शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

पोलीस दल अधिक लोकाभिमुख करणार

By admin | Updated: October 26, 2015 01:58 IST

न्यायालयामध्ये दोषारोपसिद्धीचे प्रमाण वाढवणे हा आमचा पहिला उद्देश असून, निर्दोष सुटणाऱ्या खटल्यांच्या कारणांचा अभ्यास करून शिक्षेचे प्रमाण वाढवण्यासाठी तक्रारदार

पुणे : न्यायालयामध्ये दोषारोपसिद्धीचे प्रमाण वाढवणे हा आमचा पहिला उद्देश असून, निर्दोष सुटणाऱ्या खटल्यांच्या कारणांचा अभ्यास करून शिक्षेचे प्रमाण वाढवण्यासाठी तक्रारदार, साक्षीदार आणि पंचनाम्याची व्हिडीओग्राफी करून ‘डिजिटल एव्हीडेन्स’ तयार करण्याच्या सूचना राज्यातील सर्व पोलिसांना देण्यात आल्याची माहिती पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी रविवारी पत्रकारांना दिली.पुण्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आलेल्या दीक्षितांनी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची रविवारी बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गुन्ह्यांमध्ये शिक्षा लागावी यासाठी शासनाने सक्त आदेश दिले आहेत. पोलिसांकडूनही मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू असून, सीआयडीचेही विशेष प्रयत्न सुरू आहेत. बऱ्याचदा तक्रारदार, पंच आणि साक्षीदार फितूर होतात, तसेच न्यायालयाच्या मनात शंका निर्माण केल्या जातात, त्यामुळे या सर्वांचे व्हिडीओ चित्रीकरणाच्या सूचना देण्यात आल्याचे दीक्षित म्हणाले. पोलीस ठाणे स्तरावर शांतता मोहल्ला कमिट्यांच्या माध्यमातून कम्युनिटी पोलिसींग चालत होते. मात्र, त्याच्याही पलीकडे जात आता पोलिसांच्या कामात नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी ‘पोलीस मित्र’ ही संकल्पना प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. समाजाच्या सर्व स्तरातील घटक, सशक्त ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि चांगल्या वर्तणुकीचे नागरिक व महिला यामध्ये सहभागी होऊ शकतात. ज्यांना पोलिसांसोबत काम करण्याची इच्छा आहे, त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये नाव व मोबाईल क्रमांक नोंदवावेत, असेही दीक्षित यांनी सांगितले. या पोलीस मित्रांची मदत नाकाबंदी, गस्त, छेडछाड रोखणे, वाहतूक नियमन यासाठी होणार आहे.