शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपी प्रवासीसंख्येत घट

By admin | Updated: October 11, 2015 04:39 IST

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) प्रतिबस प्रवासीसंख्येत या वर्षीही तूट येत असल्याचे चित्र आहे.

पुणे : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) प्रतिबस प्रवासीसंख्येत या वर्षीही तूट येत असल्याचे चित्र आहे. जानेवारी ते आॅगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत ही सरासरी ७७० प्रवासी इतकी खाली पोहोचली आहे. सन २०१४ मध्ये प्रतिबस प्रवासीसंख्या ८५० तर २०१३ मध्ये ती ९०० इतकी होती. या वर्षी संचलनात अधिक बस असूनही पीएमपीकडून वाढविण्यात आलेल्या तिकीटदरामुळे पीएमपीचे उत्पन्न वाढले असले, तरी प्रतिबस प्रवाशांची संख्या ७० ते ८० ने घटली आहे.पीएमपीच्या ताफ्यात जवळपास दोन हजार बस आहेत. त्यात ६६३ बस या खासगी कंपन्यांच्या असून, त्या भाडेकराराने घेण्यात आलेल्या आहेत. मात्र, एवढ्या बस असूनही पीएमपीच्या दरदिवशी सरासरी १५०० बसच संचलनात असतात. बस वाढवून आणि मार्गांची फेररचना करूनही जानेवारी ते आॅगस्ट २०१५ या पहिल्या सहा महिन्यांत प्रतिबस प्रवासीसंख्या ७७० पर्यंत खाली आली आहे. जानेवारी २०१५ मध्ये हीच संख्या सरासरी ८९० होती. मात्र, आॅगस्टअखेर ती जवळपास १२० ने कमी झाली असल्याचे दिसून येते. यावरून पीएमपीच्या ढिसाळ कारभाराला वैतागून प्रवासी पीएमपीकडे पाठ करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.ठेकेदारांच्या बसमधील प्रवासीसंख्या घटली?पीएमपीकडून भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या ठेकेदारांच्या बसचे प्रवासी प्रामुख्याने घटल्याचे चित्र आहे. या बसबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी असून, या सर्व बस पीएमपीकडून शहराबाहेर फिरविल्या जातात. या बस वेळेवर तसेच थांब्यावर थांबत नसल्याच्या मोठ्या तक्रारी पीएमपी प्रशासनाकडे आहेत. ठेकेदारांच्या बसला दररोज सरासरी २०० किमी संचलनाचे काम देण्यात आले आहे. त्यासाठी त्यांना प्रतिकिलोमीटर दरही ठरवून देण्यात आलेला आहे. मात्र, एका बसमागे किती उत्पन्न असावे व किती प्रवासीसंख्या असावी, असे कोणतेही बंधन घालण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रवासी असो अथवा नसो या वाहनांचे संचलन नियमित सुरूच आहे. तसेच त्यांना मिळणारा प्रतिकिमी निधीही वेळेवर दिला जात आहे.पीएमपीने या वर्षी १२ लाखांचा प्रवासी आकडा गाठला आहे. हा आकडा गाठण्यासाठी पीएमपीला मार्गावर १ हजाराहून अधिक बस उतराव्या लागल्या होत्या. २०१४ मध्ये मार्गावर १ हजार बस असूनही प्रतिबस प्रवासीसंख्या ही ८५० होती, तर २०१३ मध्ये मार्गावर ८०० बस असूनही ही संख्या ९०० होती. आता हा आकडा मार्गावर संचलनात असलेल्या बसचे प्रमाण पाहता वाढणे अपेक्षित होते. असे न होता रस्त्यावर १५०० बस असूनही हा आकडा प्रतिबस ७७० वर पोहोचला आहे. प्रशासनाकडून प्रवासीसंख्येपेक्षा उत्पन्न वाढविण्यावर भर दिला जात असला तरी, उत्पन्न वाढण्यामागे पीएमपीकडून इतर खर्चात केलेली बचत तसेच तिकीटदर आणि पासच्या किमतीमध्ये वाढविण्यात आलेल्या रकमेमुळे भर पडली असल्याचे यावरून दिसून येते.पीएमपीकडून केवळ तिकीट वाढवून उत्पन्न वाढविण्यावर भर दिला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात प्रवासीसंख्या घटताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रत्यक्षात प्रवासीसंख्या घट खासगी ठेकेदारांच्या बसमुळे आहे. त्याबाबतच्या शेकडो तक्रारी प्रवाशांनी केलेल्या आहेत. पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे बससेवा प्रवासीकेंद्रित होणे आवश्यक आहे. - जुगल राठी (अध्यक्ष, पीएमपी प्रवासी मंच)