शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

प्राधान्यक्रमासह हवा विकास आराखडा

By admin | Updated: December 23, 2016 00:27 IST

सर्वांगीण विकास साधत लोणावळा शहराला जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ बनविण्यासाठी शहरातील अनेक पायाभूत सुविधा व पर्यटन

लोणावळा : सर्वांगीण विकास साधत लोणावळा शहराला जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ बनविण्यासाठी शहरातील अनेक पायाभूत सुविधा व पर्यटन विकासाच्या धूळ खात पडलेल्या प्रकल्पांना गती देण्याची गरज आहे. हे महत्त्वाचे प्रकल्प विकास आराखडा तयार करीत क्रमवारीने पूर्ण केल्यास शहराचा चेहरामोहरा बदलू शकतो.हे सर्वच प्रकल्प जादूची कांडी फिरविल्यासारखे एका दिवसात पूर्ण होणार नाहीत. मात्र, त्यामध्ये विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरविल्यास कोणती कामे पहिल्या टप्प्यात करायची, कोणती दुसऱ्या टप्प्यात करायची याचे योग्य नियोजन झाल्यास ते मार्गी लागू शकतील. मूलभूत व पायाभूत समस्या सोडविण्याबरोबरच काही पर्यटन विकासाचे महत्त्वाचे प्रकल्पदेखील पंचवार्षिक काळात पूर्ण करता येऊ शकतात. याकरिता पाच वर्षांत कोणती कामे प्राधान्यक्रमाने करायची याचा विकास आराखडा लोणावळा नगर परिषदेने तयार करण्याची गरज आहे.शहरात वाहतूककोंडी व कचरा या दोन्ही समस्या जटिल आहेत. त्या दोन्ही कामांना प्राधन्य देण्याची गरज असून, वाहतूककोंडी सोडविण्यासाठी रस्ते रुंदीकरण, वाहनतळ, अतिक्रमण हटविणे, पर्यायी रस्ते खुले करणे यासोबत भांगरवाडी येथील उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर मार्गी लावणे गरजेचे आहे. कचरा समस्या सोडविण्यासाठी शहरातील कचराकुंड्यांमधील, तसेच घरोघरचा कचरा गोळा करून तो वरसोली येथील कचरा डेपोवर टाकण्याचे महत्त्वाचे काम विनाअडचण करणे गरजेचे आहे. इंद्रायणी नदी उगमस्थानाचे सुशोभीकरण करून पात्राची सुधारणा आवश्यक आहे. उद्यानांची दुरुस्ती करून त्यामध्ये लेजर शो, सायन्स पार्कची उभारणी करणे, भुयारी गटर योजना नव्याने राबवत बंद असलेले मलशुद्धीकरण केंद्र सुरू करणे, भाजी मार्केटची इमारत स्वबळावर उभी करत खाली दोन मजली पार्किंग उभारणे, नगर परिषद मिळकतींचा रखडलेला लीजचा प्रश्न, क्रीडास्कूल, कुणेनामा येथील रोप वेलगतच्या जागेवर बग्गी जम्पिंग साहसी खेळ प्रकार सुरू करणे, खंडाळा तलाव सुशोभीकरण व नौकाविहाराचे वर्षभरापासून अर्धवट राहिलेले काम पुन्हा सुरु करून ते पर्यटकांसाठी खुले करणे, २४ तास मुबलक व शुद्ध पिण्याचे पाणी देण्याच्या प्रकल्प कामास सुरुवात करून सध्या बंद असलेला जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करणे, वलवणमधील तलावाचे सुशोभीकरण करून नौकाविहार केंद्र सुरू करणे, तुंगार्ली धरणाचे मजबुतीकरण व सुशोभीकरण करणे, पर्यटन सहायता कक्ष उभारणे याचा प्राधान्यक्रम ठरवून तसा विकास आराखडा तयार करणे गरजेचे आहे. (वार्ताहर)