शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

खासगी शाळांवर पीएमपी मेहेरबान!

By admin | Updated: May 11, 2015 06:23 IST

खासगी तसेच महापालिका शाळांच्या मागणीनुसार पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) विद्यार्थी वाहतुकीसाठी बस पुरविल्या जातात.

राजानंद मोरे, पुणेखासगी तसेच महापालिका शाळांच्या मागणीनुसार पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) विद्यार्थी वाहतुकीसाठी बस पुरविल्या जातात. यामध्ये ‘पीएमपी’ प्रशासन खासगी शाळांवर मेहेरबान असल्याचे दिसून आले आहे. प्रतिकिलोमीटर ६० रुपये या दराने पालिका शाळांकडून निम्मा तर, पालिकेकडून निम्मा खर्च वसूल केला जातो. खासगी शाळांकडून मात्र, ३० रुपयेच घेतले जात आहेत. यामुळे मागील अनेक वर्षांपासून ‘पीएमपी’चे कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी पडले आहे. संचालक मंडळाच्या ठरावानुसार अनेक वर्षांपासून शहरातील शाळांना विद्यार्थी वाहतुकीसाठी प्रतिकिलोमीटर दर आकारून बस पुरविल्या जातात. त्यामध्ये पालिका शाळांसह खासगी शाळांचाही समावेश आहे. सध्या पीएमपीकडून शहर व परिसरातील ४० हून अधिक शाळांना सुमारे ७३ बस दिल्या जातात. त्यामध्ये केवळ १० ते १२ शाळा पालिकेच्या असून, त्यांना सुमारे २० ते २५ बस पुरविल्या जातात, तर उर्वरित सर्व शाळा खासगी संस्थांच्या आहेत. मागील अनेक वर्षांपासून शाळांकडून पीएमपीच्या बसेसची मागणी सातत्याने वाढत चालली आहे. बससाठी शाळांनी पीएमपीला पत्राद्वारे विनंती केल्यानंतर त्याला मान्यता दिली जाते. त्यानंतर संबंधित शाळा व ज्या आगारातून बस सोडली जाणार आहे, त्यामधील अंतर निश्चित केले जाते. त्यानुसार दर महिन्याला या शाळांकडून पैसे भरले जातात. ‘पीएमपी’ने सध्या शाळांसाठी प्रतिकिलोमीटर ६० रुपये दर निश्चित केला आहे. पालिका शाळांना यामध्ये ५० टक्के सूट दिली जाते. केवळ ५० टक्के रक्कम या शाळांकडून वसूल केली जाते. तर उर्वरित ५० टक्के रक्कम पालिका पीएमपीला अदा करते. म्हणजे ६० रुपये दराप्रमाणे पीएमपीला पूर्ण पैसे मिळतात. दुसरीकडे खासगी शाळांकडून मात्र, ५० टक्केच रक्कम वसूल केली जात आहे. पालिका शाळांप्रमाणेच खासगी शाळांकडूनही प्रतिकिलोमीटर ३० रुपयेच वसूल केले जातात. तर उर्वरीत ३० रुपयांवर पीएमपी आजपर्यंत पाणी सोडत आली आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. याविषयी पीएमपीची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, संबंधित अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला.४पीएमपी बस पुरवित असलेल्या ४५ ते ५० खासगी शाळा शहरातील नामांकित तसेच मोठ्या शैक्षणिक संस्थांच्या शाळा आहेत. या संस्थांना पीएमपीला प्रतिकिलोमीटर ६० रुपये दराप्रमाणे पैसे देणे सहज शक्य आहे. मात्र, आजवर पीएमपी प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करीत आपल्या हक्काच्या उत्पन्नावर पाणी सोडले आहे. सध्या कोट्यवधी रुपयांच्या बोजाखाली दबलेल्या पीएमपीकडून एकीकडे विविध मार्गांनी उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, तर दुसरीकडे उत्पन्नाच्या हक्काच्या स्त्रोतांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आजपर्यंत कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.