शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

पीएमपी नीट चालणार आहे की नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 02:44 IST

आरटीई अंतर्गत प्रवेश न देणाऱ्या शाळांवर प्रशासक नेमण्याचे शिक्षण संचालकांनी दिलेले आदेश कागदावरच राहिले आहेत.

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) येत्या शैक्षणिक वर्षासाठी शाळांच्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील आरटीईच्या पहिल्या फेरीमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास ८६ शाळांनी नकार दिला असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. आरटीई अंतर्गत प्रवेश न देणाऱ्या शाळांवर प्रशासक नेमण्याचे शिक्षण संचालकांनी दिलेले आदेश कागदावरच राहिले आहेत. शाळांच्या या मनमानी कारभारामुळे आरटीईच्या दुसºया फेरीची सोडत अद्यापही निघू शकलेली नाही.राज्यभरातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आरटीईच्या दुसºया फेरीतील प्रवेश शनिवारी जाहीर करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील आरटीईच्या दुसºया फेरीचे प्रवेश मात्र शनिवारी जाहीर झाले नाहीत. त्यामुळे दुसºया फेरीचे प्रवेश कधी जाहीर होणार, याची विचारणा पालकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील ८६ शाळांनी आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार दिल्याने पेच निर्माण झाला आहे. आरटीईची पुढील फेरी राबविण्यापूर्वी या शाळेत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. त्यानंतरच दुसºया फेरीची सोडत जाहीर करता येणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याची दुसºया फेरीची सोडत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.राज्यातील ४१ इंग्रजी माध्यमाच्या शाळा उच्च न्यायालयात गेल्या आहेत. फक्त त्या शाळांमधील आरटीईच्या प्रवेशाला उच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. मात्र, त्या व्यतिरिक्त तब्बल ८६ शाळांनी आरटीईचे प्रवेश नाकारले आहेत. त्यामुळे या शाळेत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. आरटीई अंतर्गत प्रवेश नाकारल्यास त्या शाळांवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य शासनाने १५ आॅक्टोबर २०१२ रोजी घेतला आहे. त्यानुसार महाराष्टÑ शैक्षणिक संस्था (व्यवस्थापन अधिनियम) १९७६ अन्वये प्रशासक नियुक्ती करण्याची कार्यवाही राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक), प्रशासन अधिकारी, शिक्षण निरीक्षक (दक्षिण, उत्तर व पश्चिम मुंबई) यांनी करावी असे आदेश सुनील चौहान यांनीकाढले आहेत. मात्र त्यानुसार कार्यवाही करण्याचे धाडस शिक्षण विभागाकडून दाखविले जात नसल्याचे दिसून येत आहे.

विद्यार्थ्यांचे दाखले घरी पाठविलेशिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्काची रक्कम शासनाकडून मिळाली नसल्याचे स्पष्ट करून आरटीई अंतर्गत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल व शाळा सोडल्याचा दाखला परस्पर घरी पाठवून देण्यात आल्याचा प्रकार सांगवीतील नॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये घडला आहे. या शाळेविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्याकडे केली आहे. तक्रारीची समितीमार्फत चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे शिक्षण आयुक्तांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या शाळेविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच त्यांची बालहक्क आयोगाकडे तक्रार करावी, अशी मागणी डॉ. सिद्धार्थ धेंडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिक्षण आयुक्तांकडे केली. आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क शाळेला घेता येत नाही. मात्र, तरीही शाळेकडून पहिलीत प्रवेश घेताना ६ हजार तर दुसरीतील प्रवेशासाठी १२ हजार रुपयांचीमागणी केली जात आहे. आरटीई अंतर्गत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांना वर्गात इतर मुलांपासून वेगळे बसविले जाते. शाळेतील स्नेहसंमेलन व इतर कार्यक्रमांत त्यांना सहभागी करून घेतले जात नाही. विद्यार्थ्यांनी सोडवलेले पेपर व निकालपालकांना दाखविला जात नाही. आरटीईच्या विद्यार्थ्यांच्या शुल्काचेपैसे शासनाकडून मिळाले नसल्याने पालकांनी ते शुल्क भरावे, असा त्यांना निरोप देण्यात आला.

टॅग्स :educationशैक्षणिक