शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
3
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
4
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
5
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
6
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
7
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
8
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
9
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
10
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
11
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
12
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
13
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
14
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
15
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
16
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
17
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
18
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
19
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी महानगरपालिकेने शेजारधर्म पाळावा

By admin | Updated: July 17, 2015 03:48 IST

हरित न्यायालयाने इंद्रायणीत कचरा टाकण्यासाठी मनाई केल्यामुळे आळंदी नगर पालिकेचे कचरा कोंडी झाली आहे. आळंदीत दररोज निर्माण होणारा २० टन कचरा साठवायचा कुठे?

आळंदी : हरित न्यायालयाने इंद्रायणीत कचरा टाकण्यासाठी मनाई केल्यामुळे आळंदी नगर पालिकेचे कचरा कोंडी झाली आहे. आळंदीत दररोज निर्माण होणारा २० टन कचरा साठवायचा कुठे? या गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आज विशेष सभेचे आयोजन केले होते. यात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शेजारधर्म पाळावा असे आवाहन करीत कचऱ्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी नगरपालिका प्रशासनासह नगरसेवकांनी केली.नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा आयोजित केली होती. त्यांनी नकार दर्शविलाच तर वॉर्डातील कचरा वॉर्डातच साठवण्याची व विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया राबवून कंपोस्ट खतनिर्मिती करण्याचा एकमुखी निर्धार व्यक्त केला.इंद्रायणी नदीच्या पात्रात न टाकता दिलेल्या ठिकाणीच कचरा टाकावा, कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्प सुरू होईपर्यंत लगतच्या ग्रामपंचायत किंवा महापालिकेच्या कचरा डेपोत आळंदीतील कचरा टाकावा व त्याचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सात दिवसांत सादर करावे, असा राष्ट्रीय हरित न्यायालयाने न.प.ला आदेश दिल्यामुळे उपाययोजना करण्यासाठी ही बैैठक झाली. सभेत प्रत्येक वॉर्डनिहाय निर्माण होणारा कचरा वॉर्डातच विल्हेवाट लावावी, यासाठी प्रबोधन करून वॉर्डातच कंपोस्ट खत युनिट उभारून प्रक्रिया करणे, ओला व सुका कचरा वर्गीकरण करण्यात यावे, नागरिकांनी असा वर्गीकरण करून कचरा दिल्यास तो न. प.ने विकत घ्यावा किंवा नागरिकांना बक्षीस देण्यात यावे, युनिटी ग्रीन यांना शाळा क्र .४ व वॉटरहाऊसजवळ शेड तयार करून यंत्रसामग्री उभी करण्याबाबत सोय उपलब्ध करून द्यावी, शहरातील शाळांमधून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला घनकचरा व्यवस्थापनाचे धडे मिळावेत,यासाठी पणजी महापालिकेच्या धर्तीवर पासबुक योजना राबवावी, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी ओला व सुका कचरा वेगळा करून नगरपालिकेला आणून दिल्यास कचऱ्याच्या प्रमाणात विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस योजना राबवावी, नागरिकांकडून ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी शहरात ज्या मालमत्ताधारकांनी कर भरला आहे, अशा मालमत्ताधारकांना विघटित होणाऱ्या पिशव्यांचे मासिक स्तरावर वाटप करण्यात यावे, अशा सूचना मांडण्यात आल्या.यावर उपस्थित सर्व नगरसेवकांनी हा पर्याय स्वीकारत होकार दर्शविला आहे. मात्र, तत्पूर्वी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मार्गी लागेपर्यंत पिंपरी-चिंचवड पालिकेकडे याबाबतचा पाठपुरावा करण्याची व लगतच्या ग्रामपंचायतीकडे मागणी करण्याची गरज असल्याचे सांगितले व जर यात यश आले नाही, तर वॉर्डातील कचऱ्याची विल्हेवाट आम्ही सर्व आळंदीकरांमार्फत लावू, असे आश्वासन देत सर्वांनीच जबाबदारी स्वीकारली. (वार्ताहर)आळंदीतील कचऱ्याची समस्या भीषण असली, तरी सर्व नगरसेवक व जनतेच्या सहकार्याने हा प्रश्न निश्चितच सोडवण्यात आम्ही यशस्वी होऊ. पिंपरी-चिंचवड पालिकेकडे आमचा पाठपुरावा चालू आहे. त्यांची संमती मिळेल, अशी खात्री आहे.- रोहिदास तापकीर,नगराध्यक्षयापूर्वी पिंपरी-चिंचवडच्या डेपोतच ५० पैसे किलो दराने टाकला जायचा. आताही तशीच मागणी करण्यात आली आहे. प्रक्रिया करून विल्हेवाट लावणाऱ्यास बक्षीस योजना जाहीर केल्यास चांगला प्रतिसाद मिळेल.- अशोक कांबळे, नगरसेवक