शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
2
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
3
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?
4
UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक
5
IND vs SA World Cup Final: भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
6
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप
7
Tarot Card: नवा उत्साह, चैतन्य आणि आशादायी चित्र घेऊन येणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
8
ग्रहण योग-अशुभ पंचकात कार्तिकी एकादशी: १० राशींचा भाग्योदय-भरघोस भरभराट; विठुराया शुभ करेल!
9
Wife च्या नावे पोस्टाच्या या स्कीममध्ये ₹८०००, ५ वर्षांत होईल धनवर्षाव; पाहा कमाईचं संपूर्ण गणित
10
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
11
“कार्तिकी एकादशीच्या महापूजेपूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले”: एकनाथ शिंदे
12
LPG Cylinder Price Cut:आजपासून गॅस सिलिंडरची किंमत झाली कमी, पाहा तुमच्या शहरात काय आहेत नवे दर?
13
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
14
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
15
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
16
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
17
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
18
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
19
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
20
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची

आपल्या भवतालचा आवाजच असते कविता! - कल्पना दुधाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 03:40 IST

महाराष्ट्र फाउंडेशनचा ललित ग्रंथ पुरस्कार कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या ‘धग असतेच आसपास’ या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद आहेच; मात्र प्रतिष्ठित पुरस्कारांचे दडपणही येते. कवितासंग्रह लिहायचा किंवा कविता करायची, असे म्हणून कविता करता येत नाही.

महाराष्ट्र फाउंडेशनचा ललित ग्रंथ पुरस्कार कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या ‘धग असतेच आसपास’ या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद आहेच; मात्र प्रतिष्ठित पुरस्कारांचे दडपणही येते. कवितासंग्रह लिहायचा किंवा कविता करायची, असे म्हणून कविता करता येत नाही. आपल्या भवतालच्या परिस्थितीतून कविता उत्स्फूर्तपणे जन्माला येत असते. कवीने आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहिले पाहिजे. परिस्थितीच्या, भवतालच्या संवेदना मनाला भिडल्या तरच कविता कागदावर उतरते, असे मत दुधाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आनंद तर झाला आहेच; मात्र, अशा पुरस्कारांचे काहीसे दडपणही जाणवते. प्रतिष्ठित पुरस्कारांबद्दल बरेच काही ऐकले होते. पण, ते आपल्या इतके जवळ येतील, असे कधीच वाटले नव्हते. पुरस्कारांचा संबंध केवळ शहरी लोकांपुरताच मर्यादित असतो, असा समज सर्वदूर पसरलेला आहे. त्यामुळे शेतात काम करणाºया, मातीत रमणाºया व्यक्तींपर्यंत पुरस्कार पोहोचणे खूप अनोखे असते. हा केवळ माझा सन्मान नसून माझ्यासह शेतात राबणाºया गोरगरिबांचा हा सन्मान आहे.मी पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील कारकिर्दीची स्वप्ने रंगवत होते. एवढे शिक्षण घेतल्यानंतर शेती करायची नाही, असे मनाशी ठरवून टाकले होते. शिक्षणाची हवा डोक्यात गेली होती, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तरीही नाईलाजाने मला शेती करावी लागली. जे टाळायचे होते, तेच करण्याची वेळ ओढवल्याने मनात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली होती. कवितेच्या माध्यमातून अस्वस्थतेला वाचा फुटत गेली. मनातील भावना कवितांच्या रूपाने बाहेर पडू लागल्या. कवितेमुळेच शेतीची कधी आणि कशी गोडी लागत गेली हे कळलेच नाही. कालांतराने मी शेतीतच रमू लागले. तेच माझे विश्व बनले.माझ्याभोवती जे घडते, त्यातूनच कविता सुचत जाते. शेती, मातीतले वास्तव कवितेच्या माध्यमातून मूर्तरूप धारण करते. ‘सिझर कर म्हणते माती’ हा माझा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. शेतीमध्ये दररोज अनेक प्रयोग केले जात आहेत. रासायनिक खतांचा वापर, नवे तंत्रज्ञान यामुळे कृत्रिमता निर्माण झाल्याने मातीची नैसर्गिकता हरवत चालली आहे. मातीवर अतिक्रमण होऊ घातले आहे, या विचारांतून शेतात काम करत असतानाच मला ही कविता सुचली. पुढे अशाच कविता सुचत गेल्या आणि कवितासंग्रह तयार झाला. ‘धग असतेच आसपास’ ही कविताही अशीच भोवतालचे वातावरण अनुभवत असताना सुचलेली. आपल्या आजूबाजूची माणसे, वातावरण यात धग धुमसत असतेच; त्याची झळ आपल्यापर्यंत पोचू द्यायची की त्यातून मार्ग काढायचा, हे आपल्याच हातात असते, अशी भावना या कवितेतून उमटली.कविता लिहायची, असे मी काहीच ठरवले नव्हते. माझे अनुभवविश्व, बदलते वास्तव, समाजातील प्रश्न, माणसे यातून कविता आपोआप सुचत गेल्या. कोणाची कविता चांगली किंवा वाईट, असे ठरवता येत नाही. प्रत्येकाचे अनुभवविश्व, वैचारिक दृष्टिकोन याप्रमाणे त्या त्या कवितेचा बाज ठरत जातो. कवितेसाठी साधना, रियाज किंवा अभ्यास गरजेचा असतो की नाही, मला माहीत नाही.स्वत:पुरतेच बोलायचे झाले, तर मी कवितेचा कोणताही अभ्यास केला नाही. कारण, कविता संवेदनशीलतेतून प्रकटते. कवितेत कोणताही अभिनिवेश असता कामा नये. मी शहरी बाजाची कविता लिहायची ठरवल्यास ती सुचणारच नाही. कारण, मी ते वातावरण अनुभवलेच नसेल, तर त्या भावना माझ्या मनाला भिडणारच नाहीत.कवी संमेलनांच्या माध्यमातून रसिकांसमोर सादरीकरण करण्याची संधी मिळते. माझ्या कवितेतील बहुतांश शब्द ग्रामीण ढंगाचे असल्याने ग्रामीण भागातील लोकांना ते पटकन भावतात. त्या तुलनेत, शहरी भागातील रसिकांना त्या समजून घ्याव्या लागतात. मात्र, एखाद्याला कविता समजावी, म्हणून ती सोप्या भाषेत लिहिणे शक्य नसते. कवीने आपल्या अनुभवांशी प्रामाणिक असले पाहिजे.आपण आपल्या भावनांशी प्रामाणिक असू, तर कविमन आपल्याला साथ देते आणि कविता स्फुरत जातात. कवितांचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो.

टॅग्स :Puneपुणे