शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या भवतालचा आवाजच असते कविता! - कल्पना दुधाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 03:40 IST

महाराष्ट्र फाउंडेशनचा ललित ग्रंथ पुरस्कार कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या ‘धग असतेच आसपास’ या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद आहेच; मात्र प्रतिष्ठित पुरस्कारांचे दडपणही येते. कवितासंग्रह लिहायचा किंवा कविता करायची, असे म्हणून कविता करता येत नाही.

महाराष्ट्र फाउंडेशनचा ललित ग्रंथ पुरस्कार कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या ‘धग असतेच आसपास’ या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद आहेच; मात्र प्रतिष्ठित पुरस्कारांचे दडपणही येते. कवितासंग्रह लिहायचा किंवा कविता करायची, असे म्हणून कविता करता येत नाही. आपल्या भवतालच्या परिस्थितीतून कविता उत्स्फूर्तपणे जन्माला येत असते. कवीने आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहिले पाहिजे. परिस्थितीच्या, भवतालच्या संवेदना मनाला भिडल्या तरच कविता कागदावर उतरते, असे मत दुधाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आनंद तर झाला आहेच; मात्र, अशा पुरस्कारांचे काहीसे दडपणही जाणवते. प्रतिष्ठित पुरस्कारांबद्दल बरेच काही ऐकले होते. पण, ते आपल्या इतके जवळ येतील, असे कधीच वाटले नव्हते. पुरस्कारांचा संबंध केवळ शहरी लोकांपुरताच मर्यादित असतो, असा समज सर्वदूर पसरलेला आहे. त्यामुळे शेतात काम करणाºया, मातीत रमणाºया व्यक्तींपर्यंत पुरस्कार पोहोचणे खूप अनोखे असते. हा केवळ माझा सन्मान नसून माझ्यासह शेतात राबणाºया गोरगरिबांचा हा सन्मान आहे.मी पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील कारकिर्दीची स्वप्ने रंगवत होते. एवढे शिक्षण घेतल्यानंतर शेती करायची नाही, असे मनाशी ठरवून टाकले होते. शिक्षणाची हवा डोक्यात गेली होती, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तरीही नाईलाजाने मला शेती करावी लागली. जे टाळायचे होते, तेच करण्याची वेळ ओढवल्याने मनात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली होती. कवितेच्या माध्यमातून अस्वस्थतेला वाचा फुटत गेली. मनातील भावना कवितांच्या रूपाने बाहेर पडू लागल्या. कवितेमुळेच शेतीची कधी आणि कशी गोडी लागत गेली हे कळलेच नाही. कालांतराने मी शेतीतच रमू लागले. तेच माझे विश्व बनले.माझ्याभोवती जे घडते, त्यातूनच कविता सुचत जाते. शेती, मातीतले वास्तव कवितेच्या माध्यमातून मूर्तरूप धारण करते. ‘सिझर कर म्हणते माती’ हा माझा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. शेतीमध्ये दररोज अनेक प्रयोग केले जात आहेत. रासायनिक खतांचा वापर, नवे तंत्रज्ञान यामुळे कृत्रिमता निर्माण झाल्याने मातीची नैसर्गिकता हरवत चालली आहे. मातीवर अतिक्रमण होऊ घातले आहे, या विचारांतून शेतात काम करत असतानाच मला ही कविता सुचली. पुढे अशाच कविता सुचत गेल्या आणि कवितासंग्रह तयार झाला. ‘धग असतेच आसपास’ ही कविताही अशीच भोवतालचे वातावरण अनुभवत असताना सुचलेली. आपल्या आजूबाजूची माणसे, वातावरण यात धग धुमसत असतेच; त्याची झळ आपल्यापर्यंत पोचू द्यायची की त्यातून मार्ग काढायचा, हे आपल्याच हातात असते, अशी भावना या कवितेतून उमटली.कविता लिहायची, असे मी काहीच ठरवले नव्हते. माझे अनुभवविश्व, बदलते वास्तव, समाजातील प्रश्न, माणसे यातून कविता आपोआप सुचत गेल्या. कोणाची कविता चांगली किंवा वाईट, असे ठरवता येत नाही. प्रत्येकाचे अनुभवविश्व, वैचारिक दृष्टिकोन याप्रमाणे त्या त्या कवितेचा बाज ठरत जातो. कवितेसाठी साधना, रियाज किंवा अभ्यास गरजेचा असतो की नाही, मला माहीत नाही.स्वत:पुरतेच बोलायचे झाले, तर मी कवितेचा कोणताही अभ्यास केला नाही. कारण, कविता संवेदनशीलतेतून प्रकटते. कवितेत कोणताही अभिनिवेश असता कामा नये. मी शहरी बाजाची कविता लिहायची ठरवल्यास ती सुचणारच नाही. कारण, मी ते वातावरण अनुभवलेच नसेल, तर त्या भावना माझ्या मनाला भिडणारच नाहीत.कवी संमेलनांच्या माध्यमातून रसिकांसमोर सादरीकरण करण्याची संधी मिळते. माझ्या कवितेतील बहुतांश शब्द ग्रामीण ढंगाचे असल्याने ग्रामीण भागातील लोकांना ते पटकन भावतात. त्या तुलनेत, शहरी भागातील रसिकांना त्या समजून घ्याव्या लागतात. मात्र, एखाद्याला कविता समजावी, म्हणून ती सोप्या भाषेत लिहिणे शक्य नसते. कवीने आपल्या अनुभवांशी प्रामाणिक असले पाहिजे.आपण आपल्या भावनांशी प्रामाणिक असू, तर कविमन आपल्याला साथ देते आणि कविता स्फुरत जातात. कवितांचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो.

टॅग्स :Puneपुणे