शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या भवतालचा आवाजच असते कविता! - कल्पना दुधाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 03:40 IST

महाराष्ट्र फाउंडेशनचा ललित ग्रंथ पुरस्कार कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या ‘धग असतेच आसपास’ या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद आहेच; मात्र प्रतिष्ठित पुरस्कारांचे दडपणही येते. कवितासंग्रह लिहायचा किंवा कविता करायची, असे म्हणून कविता करता येत नाही.

महाराष्ट्र फाउंडेशनचा ललित ग्रंथ पुरस्कार कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या ‘धग असतेच आसपास’ या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद आहेच; मात्र प्रतिष्ठित पुरस्कारांचे दडपणही येते. कवितासंग्रह लिहायचा किंवा कविता करायची, असे म्हणून कविता करता येत नाही. आपल्या भवतालच्या परिस्थितीतून कविता उत्स्फूर्तपणे जन्माला येत असते. कवीने आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहिले पाहिजे. परिस्थितीच्या, भवतालच्या संवेदना मनाला भिडल्या तरच कविता कागदावर उतरते, असे मत दुधाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आनंद तर झाला आहेच; मात्र, अशा पुरस्कारांचे काहीसे दडपणही जाणवते. प्रतिष्ठित पुरस्कारांबद्दल बरेच काही ऐकले होते. पण, ते आपल्या इतके जवळ येतील, असे कधीच वाटले नव्हते. पुरस्कारांचा संबंध केवळ शहरी लोकांपुरताच मर्यादित असतो, असा समज सर्वदूर पसरलेला आहे. त्यामुळे शेतात काम करणाºया, मातीत रमणाºया व्यक्तींपर्यंत पुरस्कार पोहोचणे खूप अनोखे असते. हा केवळ माझा सन्मान नसून माझ्यासह शेतात राबणाºया गोरगरिबांचा हा सन्मान आहे.मी पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील कारकिर्दीची स्वप्ने रंगवत होते. एवढे शिक्षण घेतल्यानंतर शेती करायची नाही, असे मनाशी ठरवून टाकले होते. शिक्षणाची हवा डोक्यात गेली होती, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तरीही नाईलाजाने मला शेती करावी लागली. जे टाळायचे होते, तेच करण्याची वेळ ओढवल्याने मनात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली होती. कवितेच्या माध्यमातून अस्वस्थतेला वाचा फुटत गेली. मनातील भावना कवितांच्या रूपाने बाहेर पडू लागल्या. कवितेमुळेच शेतीची कधी आणि कशी गोडी लागत गेली हे कळलेच नाही. कालांतराने मी शेतीतच रमू लागले. तेच माझे विश्व बनले.माझ्याभोवती जे घडते, त्यातूनच कविता सुचत जाते. शेती, मातीतले वास्तव कवितेच्या माध्यमातून मूर्तरूप धारण करते. ‘सिझर कर म्हणते माती’ हा माझा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. शेतीमध्ये दररोज अनेक प्रयोग केले जात आहेत. रासायनिक खतांचा वापर, नवे तंत्रज्ञान यामुळे कृत्रिमता निर्माण झाल्याने मातीची नैसर्गिकता हरवत चालली आहे. मातीवर अतिक्रमण होऊ घातले आहे, या विचारांतून शेतात काम करत असतानाच मला ही कविता सुचली. पुढे अशाच कविता सुचत गेल्या आणि कवितासंग्रह तयार झाला. ‘धग असतेच आसपास’ ही कविताही अशीच भोवतालचे वातावरण अनुभवत असताना सुचलेली. आपल्या आजूबाजूची माणसे, वातावरण यात धग धुमसत असतेच; त्याची झळ आपल्यापर्यंत पोचू द्यायची की त्यातून मार्ग काढायचा, हे आपल्याच हातात असते, अशी भावना या कवितेतून उमटली.कविता लिहायची, असे मी काहीच ठरवले नव्हते. माझे अनुभवविश्व, बदलते वास्तव, समाजातील प्रश्न, माणसे यातून कविता आपोआप सुचत गेल्या. कोणाची कविता चांगली किंवा वाईट, असे ठरवता येत नाही. प्रत्येकाचे अनुभवविश्व, वैचारिक दृष्टिकोन याप्रमाणे त्या त्या कवितेचा बाज ठरत जातो. कवितेसाठी साधना, रियाज किंवा अभ्यास गरजेचा असतो की नाही, मला माहीत नाही.स्वत:पुरतेच बोलायचे झाले, तर मी कवितेचा कोणताही अभ्यास केला नाही. कारण, कविता संवेदनशीलतेतून प्रकटते. कवितेत कोणताही अभिनिवेश असता कामा नये. मी शहरी बाजाची कविता लिहायची ठरवल्यास ती सुचणारच नाही. कारण, मी ते वातावरण अनुभवलेच नसेल, तर त्या भावना माझ्या मनाला भिडणारच नाहीत.कवी संमेलनांच्या माध्यमातून रसिकांसमोर सादरीकरण करण्याची संधी मिळते. माझ्या कवितेतील बहुतांश शब्द ग्रामीण ढंगाचे असल्याने ग्रामीण भागातील लोकांना ते पटकन भावतात. त्या तुलनेत, शहरी भागातील रसिकांना त्या समजून घ्याव्या लागतात. मात्र, एखाद्याला कविता समजावी, म्हणून ती सोप्या भाषेत लिहिणे शक्य नसते. कवीने आपल्या अनुभवांशी प्रामाणिक असले पाहिजे.आपण आपल्या भावनांशी प्रामाणिक असू, तर कविमन आपल्याला साथ देते आणि कविता स्फुरत जातात. कवितांचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो.

टॅग्स :Puneपुणे