शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

पेट्रोलियम कंपन्या पिताहेत नफा; घटलेल्या दराचा फायदा ग्राहकांना देण्यात केंद्र सरकार अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 14:24 IST

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड आॅईलचे प्रति बॅरल भाव अगदी ३० डॉलरच्या घरात गेले होते. सध्या देखील त्याचे भाव ५७ डॉलरच्या आसपासच फिरत आहेत. मात्र, घटलेल्या या दराचा फायदा ग्राहकांना देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे.

ठळक मुद्देसर्व नफा या सरकारी पेट्रोलियम कंपन्यांच्या घशात जात असल्याचे वास्तवइंडियन आॅईल कंपनीचा नफा अवघ्या तीन वर्षांत ५ हजार कोटींवरुन २० हजार कोटींच्या घरात

विशाल शिर्के पुणे : आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड आॅईलचे प्रति बॅरल भाव अगदी ३० डॉलरच्या घरात गेले होते. सध्या देखील त्याचे भाव ५७ डॉलरच्या आसपासच फिरत आहेत. मात्र, घटलेल्या या दराचा फायदा ग्राहकांना देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या माध्यमातून मिळणारा हा सर्व नफा या सरकारी पेट्रोलियम कंपन्यांच्या घशात जात असल्याचे वास्तव आहे. इंडियन आॅईल कंपनीचा नफा अवघ्या तीन वर्षांत ५ हजार कोटींवरुन २० हजार कोटींच्या घरात गेला आहे.   देशात सर्वप्रकारच्या वाहनांची संख्या सुमारे २५ कोटींच्यावर आहे. तसेच उद्योगांची देखील दररोज कोट्यवधी लिटर्सची मागणी असते. त्यामुळे इंधनाचे भाव नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय राहीला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील पेट्रोलचे भाव वाढल्यास त्याचे तत्काळ परिणाम स्थानिक बाजारावर दिसून येतात. तेथे भाव वाढ झाली की, स्थानिक बाजारातील भाव वाढतात, असे व्यवहारीक कारण केंद्र सरकारकडून सांगितले जात होते. काही वर्षांपूर्वी अगदी १४७ डॉलर्स प्रतिबॅरलपर्यंत क्रूड आॅईलचा भाव गेला होता. त्यावेळी अर्थातच दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर २०१३मध्ये ९५ डॉलर प्रतिबॅरल क्रूड आॅईलचा भाव होता. तसेच २०१४ मध्ये ८८, २०१५मध्ये ४२, २०१६मध्ये ३० ते ५२ डॉलरदरम्यान भाव राहीले आहेत. इतके भाव कमी होऊन देखील सरकार पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यात हात आखडा घेत आहे. आंतरराष्ट्रीय दर शंभर डॉलर प्रतिबॅरल गेल्यानंतरही ८० रुपये प्रतिलिटर असणारे पेट्रोल आजही ७७ ते ८० रुपये प्रतिलिटर दरानेच मिळत आहे.   इंडियन आॅईल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन या मोठ्या आॅईल कंपन्यांच्या माध्यमातून देशभरात इंधनाचा पुरवठा करण्यात येतो. या तीनही कंपन्यांची २०१४ मध्ये ८ लाख ८० हजार ६७५ कोटी रुपयांची उलाढाल होती. ती २०१५-१६ मध्ये ७ लाख १७ हजार ६९१ कोटी रुपये झाली. तर २०१६-१७मध्ये ही उलाढाल ८ लाख ९४ हजार ४० कोटींवर पोहोचली. या काळातील कर भरणा केल्यानंतरचा या कंपन्यांचा नफा पाहिल्यास त्यात तीन वर्षांत अडीच पट वाढ झाल्याचे दिसून येते. या तिनही कंपन्यांचा मिळून २०१४-१५ साली १३ हजार ९१ कोटींचा नफाचा होता. तो २०१५-१६मध्ये २१ हजार ६९४ आणि २०१६-१७मध्ये ३३ हजार ३५४ कोटींवर गेला. उलाढाल साधारण तितकीच नफा मात्र शतप्रतिशत वाढल्याचे दिसून येत आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल सारडा यांना पेट्रोलियम मंत्रालयाने माहिती अधिकारात ही माहिती दिली आहे. 

आॅईल कंपन्यांची उलाढाल (रक्कम कोटी रुपयांत)कंपन्या                                         २०१४-१५    २०१५-१६    २०१६-१७इंडियन आॅईल कर्पोरेशन               ४,३६,३९०    ३,४९,३२१    ४,३८,६९२हिंदुस्थान पेट्रोलिय कॉर्पोरेशन       २,०६,३८०    १,७९,२८१    २,१३,४८९भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन          २,३७,९०५    १,८९,०९८    २,४१,८५९

करभरणा केल्यानंतरचा नफा (रक्कम कोटी रुपयांत)कंपन्या                                          २०१४-१५    २०१५-१६    २०१६-१७इंडियन आॅईल कर्पोरेशन                ५,२३७        १०,३९९        १९,१०६हिंदुस्थान पेट्रोलिय कॉर्पोरेशन        २,७३३        ३,८६३          ६,२०९भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन            ५,०८५        ७,४३२          ८,०३९

आॅईल कंपन्यांची उलाढाल अर्थसंकल्पाच्या ४० टक्के देशातील तीनही आॅईल कंपन्यांची २०१६-१७मधील उलाढाल ८ लाख ९४ हजार कोटी रुपये इतकी होती. फेब्रुवारी २०१७मध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेला अर्थसंकल्प २१.४७ लाख कोटी रुपयांचा होता. त्याच्याशी तुलना केल्यास आॅईल कंपन्यांची उलाढाल ही अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाच्या ४१ टक्के इतकी होते. 

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकार