शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पोखरी घाटही धोकादायक, अपघाताला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 01:11 IST

सुरक्षेची काळजी न घेतल्याने दापोली येथे भीषण अपघाताची घटना घडली. येऊ घातलेल्या भीमाशंकर यात्रेच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यातील पोखरी घाटाची पाहणी केली असता हा घाटही धोकादायक ठरू शकतो, असे चित्र आहे.

डिंभे : सुरक्षेची काळजी न घेतल्याने दापोली येथे भीषण अपघाताची घटना घडली. येऊ घातलेल्या भीमाशंकर यात्रेच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यातील पोखरी घाटाची पाहणी केली असता हा घाटही धोकादायक ठरू शकतो, असे चित्र आहे. पोखरी घाटातील अवघड वळणे व तीव्र उतार असून संरक्षक भिंतीची गरज आहे. अरुंद रस्ता व दिवसेंदिवस घाटातून वाढू लागलेली वाहतुकीची वर्दळ यामुळे हा घाटरस्ता वाहतुकीसाठी अपुरा पडत आहे. परंतु, याकडे सातत्याने दुर्लक्षच होत आहे. आंबेगाव तालुक्यातील मंचर-भीमाशंकर रस्त्यावरील पोखरी घाट. श्रीक्षेत्र भीमाशंकरकडे जाण्यासाठी मंचर-भीमाशंकर एकमेव मार्ग आहे. या रस्त्यावर डिंभे गावच्या पुढे जवळपास १० किलोमीटरवर घाट सुरू होतो. या संपूर्ण घाटात सात अवघड वळणे लागत असल्याने ‘सातमाळी’ घाट म्हणूनही त्याची ओळख आहे. या घाटातील वळणांवर अनेक ठिकाणी रस्त्याच्या वरच्या बाजू कमकुवत झाल्या आहेत. अनेकदा या घाटात पावसाळ्यामध्ये दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. पावसाळा, श्रावण महिना, महाशिवरात्री, कोजागरी पौर्णिमा, दिवाळी व उन्हाळी सुट्यांच्या दरम्यानही या रस्त्यावर सतत वाहतुकीची वर्दळ असते.सुमारे ३५ वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामात विशेष अशी सुधारणा झालेली नाही. अवघड वळणांवरील तीव्र उतार सध्या वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहेत. या घाटात अनेकदा छोटे-मोठे अपघात घडत असतात. अरुंद रस्त्यामुळे एसटी बस, लक्झरी बस यासारख्या मोठ्या वाहनांमुळे या घाटात अनेकदा वाहतुकीचा खोळंबा होत आहे.घाटातील कमलजामाता मंदिराजवळ असणाऱ्या वळणावर एसटी बस व वारकºयांचा ट्रक उलटून मोठे अपघात घडल्याच्या घटना घडल्या आहेत. गोहे गावापासून माथ्यावरील राजेवाडी गावापर्यंत घाटास संरक्षक भिंत बांधण्याची अनेकदा मागणी करण्यात आली आहे. मात्र, याकडे आजपर्यंत दुर्लक्षच होत आहे. भीमाशंकर विकास आराखड्याप्रमाणेच या घाटातील रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर झाला आहे. मात्र, कामाला अद्यापही सुरुवात झाली नाही. या घाटातील धरण पॉर्इंटपासून पुढे अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत.>ज्योतिर्लिंगांना जोडणारे रस्ते १० मीटरपर्यंत रूंद करून नॅशनल हायवे अंतर्गत घाट रस्त्याच्या कामास परवानगी मिळणार होती. मात्र अद्याप बांधकाम विभागाकडे कोणतीही परवानगी मिळाली नाही. सध्या घाटातील खड्डे भरणे, गटारे साफ करण आदी कामे बांधकाम विभागाकडून केली आहेत. रस्त्यावर बेअरींग उभी करणे खालच्या बाजूने वॉल कंपाऊंड बांधणे इत्यादी कामे करावी लागणार आहेत. दर तीन वर्षांनी घाट तस्त्याचे डांबरीकरण होणे गरजचे आहे. मात्र या घाट रस्त्यावर मोठ्या स्वरूपाची कामे होण्यासाठी निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे.- एल. टी. डाके, उप अभियंता बांधकाम विभाग (घोडेगाव)

पोखरी घाटाच्या रुंदीकरणासह या घाटास संरक्षक भिंत बांधणे, अवघड वळणांवरील उतार कमी करण्यासाठी वारंवार शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. भीमाशंकरमुळे या रस्त्यावर सतत वर्दळ असते. मोठी वाहने पार होताना नेहमीच अडथळे निर्माण होतात. अनेकदा अपघातही झाले आहेत. एक-दोनदा भाविकांच्या लक्झरी बसचे गंंभीर अपघात होता-होता वाचले आहेत. या घाटरस्त्याला संरक्षक भिंत होणे अतिशय गरजेचे आहे.- मारुती भवारीपुणे जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा