शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पेट्रोलियम कंपन्या करणार बायोगॅसचे उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 02:34 IST

कचऱ्यातून होणार इंधननिर्मिती; वर्षाला १५ दशलक्ष टन उत्पादनाचे उद्दिष्ट

पुणे : अपारंपरिक ऊर्जास्रोताचा वापर वाढावा यासाठी देशातील आॅईल कंपन्यांनी ‘सतत’ अभियान हाती घेतले असून, त्या अंतर्गत बायोगॅस निर्मितीला प्राधान्य देण्यात येणार आहे. देशात २०२३पर्यंत ५ हजार कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यातून वर्षाला १५ दशलक्ष टन जैव इंधनाच्या उत्पादनाचा संकल्प असल्याचे कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले.इंडियन आॅइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कार्पोरेशन आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन या कंपन्यांच्या वतीने वाहतुकीच्या शाश्वत पर्यायासाठी शनिवारी रॅली काढली. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे संचालक विजय शर्मा यांच्या हस्ते रॅलीला हिरवा कंदील दाखविण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात पर्यायी ऊर्जाचे कार्यकारी संचालक सुबोधकुमार, इंडियन फाउंडेशन फॉर ग्रीन एनर्जीचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, मुरली श्रीनिवासन आणि दिलीप पटनाईक या वेळी उपस्थित होते.‘सतत’या मोहिमेद्वारे शेतामध्ये उरलेल्या कच्च्या घटकांचा वापर, गायीचे शेण व नगरपालिकांच्या घनकचºयाचा वापर इंधननिर्मितीसाठी केला जाणार आहे. त्या माध्यमातून शेतकºयांना उत्पन्नाचे नवे साधन उपलब्ध होईल. ‘सतत’ अभियानांतर्गत, आॅइल मार्केटिंग कंपन्या आॅटोमोटिव्ह क्षेत्रासाठी आवश्यक इंधन देण्याची क्षमता बाळगणाºया उद्योजकांकडून कॉम्पे्रस्ड बायोगॅस (जैविक इंधन) उपलब्ध करून देण्याबाबतचा त्यांचा कल जाणून घेतला जाईल. अर्ज करण्यासाठी ओएमसीजीच्या संकेतस्थळाला मार्च २०१९ पर्यंत भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.वाहतूक क्षेत्रात सीबीजीचा (कॉम्प्रेस्ड बायोगॅस) वापर केल्यास, त्याचा कचरा व्यवस्थापनाला उपयोग होईल. तसेच, त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी येईल. देशात असणाºया सर्व साधनांचा सीबीजी निर्मितीसाठी वापर करण्यात आपण यशस्वी झालो तर, वर्षाला आपल्याला ६२ दशलक्ष टनांपर्यंत सीबीजी उपलब्ध होईल. त्यातून देशातील गॅस मागणीला सर्वोत्तम पर्याय उपलब्ध होईल. त्या माध्यमातून इंधनावरील परदेशी अवलंबित्वदेखील कमी होईल.- विजय शर्मा, नैसर्गिक वायू मंत्रालयाचे संचालक

टॅग्स :Puneपुणे