शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

दूध उत्पादकांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 23:21 IST

दूध खरेदी दरवाढीची बैठक लांबणीवर : पुढच्या तारखेकडे शेतकऱ्यांचे लक्ष

बारामती : वाढती दुष्काळाची दाहकता दूध व्यवसायाच्या मुळावर आली आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये जनावरांची दूध उत्पादन क्षमता घटते; तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांना मागणीही वाढते. त्यामुळे दुधाचे खरेदी दरही वाढतात. दूध खरेदीदराबाबत खासगी, सहकारी संस्था व शासन प्रतिनिधींमध्ये होणारी बैठक काही कारणांमुळे लांबणीवर पडली. त्यामुळे दूध खरेदी दर वाढणार का? या चिंतेने दूध उत्पादकांचा जीव टांगणीला लागला आहे.

राज्य शासनाकडून मिळणारे दूध अनुदान मागील तीन महिन्यांपासून बंद आहे. ३ एप्रिलला दूधदराबाबत खासगी व सहकारी संस्थांची व राज्या शासन प्रतिनिधींची बैठक होणार होती, अशी माहिती एका खासगी दूध संस्थेच्या संचालकाने दिली. या बैठकीकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे डोळे लागले होते; मात्र काही कारणांनी ही बैठक झाली नाही. सध्या निवडणुकांच्या व्यस्त कार्यक्रमांमुळेया प्रश्नाकडे लक्ष द्यायला राज्य शासनास वेळ नसल्याचेही कारण पुढे केले जात आहे.

सध्या बारामती-इंदापूर तालुक्यातील दुग्धव्यावसायिकांना गाईच्या ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ गुणवत्तेच्या दुधाला २० रुपये दर मिळत आहे. सध्या उन्हाळ्याची दाहकता वाढली आहे. मागील वर्षी पावसाने ओढ दिल्याने बागायती भागदेखील चारा-पाण्यासाठी संघर्ष करताना दिसून येत आहे. त्यात ओल्या चाºयामध्ये येणाºया मका व कडवळाचे (ज्वारी) दर गगणाला भिडले आहेत.दूध विक्रीपासून काहीच नफा होत नसल्याने चारा खरेदी करणार कोठून, असाही प्रश्न दूध उत्पादक शेतकऱ्यांसमोर आहे. ओला मका १ हजार २०० रुपये प्रतिगुंठा दराने विक्री केला जात आहे. मागील वर्षी जिरायती भागामध्ये पावसाअभावी ज्वारीच्या पेरण्या अत्यल्प झाल्या होत्या; तसेच काही पिके नंतर पाण्याअभावी जळून गेली. त्यामुळे यंदाच्या वर्षी कडबा पाहायला देखील मिळत नसल्याचे चित्र आहे. तसेच, ५० किलो पशुखाद्याची एक गोणी १ हजार २०० रुपयांना मिळत आहे. सध्या दुधाला २० रुपये दर मिळत आहे. राज्य शासनाने याआधी प्रतिलिटर ५ रुपये त्यानंतर ३ रुपये असे अनुदान शेतकºयांना देण्याची घोषणाकेली होती. मात्र, मागील तीन महिन्यांपासून या अनुदानाची प्रतीक्षा शेतकºयांना आहे. शासनाकडून देण्याते येणारे ३ रुपये प्रतिलिटर

अनुदान जरी दूध उत्पादकाला मिळाले तरी दूध व्यवसायातील तोटा भरून निघत नसल्याचे वास्तव आहे. चाराटंचाई, पडलेले दुधाचे दर, वाढता दुष्काळ, घटलेले दूध उत्पादन यामुळे परिसरातील जनावरांच्या बाजारात देखील मंदी निर्माण झाली आहे. जनावरांच्या किमती ५० टक्क्यांनी घटल्या आहेत. त्यामुळे पशुपालक दुहेरी संकटात सापडला आहे.अर्थकारण कोलमडले...दिवसाकाठी सरासरी १८ लिटर दूध देणाºया एका विदेशी वंशाच्या गाईवर शेतकºयाला चारा, पशुखाद्य, औषधे, मजुरी व इतर खर्च धरता दिवसाला ३५० रुपये खर्च करावा लागतो. त्या गाईचे १८ लिटर दूधाची किंमत सध्याच्या दरानुसार फक्त ३६० रुपये इतकी होते. म्हणजे शेतकºयाच्या हातात एका गाईचे फक्त १० रुपये राहतात. दुष्काळी भागात तर शेतकºयाला फक्त शेणावरचभागवावे लागत असल्याचे वास्तव आहे.शासन प्रतिनिधींनी शेतकºयांच्या गोठ्यावर जाऊन दूधधंद्याच्या सद्य:स्थितीचा अभ्यास करावा. म्हणजे नेमकी परिस्थिती समोर येईल. दूध खरेदी दरामध्ये वाढ करताना ज्यावेळी चर्चा केली जाते. त्यावेळी दोन-चार दूध उत्पादक शेतकºयांना देखील बोलवावे. फक्त खासगी व सहकारी संस्था चालकांच्या सल्ल्याने दूध खरेदी दर ठरवला जाऊ नये.- तुकाराम देवकातेदूध उत्पादक शेतकरी, लासुर्णे, ता. इंदापूरदुष्काळामुळे यंदा पाण्याची कमतरता आहे. साहजिकच त्यामुळे उष्णताही वाढली आहे. या वातावरणात विदेशी वंशाच्या गाईंची जास्त ताकद शरीराची उष्णाता कमी करण्यासाठी जाते. त्यामुळे दूध उत्पादनात मोठी घट होते. त्यासाठी जनावरांना पुरेसा थंड निवारा व थंड पाणी, ओला चारा प्रमाणात दिल्यास दूध उत्पादन वाढवता येऊ शकते.- डॉ. रमेश ओव्हाळपशुसंवर्धन अधिकारी, बारामती तालुका

टॅग्स :Puneपुणे