शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
2
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
3
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
4
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
5
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
6
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
7
Kankavli: हरवलेल्या मोबाईलमुळे ‘त्या’ प्रेमी युगुलानं संपवलं जीवन, तपासातून धक्कादायक माहिती समोर   
8
आश्चर्यकारक! Tata च्या नवीन Sierra ने दिले 30 kmpl चे मायलेज; 222 kmph चा टॉप स्पीडही गाठला
9
हिरा निघाला 'हा' शेअर; ९० टक्के फायद्यावर लिस्टिंग, IPO मध्ये लागलेली फक्त २ पट बोली
10
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
12
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
13
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
14
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
15
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
16
इंस्टाग्रामच्या कंटाळवाण्या रील्सला म्हणा 'बाय बाय'! फक्त एका सेटिंगने बदला फीडचा अल्गोरिदम
17
‘स्लीपर वंदे भारत’वर मोठी अपडेट! १ हजार किमी अंतर ८ तासात, १६० प्रति तास वेग; पहिली सेवा...
18
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
19
व्हेनेजुएला-अमेरिका वादात रशियाची उडी; मादुरोंच्या मदतीला पुतिन धावले, ट्रम्पना धक्का...
20
'जुम्मा गर्ल' किमी काटकर आठवतेय का? लेटेस्ट फोटो आला समोर, ओळखणं झालंय कठीण
Daily Top 2Weekly Top 5

गोहत्याबंदी, नोटाबंदीच्या निर्णयावर नाटक यायला पाहिजे : माधव वझे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 12:46 IST

आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर रंगभूमीवर नाटक यायला पाहिजे होते...

ठळक मुद्देनाटककार घाबरतात आणि चालू दिले जाईल याची शाश्वती तरी काय?

पुणे : बदलत्या काळात राजकारणाशी निगडित नाटक लिहिले जात नाही. खरतर आता  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर रंगभूमीवर नाटक यायला पाहिजे होते. मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदी आणि गोहत्याबंदी वरच्या निर्णयावर नाटक येऊ शकले असते. पण आणलं तर ते करणार कोण? आणि आणलं तरी चालू देतील का? याची शाश्वती काय? सध्या गढूळ वातावरण तयार झाले आहे. जे रंगभूमी आणि लोकशाहीसाठी चांगले नाही, याचा निषेध करायला हवा, अशा शब्दात ज्येष्ठ नाट्य अभ्यासक माधव वझे यांनी रंगभूमीवरील संपुष्टात आलेल्या राजकीय नाट्यावर भाष्य केले. स्वातंत्र्यपूर्वकाळात रंगभूमीवर आलेल्या राजकीय नाटकांवर वझे यांनी प्रकाश टाकला. स्वातंत्र्यपूर्वकाळात नाटक एकाच वेळी अनेक प्रेक्षकांना चेतवते याची जाणीव नाटककारांना होती. सुरूवातीच्या काळात नाटककार कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांची  किचकवध आणि  भाऊबंदकी ही नाटके गाजली. लॉर्ड कर्झन हा ब्रिटीश अधिकारी बंगालच्या फाळणीला जबाबदार होता. त्याला उददेशून हे नाटक लिहिले त्यावर ब्रिटीशांनी बंदी आणली होती.  भाऊबंदकीमध्ये रामशास्त्री राज्यकर्ते पेशव्यांना देहांत प्रायश्चित सुचवतात. ब्रिटीश राज्यकतर््यांना देहांत प्रायश्चितच हवे असा संदेश दिला गेला. हळूहळू भारताचे राजकारण बदलले. गांधींनी सूत्रे हाती घेतली. खाडिलकरांनी नव्या काळाला अनुसरून सत्वपरीक्षा हे नाटक लिहिले. बदलत्या राजकारणाची दखल त्यांनी घेतली. वीर वामनराव जोशी यांनी  रणदुमदुमी लिहिलेले नाटक प्रसिद्ध झाले. त्यातील  परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला असूनही हाच मालक घरचा म्हणती चोर त्याला असे ब्रिटीशांना उददेशून म्हटले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी  ह्यसन्यस्त खडगह्ण आणि  उत्तरक्रिया ही नाटके लिहिली. लेखणी मोडा आणि बंदूका हातात घ्या हे तत्व त्यांनी मांडले. माधवराव जोशी यांचे म्युनसिपाल्टी हे नाटक लिहिले. महापालिका, नगरपालिका अस्ताव्यस्ततेची आठवण होते, आजही हे नाटक कालसुसंगत आहे. स्थानिक पातळीवरील राजकारण शब्दबद्ध केले आहे. आचार्य अत्रे यांनी  मी उभा आहे आणि  मी मंत्री झालो ही नाटके लिहिली. वि. वा शिरवाडकर यांनी  मुख्यमंत्री हे गंभीर स्वरूपाचे नाटक लिहिल्याने ते फारसे चालले नाही. सहा ते सात नाटककरांनी रंगभूमी गाजवली. मात्र स्वातंत्र्यानंतर चित्रे बदलले. राजकारण मागे पडले आणि समाजकारण आले. माणसाचा शोध सुरू झाला. गिधाडे , सखाराम बाईंडरनाटके लिहिली. गो.पु देशपांडे यांनी नाटकात राजकारणाचा थेट संबंध आणला नाही. पण राजकीय तत्वाची मांडणी केली. स्वातंत्र्यानंतर राजकीय रंगभूमी पुन्हा सुरू करण्याचे श्रेय करण्याचे श्रेय गो.पु यांना जाते. महात्मा गांधी यांच्यावर चंद्रकांत कुलकर्णी यांनी नाटक आणले. पण राजकारणाशी थेट संबंध नव्हता. 

कालपरत्वे आधुनिक मराठी रंगभूमीवर राजकीय नाटक मागे पडले. खासगी सेन्सॉर बोर्ड स्थापन झाले. नथुराम गोडसे बोलतोय हे गांधीच्या तत्वाज्ञानाशी चिरफाड करणारे नाटक सेना आणि कॉंग्रेसने चालू दिले नाही. म्हणून राजकारणावर नाटक लिहायला नाटककार घाबरत आहेत. नाटक लिहिले तरी ते रंगमंचावर येणार नाही आले तरी लोक ते बंद पाडतील. पूर्वीच्या काळात लोक विरोध करीत होते  खळखट्याक सारख वातावरण नव्हते.मात्र, सध्या परिस्थिती बदलली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदीcow vigilantesगोरक्षकांचा हिंसाचारNote Banनोटाबंदी