शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
3
सिगरेट, पान मसाला, तंबाखू महागणार, नवीन कर आणि सेस लागू होणार; १ फेब्रुवारीपासून किंमत वाढणार? जाणून घ्या
4
आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा
5
दोन वर्षांत १४ लाख पाकिस्तान्यांनी देश सोडला! कारण काय?
6
१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा
7
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
8
दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
9
नवे वर्ष २०२६: आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या वर्षात करा 'हे' ५ उपाय!
10
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
11
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
12
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
13
शिंदेसेनेच्या २, उद्धवसेना, काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द, ७१९ उमेदवार रिंगणात
14
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
15
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
16
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
17
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
18
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
19
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
20
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा जनसंवाद उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:12 IST

धनकवडी : कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणे आणि परिसरात शांतता राखण्यासाठी पोलीस व नागरिकांमध्ये आवश्यक असलेला संवाद घडवण्यासाठी भारती ...

धनकवडी : कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणे आणि परिसरात शांतता राखण्यासाठी पोलीस व नागरिकांमध्ये आवश्यक असलेला संवाद घडवण्यासाठी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याने आयोजित केलेल्या जनसंवाद या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

जनहित फौंडेशन आणि सिद्धिविनायक ग्रुपने सावंत विहार परिसरातील सोसायटी समूहाची जनसंवाद अंतर्गत बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी नागरिकांशी विविध विषयांवर संवाद साधला. यानिमित्ताने कोरोनाकाळात नागरिकांना सेवा देणारे आरोग्य निरीक्षक, महावितरणचे कर्मचारी, सुरक्षारक्षक, स्वच्छता दूत हे कोरोना योध्दे व्याख्याते संदीप चव्हाण, शिवभक्त अपूर्वा ठाकरे, आनंदा कांबळे, भगवान शिंदे व गिरीराज सावंत यांचा सत्कार केला.

सर्जेराव बाबर म्हणाले, पोलीस आणि नागरिकांत सतत संवाद होणे आवश्यक आहे. नागरिक पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत राहिले तर समाजात विश्वासाचे वातावरण निर्माण होईल.

जगन्नाथ कळसकर म्हणाले, सोसायट्यांनी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे ही काळाची गरज आहे. खात्रीचे सुरक्षारक्षक नेमणे आणि सदैव सतर्क राहण्याचे आवाहन केले.

लोकसहभागातून कायदा, सुव्यवस्था अबाधित ठेवणे आणि परिसरातील शांतता कायम ठेवण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे.

सोसायटी समुह, वसाहती, दाट लोकवस्ती परिसरात या उपक्रमात विभागवार बैठका घेण्यात येत आहेत.

सावंत विहार फेज तीन येथे ॲड. दिलिप जगताप यांनी जनसंवाद बैठकिचे संयोजन केले होते. यावेळी फेज एक, दोन व तीन, सिक्स सेंन्स, सनशाईन, अजिंक्य समृध्दी, शामाप्रसाद आदी सोसायट्यांचे

अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि पदाधिकारी, महिला ज्येष्ठ नागरिक, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे शांतता समिती सदस्य आणि महिला दक्षता समितीच्या सदस्या उपस्थित होत्या.

फोटो ओळ : जनसंवाद अंतर्गत बैठकीमध्ये सहायक पोलिस आयुक्त सर्जेराव बाबर, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.