शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

पीएमपी नीट चालणार आहे की नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 02:44 IST

आरटीई अंतर्गत प्रवेश न देणाऱ्या शाळांवर प्रशासक नेमण्याचे शिक्षण संचालकांनी दिलेले आदेश कागदावरच राहिले आहेत.

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) येत्या शैक्षणिक वर्षासाठी शाळांच्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील आरटीईच्या पहिल्या फेरीमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास ८६ शाळांनी नकार दिला असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. आरटीई अंतर्गत प्रवेश न देणाऱ्या शाळांवर प्रशासक नेमण्याचे शिक्षण संचालकांनी दिलेले आदेश कागदावरच राहिले आहेत. शाळांच्या या मनमानी कारभारामुळे आरटीईच्या दुसºया फेरीची सोडत अद्यापही निघू शकलेली नाही.राज्यभरातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आरटीईच्या दुसºया फेरीतील प्रवेश शनिवारी जाहीर करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील आरटीईच्या दुसºया फेरीचे प्रवेश मात्र शनिवारी जाहीर झाले नाहीत. त्यामुळे दुसºया फेरीचे प्रवेश कधी जाहीर होणार, याची विचारणा पालकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील ८६ शाळांनी आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार दिल्याने पेच निर्माण झाला आहे. आरटीईची पुढील फेरी राबविण्यापूर्वी या शाळेत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. त्यानंतरच दुसºया फेरीची सोडत जाहीर करता येणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याची दुसºया फेरीची सोडत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.राज्यातील ४१ इंग्रजी माध्यमाच्या शाळा उच्च न्यायालयात गेल्या आहेत. फक्त त्या शाळांमधील आरटीईच्या प्रवेशाला उच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. मात्र, त्या व्यतिरिक्त तब्बल ८६ शाळांनी आरटीईचे प्रवेश नाकारले आहेत. त्यामुळे या शाळेत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. आरटीई अंतर्गत प्रवेश नाकारल्यास त्या शाळांवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य शासनाने १५ आॅक्टोबर २०१२ रोजी घेतला आहे. त्यानुसार महाराष्टÑ शैक्षणिक संस्था (व्यवस्थापन अधिनियम) १९७६ अन्वये प्रशासक नियुक्ती करण्याची कार्यवाही राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक), प्रशासन अधिकारी, शिक्षण निरीक्षक (दक्षिण, उत्तर व पश्चिम मुंबई) यांनी करावी असे आदेश सुनील चौहान यांनीकाढले आहेत. मात्र त्यानुसार कार्यवाही करण्याचे धाडस शिक्षण विभागाकडून दाखविले जात नसल्याचे दिसून येत आहे.

विद्यार्थ्यांचे दाखले घरी पाठविलेशिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्काची रक्कम शासनाकडून मिळाली नसल्याचे स्पष्ट करून आरटीई अंतर्गत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल व शाळा सोडल्याचा दाखला परस्पर घरी पाठवून देण्यात आल्याचा प्रकार सांगवीतील नॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये घडला आहे. या शाळेविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्याकडे केली आहे. तक्रारीची समितीमार्फत चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे शिक्षण आयुक्तांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या शाळेविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच त्यांची बालहक्क आयोगाकडे तक्रार करावी, अशी मागणी डॉ. सिद्धार्थ धेंडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिक्षण आयुक्तांकडे केली. आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क शाळेला घेता येत नाही. मात्र, तरीही शाळेकडून पहिलीत प्रवेश घेताना ६ हजार तर दुसरीतील प्रवेशासाठी १२ हजार रुपयांचीमागणी केली जात आहे. आरटीई अंतर्गत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांना वर्गात इतर मुलांपासून वेगळे बसविले जाते. शाळेतील स्नेहसंमेलन व इतर कार्यक्रमांत त्यांना सहभागी करून घेतले जात नाही. विद्यार्थ्यांनी सोडवलेले पेपर व निकालपालकांना दाखविला जात नाही. आरटीईच्या विद्यार्थ्यांच्या शुल्काचेपैसे शासनाकडून मिळाले नसल्याने पालकांनी ते शुल्क भरावे, असा त्यांना निरोप देण्यात आला.

टॅग्स :educationशैक्षणिक