शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

पोलीसच करताहेत जीव मुठीत धरून काम, भिंती झाल्या आहेत जीर्ण, डोक्यावर अधांतरी कुजलेले पत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:14 AM

ज्या पोलिसांनी नागरिकांचे रक्षण करायचे त्यांनाच भाड्याच्या खोलीत राहून जीव मुठीत घेऊन काम करावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

वालचंदनगर : ज्या पोलिसांनी नागरिकांचे रक्षण करायचे त्यांनाच भाड्याच्या खोलीत राहून जीव मुठीत घेऊन काम करावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील पोलीस ठाणे नाव वालचंदनगरचे मात्र पोलीस ठाणे जंक्शन, अंथुर्णे हद्दीत आहे. या पोलीस ठाण्याची ओळख करून देण्यासाठी नावाचे बोर्डही नसल्याने अनेकांना घर आहे का पोलीस ठाणे आहे, हे कळत नाही. या पोलीस ठाण्याला स्वत:ची इमारत नसल्याने स्थापनेपासून २ रुपये भाड्याच्या खोल्यांत कामकाज करण्याची वेळ आली आहे. छतावरील पत्रे कुजल्याने व जीर्ण भिंती झाल्याने जीव मुठीत धरून गळक्या खोल्यांत पोलिसांना कामकाज करावे लागत आहे.या पोलीस ठाण्याला स्वतंत्र इमारत करण्यात यावी, अशी येथील कर्मचाºयांची मागणी गेल्या १५ वर्षांपासून होताना दिसत आहे. २७ पोलीस ठाण्याच्या स्थापनेपासून हे पोलीस ठाणे चार खोल्यांच्या मासिक १० रुपये भाडेतत्त्वावर आहे. कोणतीही डागडुजी करणे अवघड झाल्याने जीर्ण भिंती गळक्या इमारतीतच कर्मचाºयांना कामकाज करण्याची वेळ ओढवली आहे. या पोलीस ठाण्याला नवीन स्वतंत्र इमारत व पोलीस वसाहती निर्माण करण्यासाठी शासनाने ८० लाख रुपये देऊन ५ एकर जमीन देण्यात आली. परंतु, अनेक अधिकारी आले गेले, तालुक्याचे प्रतिनिधीही बदलले तरीही इमारत झालेली नाही. या पोलीस ठाण्याचे उद्घाटन तत्कालीन पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण व खासदार कै. शंकरराव बाजीराव पाटील यांच्या हस्ते सन ५ आॅगस्ट १९९० मध्ये करण्यात आलेले आहे.या खोल्या शेती महामंडळाच्या मालकीच्या आहेत. त्यामुळे डागडुजी करण्यात अनेक अडथळे निर्माण होत आहेत. जुने पत्रे एकावर एक टाकून दिवस काढण्याची वेळ येथील कर्मचाºयांवर आली आहे. पावसाळ्यात सर्वत्र पाणी या खोल्यांमध्ये येते, यामुळे महत्त्वाची कागदपत्रे भिजण्याची भीती आहे.१५ वर्षांपूर्वी शेती महामंडळाला पोलीस ठाण्याच्या नियोजित नवीन इमारतीसाठी शासनाने ५ एकरांसाठी ८० लाख रुपये मोजलेले आहेत. त्यांची जागा निश्चित न झाल्याने व योग्य निधी उपलब्ध न झाल्याने गेल्या २७ वर्षांपासून पोलीस कर्मचाºयांना आपल्या हक्काच्या वसाहतीपासून वंचित राहावे लागले आहे.>१५ वर्षांपासून मागणी प्रलंबित...स्वत:ची इमारत नसल्याने स्थापनेपासून २ रुपये भाड्याच्या खोल्यांत कामकाज करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे हक्काच्या इमारतीची अद्यापही प्रतीक्षा आहे. छतावरील पत्रे कुजल्याने व जीर्ण भिंती झाल्याने जीव मुठीत धरून गळक्या खोल्यांत पोलिसांना कामकाज करावे लागत आहे. ही परिस्थिती कधी बदलणार?या पोलीस ठाण्याला स्वतंत्र इमारत करण्यात यावी, अशी येथील कर्मचाºयांचीमागणी गेल्या १५ वर्षांपासून होताना दिसत आहे. मात्रअद्याप ती पूर्ण झाली नाही.