramatiबारामतीPoliceपोलिसexamपरीक्षाGovernmentसरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या