शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या भवतालचा आवाजच असते कविता! - कल्पना दुधाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 03:40 IST

महाराष्ट्र फाउंडेशनचा ललित ग्रंथ पुरस्कार कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या ‘धग असतेच आसपास’ या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद आहेच; मात्र प्रतिष्ठित पुरस्कारांचे दडपणही येते. कवितासंग्रह लिहायचा किंवा कविता करायची, असे म्हणून कविता करता येत नाही.

महाराष्ट्र फाउंडेशनचा ललित ग्रंथ पुरस्कार कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या ‘धग असतेच आसपास’ या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद आहेच; मात्र प्रतिष्ठित पुरस्कारांचे दडपणही येते. कवितासंग्रह लिहायचा किंवा कविता करायची, असे म्हणून कविता करता येत नाही. आपल्या भवतालच्या परिस्थितीतून कविता उत्स्फूर्तपणे जन्माला येत असते. कवीने आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहिले पाहिजे. परिस्थितीच्या, भवतालच्या संवेदना मनाला भिडल्या तरच कविता कागदावर उतरते, असे मत दुधाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आनंद तर झाला आहेच; मात्र, अशा पुरस्कारांचे काहीसे दडपणही जाणवते. प्रतिष्ठित पुरस्कारांबद्दल बरेच काही ऐकले होते. पण, ते आपल्या इतके जवळ येतील, असे कधीच वाटले नव्हते. पुरस्कारांचा संबंध केवळ शहरी लोकांपुरताच मर्यादित असतो, असा समज सर्वदूर पसरलेला आहे. त्यामुळे शेतात काम करणाºया, मातीत रमणाºया व्यक्तींपर्यंत पुरस्कार पोहोचणे खूप अनोखे असते. हा केवळ माझा सन्मान नसून माझ्यासह शेतात राबणाºया गोरगरिबांचा हा सन्मान आहे.मी पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील कारकिर्दीची स्वप्ने रंगवत होते. एवढे शिक्षण घेतल्यानंतर शेती करायची नाही, असे मनाशी ठरवून टाकले होते. शिक्षणाची हवा डोक्यात गेली होती, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तरीही नाईलाजाने मला शेती करावी लागली. जे टाळायचे होते, तेच करण्याची वेळ ओढवल्याने मनात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली होती. कवितेच्या माध्यमातून अस्वस्थतेला वाचा फुटत गेली. मनातील भावना कवितांच्या रूपाने बाहेर पडू लागल्या. कवितेमुळेच शेतीची कधी आणि कशी गोडी लागत गेली हे कळलेच नाही. कालांतराने मी शेतीतच रमू लागले. तेच माझे विश्व बनले.माझ्याभोवती जे घडते, त्यातूनच कविता सुचत जाते. शेती, मातीतले वास्तव कवितेच्या माध्यमातून मूर्तरूप धारण करते. ‘सिझर कर म्हणते माती’ हा माझा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. शेतीमध्ये दररोज अनेक प्रयोग केले जात आहेत. रासायनिक खतांचा वापर, नवे तंत्रज्ञान यामुळे कृत्रिमता निर्माण झाल्याने मातीची नैसर्गिकता हरवत चालली आहे. मातीवर अतिक्रमण होऊ घातले आहे, या विचारांतून शेतात काम करत असतानाच मला ही कविता सुचली. पुढे अशाच कविता सुचत गेल्या आणि कवितासंग्रह तयार झाला. ‘धग असतेच आसपास’ ही कविताही अशीच भोवतालचे वातावरण अनुभवत असताना सुचलेली. आपल्या आजूबाजूची माणसे, वातावरण यात धग धुमसत असतेच; त्याची झळ आपल्यापर्यंत पोचू द्यायची की त्यातून मार्ग काढायचा, हे आपल्याच हातात असते, अशी भावना या कवितेतून उमटली.कविता लिहायची, असे मी काहीच ठरवले नव्हते. माझे अनुभवविश्व, बदलते वास्तव, समाजातील प्रश्न, माणसे यातून कविता आपोआप सुचत गेल्या. कोणाची कविता चांगली किंवा वाईट, असे ठरवता येत नाही. प्रत्येकाचे अनुभवविश्व, वैचारिक दृष्टिकोन याप्रमाणे त्या त्या कवितेचा बाज ठरत जातो. कवितेसाठी साधना, रियाज किंवा अभ्यास गरजेचा असतो की नाही, मला माहीत नाही.स्वत:पुरतेच बोलायचे झाले, तर मी कवितेचा कोणताही अभ्यास केला नाही. कारण, कविता संवेदनशीलतेतून प्रकटते. कवितेत कोणताही अभिनिवेश असता कामा नये. मी शहरी बाजाची कविता लिहायची ठरवल्यास ती सुचणारच नाही. कारण, मी ते वातावरण अनुभवलेच नसेल, तर त्या भावना माझ्या मनाला भिडणारच नाहीत.कवी संमेलनांच्या माध्यमातून रसिकांसमोर सादरीकरण करण्याची संधी मिळते. माझ्या कवितेतील बहुतांश शब्द ग्रामीण ढंगाचे असल्याने ग्रामीण भागातील लोकांना ते पटकन भावतात. त्या तुलनेत, शहरी भागातील रसिकांना त्या समजून घ्याव्या लागतात. मात्र, एखाद्याला कविता समजावी, म्हणून ती सोप्या भाषेत लिहिणे शक्य नसते. कवीने आपल्या अनुभवांशी प्रामाणिक असले पाहिजे.आपण आपल्या भावनांशी प्रामाणिक असू, तर कविमन आपल्याला साथ देते आणि कविता स्फुरत जातात. कवितांचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो.

टॅग्स :Puneपुणे