शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

पिंपरी महानगरपालिकेने शेजारधर्म पाळावा

By admin | Updated: July 17, 2015 03:48 IST

हरित न्यायालयाने इंद्रायणीत कचरा टाकण्यासाठी मनाई केल्यामुळे आळंदी नगर पालिकेचे कचरा कोंडी झाली आहे. आळंदीत दररोज निर्माण होणारा २० टन कचरा साठवायचा कुठे?

आळंदी : हरित न्यायालयाने इंद्रायणीत कचरा टाकण्यासाठी मनाई केल्यामुळे आळंदी नगर पालिकेचे कचरा कोंडी झाली आहे. आळंदीत दररोज निर्माण होणारा २० टन कचरा साठवायचा कुठे? या गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आज विशेष सभेचे आयोजन केले होते. यात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शेजारधर्म पाळावा असे आवाहन करीत कचऱ्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी नगरपालिका प्रशासनासह नगरसेवकांनी केली.नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा आयोजित केली होती. त्यांनी नकार दर्शविलाच तर वॉर्डातील कचरा वॉर्डातच साठवण्याची व विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया राबवून कंपोस्ट खतनिर्मिती करण्याचा एकमुखी निर्धार व्यक्त केला.इंद्रायणी नदीच्या पात्रात न टाकता दिलेल्या ठिकाणीच कचरा टाकावा, कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्प सुरू होईपर्यंत लगतच्या ग्रामपंचायत किंवा महापालिकेच्या कचरा डेपोत आळंदीतील कचरा टाकावा व त्याचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सात दिवसांत सादर करावे, असा राष्ट्रीय हरित न्यायालयाने न.प.ला आदेश दिल्यामुळे उपाययोजना करण्यासाठी ही बैैठक झाली. सभेत प्रत्येक वॉर्डनिहाय निर्माण होणारा कचरा वॉर्डातच विल्हेवाट लावावी, यासाठी प्रबोधन करून वॉर्डातच कंपोस्ट खत युनिट उभारून प्रक्रिया करणे, ओला व सुका कचरा वर्गीकरण करण्यात यावे, नागरिकांनी असा वर्गीकरण करून कचरा दिल्यास तो न. प.ने विकत घ्यावा किंवा नागरिकांना बक्षीस देण्यात यावे, युनिटी ग्रीन यांना शाळा क्र .४ व वॉटरहाऊसजवळ शेड तयार करून यंत्रसामग्री उभी करण्याबाबत सोय उपलब्ध करून द्यावी, शहरातील शाळांमधून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला घनकचरा व्यवस्थापनाचे धडे मिळावेत,यासाठी पणजी महापालिकेच्या धर्तीवर पासबुक योजना राबवावी, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी ओला व सुका कचरा वेगळा करून नगरपालिकेला आणून दिल्यास कचऱ्याच्या प्रमाणात विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस योजना राबवावी, नागरिकांकडून ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी शहरात ज्या मालमत्ताधारकांनी कर भरला आहे, अशा मालमत्ताधारकांना विघटित होणाऱ्या पिशव्यांचे मासिक स्तरावर वाटप करण्यात यावे, अशा सूचना मांडण्यात आल्या.यावर उपस्थित सर्व नगरसेवकांनी हा पर्याय स्वीकारत होकार दर्शविला आहे. मात्र, तत्पूर्वी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मार्गी लागेपर्यंत पिंपरी-चिंचवड पालिकेकडे याबाबतचा पाठपुरावा करण्याची व लगतच्या ग्रामपंचायतीकडे मागणी करण्याची गरज असल्याचे सांगितले व जर यात यश आले नाही, तर वॉर्डातील कचऱ्याची विल्हेवाट आम्ही सर्व आळंदीकरांमार्फत लावू, असे आश्वासन देत सर्वांनीच जबाबदारी स्वीकारली. (वार्ताहर)आळंदीतील कचऱ्याची समस्या भीषण असली, तरी सर्व नगरसेवक व जनतेच्या सहकार्याने हा प्रश्न निश्चितच सोडवण्यात आम्ही यशस्वी होऊ. पिंपरी-चिंचवड पालिकेकडे आमचा पाठपुरावा चालू आहे. त्यांची संमती मिळेल, अशी खात्री आहे.- रोहिदास तापकीर,नगराध्यक्षयापूर्वी पिंपरी-चिंचवडच्या डेपोतच ५० पैसे किलो दराने टाकला जायचा. आताही तशीच मागणी करण्यात आली आहे. प्रक्रिया करून विल्हेवाट लावणाऱ्यास बक्षीस योजना जाहीर केल्यास चांगला प्रतिसाद मिळेल.- अशोक कांबळे, नगरसेवक