शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 02:38 IST

राज्यात खरीप पिकांची १३२.८५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून भात, मूग, उडीद, सोयाबीन, कापूस आदी पिकांवर कीड व रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

पुणे : राज्यात खरीप पिकांची १३२.८५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून भात, मूग, उडीद, सोयाबीन, कापूस आदी पिकांवर कीड व रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यात महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडून औषधांचा पुरवठा संथ गतीने होत असून, महामंडळाकडील प्रोफेनोफॉस या औषधाच्या तांत्रिक घटकाचा साठा संपला आहे. मात्र, कृषी विद्यापीठांनी शिफारस केल्यानुसार शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या कीटनाशकांसाठी ५० टक्के अनुदान दिले जात आहे, असे कृषी विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.कृषी विभागातर्फे राज्याचा खरीप हंगामाचा १६ आॅगस्टपर्यंतचा पीकपेरणी अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात राज्याच्या सर्व जिल्ह्यांतील पिकांवर पडलेल्या रोड व किडीचा आढावा घेण्यात आला आहे. त्यानुसार, भातपिकावर खोडकिडा, पाने खाणारी अळी व गोदमाशी या किडीचा; तर करपा, कडाकरपा व तांबेरा या रोगांचा अल्प प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आला आहे. मूग व उडीद पिकांवर मावा या किडीचा, सोयाबीन पिकावर पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, चक्री भुंगा व उंट अळीचा अल्प प्रमाणात प्रादुर्भाव अढळून आला. कापूस पिकावर मावा, तुडतुडे, शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव आहे. कृषी विद्यापीठाकडून या सप्ताहात पीक संरक्षणाच्या दृष्टीने कापूस, सोयाबीन व भातपिकासाठी सल्ले दिले आहेत. तसेच, कीडरोग व्यवस्थापनासाठी राज्यातील शेतकºयांना १८ लाख ९८ हजार एसएमएस पाठविले आहेत. गुलाबी बोंडअळीचे पतंग पकडण्यासाठी राज्यातएकूण २०४ गावांमध्ये क्षेत्रीय प्रात्यक्षिकांचे आयोजन केले जात आहे. तसेच, बोंडअळी नियंत्रण व कीटकनाशकांसाठी ८०२.५० लाख रुपये निधीची तरतूद केली असून कीड व्यवस्थापनासाठी अतिरिक्त १६.९७ कोटींचा निधी शासनाकडून उपलब्ध होईल, असे कृषी अहवालात आहे.गुलाबी बोंडअळीमुळे नुकसानराज्यात कापूस पिकाखालील २६ जिल्ह्यांत एकूण २० हजार १६० गावांमध्ये पेरणी झाली असून, त्यात आॅगस्ट महिन्याच्या तिसºया आठवड्यात ५ हजार ७६४ गावांमध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानाच्या पातळीच्यावर दिसून आला.तसेच, कापूस पिकावरील कीड व रोगांच्या नियंत्रणाकरिता एकूण १ लाख ९ हजार ६४४ लिटर औषधांची महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडे मागणी नोंदविण्यात आली आहे. मात्र, औषधांचा पुरवठा संथ गतीने होत आहे.किडींचा धोकापुणे विभागात भात,बाजरी पिके फुटवे फुटण्याच्या अवस्थेत, मका, सूर्यफूल, सोयाबीन व भुईमूग पिके वाढीच्या अवस्थेत; तर मूगपीक फुलोरा ते दाणे भरण्याच्या व उडीदपीक वाढीच्या ते फुलोरा या अवस्थेत आहे.विभागात काही ठिकाणी मूग व उडीद पिकांवर मावा किडीचा, सोयाबीन पिकावर पाने खाणारी अळी, चक्री भुंगा व मावा किडीचा तर कापूस पिकावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीcottonकापूस