शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

पेट्रोलियम कंपन्या करणार बायोगॅसचे उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 02:34 IST

कचऱ्यातून होणार इंधननिर्मिती; वर्षाला १५ दशलक्ष टन उत्पादनाचे उद्दिष्ट

पुणे : अपारंपरिक ऊर्जास्रोताचा वापर वाढावा यासाठी देशातील आॅईल कंपन्यांनी ‘सतत’ अभियान हाती घेतले असून, त्या अंतर्गत बायोगॅस निर्मितीला प्राधान्य देण्यात येणार आहे. देशात २०२३पर्यंत ५ हजार कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यातून वर्षाला १५ दशलक्ष टन जैव इंधनाच्या उत्पादनाचा संकल्प असल्याचे कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले.इंडियन आॅइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कार्पोरेशन आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन या कंपन्यांच्या वतीने वाहतुकीच्या शाश्वत पर्यायासाठी शनिवारी रॅली काढली. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे संचालक विजय शर्मा यांच्या हस्ते रॅलीला हिरवा कंदील दाखविण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात पर्यायी ऊर्जाचे कार्यकारी संचालक सुबोधकुमार, इंडियन फाउंडेशन फॉर ग्रीन एनर्जीचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, मुरली श्रीनिवासन आणि दिलीप पटनाईक या वेळी उपस्थित होते.‘सतत’या मोहिमेद्वारे शेतामध्ये उरलेल्या कच्च्या घटकांचा वापर, गायीचे शेण व नगरपालिकांच्या घनकचºयाचा वापर इंधननिर्मितीसाठी केला जाणार आहे. त्या माध्यमातून शेतकºयांना उत्पन्नाचे नवे साधन उपलब्ध होईल. ‘सतत’ अभियानांतर्गत, आॅइल मार्केटिंग कंपन्या आॅटोमोटिव्ह क्षेत्रासाठी आवश्यक इंधन देण्याची क्षमता बाळगणाºया उद्योजकांकडून कॉम्पे्रस्ड बायोगॅस (जैविक इंधन) उपलब्ध करून देण्याबाबतचा त्यांचा कल जाणून घेतला जाईल. अर्ज करण्यासाठी ओएमसीजीच्या संकेतस्थळाला मार्च २०१९ पर्यंत भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.वाहतूक क्षेत्रात सीबीजीचा (कॉम्प्रेस्ड बायोगॅस) वापर केल्यास, त्याचा कचरा व्यवस्थापनाला उपयोग होईल. तसेच, त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी येईल. देशात असणाºया सर्व साधनांचा सीबीजी निर्मितीसाठी वापर करण्यात आपण यशस्वी झालो तर, वर्षाला आपल्याला ६२ दशलक्ष टनांपर्यंत सीबीजी उपलब्ध होईल. त्यातून देशातील गॅस मागणीला सर्वोत्तम पर्याय उपलब्ध होईल. त्या माध्यमातून इंधनावरील परदेशी अवलंबित्वदेखील कमी होईल.- विजय शर्मा, नैसर्गिक वायू मंत्रालयाचे संचालक

टॅग्स :Puneपुणे