शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
2
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
3
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
4
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
5
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या नूर खान बेसवर हल्ला; Video समोर आला...
6
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
8
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
9
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
10
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
11
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
12
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
13
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
14
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
15
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
16
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
17
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
18
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
19
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
20
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 

पीएमपी प्रवासीसंख्येत घट

By admin | Updated: October 11, 2015 04:39 IST

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) प्रतिबस प्रवासीसंख्येत या वर्षीही तूट येत असल्याचे चित्र आहे.

पुणे : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) प्रतिबस प्रवासीसंख्येत या वर्षीही तूट येत असल्याचे चित्र आहे. जानेवारी ते आॅगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत ही सरासरी ७७० प्रवासी इतकी खाली पोहोचली आहे. सन २०१४ मध्ये प्रतिबस प्रवासीसंख्या ८५० तर २०१३ मध्ये ती ९०० इतकी होती. या वर्षी संचलनात अधिक बस असूनही पीएमपीकडून वाढविण्यात आलेल्या तिकीटदरामुळे पीएमपीचे उत्पन्न वाढले असले, तरी प्रतिबस प्रवाशांची संख्या ७० ते ८० ने घटली आहे.पीएमपीच्या ताफ्यात जवळपास दोन हजार बस आहेत. त्यात ६६३ बस या खासगी कंपन्यांच्या असून, त्या भाडेकराराने घेण्यात आलेल्या आहेत. मात्र, एवढ्या बस असूनही पीएमपीच्या दरदिवशी सरासरी १५०० बसच संचलनात असतात. बस वाढवून आणि मार्गांची फेररचना करूनही जानेवारी ते आॅगस्ट २०१५ या पहिल्या सहा महिन्यांत प्रतिबस प्रवासीसंख्या ७७० पर्यंत खाली आली आहे. जानेवारी २०१५ मध्ये हीच संख्या सरासरी ८९० होती. मात्र, आॅगस्टअखेर ती जवळपास १२० ने कमी झाली असल्याचे दिसून येते. यावरून पीएमपीच्या ढिसाळ कारभाराला वैतागून प्रवासी पीएमपीकडे पाठ करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.ठेकेदारांच्या बसमधील प्रवासीसंख्या घटली?पीएमपीकडून भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या ठेकेदारांच्या बसचे प्रवासी प्रामुख्याने घटल्याचे चित्र आहे. या बसबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी असून, या सर्व बस पीएमपीकडून शहराबाहेर फिरविल्या जातात. या बस वेळेवर तसेच थांब्यावर थांबत नसल्याच्या मोठ्या तक्रारी पीएमपी प्रशासनाकडे आहेत. ठेकेदारांच्या बसला दररोज सरासरी २०० किमी संचलनाचे काम देण्यात आले आहे. त्यासाठी त्यांना प्रतिकिलोमीटर दरही ठरवून देण्यात आलेला आहे. मात्र, एका बसमागे किती उत्पन्न असावे व किती प्रवासीसंख्या असावी, असे कोणतेही बंधन घालण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रवासी असो अथवा नसो या वाहनांचे संचलन नियमित सुरूच आहे. तसेच त्यांना मिळणारा प्रतिकिमी निधीही वेळेवर दिला जात आहे.पीएमपीने या वर्षी १२ लाखांचा प्रवासी आकडा गाठला आहे. हा आकडा गाठण्यासाठी पीएमपीला मार्गावर १ हजाराहून अधिक बस उतराव्या लागल्या होत्या. २०१४ मध्ये मार्गावर १ हजार बस असूनही प्रतिबस प्रवासीसंख्या ही ८५० होती, तर २०१३ मध्ये मार्गावर ८०० बस असूनही ही संख्या ९०० होती. आता हा आकडा मार्गावर संचलनात असलेल्या बसचे प्रमाण पाहता वाढणे अपेक्षित होते. असे न होता रस्त्यावर १५०० बस असूनही हा आकडा प्रतिबस ७७० वर पोहोचला आहे. प्रशासनाकडून प्रवासीसंख्येपेक्षा उत्पन्न वाढविण्यावर भर दिला जात असला तरी, उत्पन्न वाढण्यामागे पीएमपीकडून इतर खर्चात केलेली बचत तसेच तिकीटदर आणि पासच्या किमतीमध्ये वाढविण्यात आलेल्या रकमेमुळे भर पडली असल्याचे यावरून दिसून येते.पीएमपीकडून केवळ तिकीट वाढवून उत्पन्न वाढविण्यावर भर दिला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात प्रवासीसंख्या घटताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रत्यक्षात प्रवासीसंख्या घट खासगी ठेकेदारांच्या बसमुळे आहे. त्याबाबतच्या शेकडो तक्रारी प्रवाशांनी केलेल्या आहेत. पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे बससेवा प्रवासीकेंद्रित होणे आवश्यक आहे. - जुगल राठी (अध्यक्ष, पीएमपी प्रवासी मंच)