शहरं
Join us  
Trending Stories
1
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
2
...हे ५६ हजार लोक जगातील संपत्तीवर ठेवतात नियंत्रण; श्रीमंतीच्या नव्या आकडेवारीनं सर्वच हैराण
3
Dhurandhar FA9LA song Flipperachi Net Worth: धुरंदरचं व्हायरल गाणं FA9LA गाणाऱ्या फ्लिपरॅचीची संपत्ती किती? दरवर्षी किती करतो कमाई, जाणून घ्या
4
Ghodbunder Road Update: घोडबंदर मार्गावर पुन्हा ३ दिवस अवजड वाहनांना बंदी,  पर्यायी मार्ग कोणते?
5
उत्तर प्रदेशातील दुसरी सीमा हैदर! लग्नानंतर बांगलादेशी महिला रीना बेगम नेपाळमार्गे थेट भारतात
6
"मनोरंजनाच्या नावाखाली फक्त हिंसाच...", सध्याच्या कंटेंटवर राधिका आपटेने व्यक्त केली चिंता
7
मेक्सिकोच्या ५०% टॅक्समागे अमेरिकेचा हात? भारतातील 'या' क्षेत्राला बसणार सर्वाधिक झळ
8
IND vs SA: द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम, भारताविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा पहिलाच संघ
9
विश्वास बसणार नाही...! मोदी चालले अशा देशा, जिथे १३ महिन्यांचे असते वर्ष; आज तिथे २०१८ सुरु आहे...
10
Nashik Crime: नणंदेला संशय आला, दरवाजा उघडताच वहिनीला बघून चिरकली! नाशिकमध्ये शीतलला पतीनेच संपवले
11
लखनौ हत्याकांडात नवा ट्विस्ट: जादूटोणा आणि चौथा आरोपी! इंजिनियरच्या वडिलांचा धक्कादायक दावा
12
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
13
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
14
ITR Refund Delay : ITR रिफंड मिळाला नाही? लाखो करदाते चिंतेत, विलंबाचं खरं कारण काय? अजून किती वाट पाहावी लागणार?
15
कॉम्पॅक्ट एसयूव्ही बाजारात ब्रेझाची विक्री घटली; या चार कारना ग्राहक देतायत पसंती...
16
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Sensex ३०० अंकांनी वधारला; निफ्टीतही तेजी, मेटल शेअर्स सुस्साट
17
नवीन कायद्यामुळे कर्मचाऱ्यांना लागेल कमी कर; कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रचना बदलणार असल्याचा फायदा
18
Dog Attack Mumbai: बिबट्यासारखी उडी आणि खांदा पकडला जबड्यात; मुंबईत भटक्या कुत्र्याचा सुरक्षारक्षकावर हल्ला, Video पहा
19
जपान पुन्हा हादरला: ६.७ तीव्रतेचा जोरदार भूकंप, पॅसिफिक किनारपट्टीसाठी त्सुनामीचा इशारा जारी
20
रिस्क घेतली अन् गुंतवणूक वाढली! इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत २१ टक्क्यांनी वाढ; सलग तीन महिन्यांच्या घसरणीला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

कवी हाच कवितेचा समीक्षक : हेमंत जोगळेकर; मसापमध्ये ‘एक कवी एक कवयित्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 15:56 IST

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'एक कवी एक कवयित्री' या कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ कवी उद्धव कानडे आणि प्रमोद आडकर यांनी ज्येष्ठ कवयित्री वृषाली किन्हाळकर आणि कवी हेमंत जोगळेकर यांच्याशी संवाद साधला.

ठळक मुद्देमसापमध्ये कवयित्री वृषाली किन्हाळकर आणि कवी हेमंत जोगळेकर यांच्याशी संवादविडंबन काव्य उत्स्फूर्त असावं : हेमंत जोगळेकर

पुणे : 'समीक्षकांनी कवितेची समीक्षा चांगली केली काय किंवा वाईट केली काय त्यामुळे कवीच्या मोठेपणात काहीच फरक पडत नाही. समीक्षकांना आवडेल असे लेखन करणारे कवी असतात. आम्ही मात्र नैसर्गिक कविता लिहीत असतो. मानधन किंवा मोबदल्यापेक्षा रसिकांचा आनंद महत्त्वाचा असतो. कवीला तोंडदेखली प्रतिष्ठा नको असते. कवींनी कवी कुळाला बट्टा लागेल असे वर्तन कधी करू नये. कवीची प्रतिष्ठा कवींनाच सांभाळावी लागते. कवी हाच कवितेचा खरा समीक्षक असतो.' असे मत प्रसिद्ध कवी हेमंत जोगळेकर यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'एक कवी एक कवयित्री' या कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ कवी उद्धव कानडे आणि प्रमोद आडकर यांनी ज्येष्ठ कवयित्री वृषाली किन्हाळकर आणि कवी हेमंत जोगळेकर यांच्याशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थित होते. हेमंत जोगळेकर म्हणाले, 'विडंबन काव्य उत्स्फूर्त असावं. कवींनी पूर्वसुरींच्या कविता वाचल्या पाहिजेत. विडंबनकार हा उत्तम कवी असायला हवा. मी मुळातला कवी आहे आणि नंतर अभियंता झालो. माझी कविता अशास्त्रीय नाही. स्पष्टपणा हाच कवींचा मूलभूत गुण असतो. मी गंभीर स्वभावाचा आहे पण माझी कविता मिश्किल आहे.'डॉ. वृषाली किन्हाळकर म्हणाल्या, 'आद्यकवी मुकुंदराज यांची समाधी हेच माझं प्रेरणास्थान आहे. समाजातील गरीब स्त्रियांनी माज्या जाणीवा समृद्ध केल्या आहे. स्त्रीवर होणारा अन्याय, त्यांची तडफड, त्यांच्या वेदना आणि वास्तव माज्या संवेदनांना जागृत करतात.  दु:खांची पाळेमुळे शोधतांना चांगली कविता सापडते.  डॉक्टर असल्यामुळे मी स्त्री जन्माचा सोहळा रोज पाहते तसा तिच्या मृत्यूचा पाहावा लागतो. स्त्रीच्या वेदनेचा प्रभाव माझ्यावर आहे. बाईचं दु:ख मला खेचून घेतं. महिलांकडे आदरानं न पाहणं, राजकारणावर टीका करणं हे चुकीचे आहे. कवीचे मठ आणि  मठातलं राजकारण मला आवडत नाही. संवेदनांना त्रास झाला तरच चांगली कविता समोर येईल.'प्रा. मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविक केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रमोद आडकर यांनी आभार मानले.    

टॅग्स :MSP Mandalमराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळPuneपुणे