शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
3
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
4
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
5
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
6
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
7
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
8
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
9
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
10
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
11
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
12
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
13
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
14
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
15
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
16
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
17
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
18
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
19
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
20
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

सायबर हल्ल्यातील प्रोव्हीजनची परवानगी द्यावी : कॉसमॉस बँकेची रिझर्व्ह बँकेकडे मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 19:30 IST

कॉसमॉस बँकेवर गेल्यावर्षी ११ ते १३ ऑगस्ट दरम्यान आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या सायबर हल्ल्यामध्ये कोट्यवधींची रक्कम लुटून नेली होती.

ठळक मुद्दे हॉंगकॉंग येथील हेनसेंग बँकेतील खात्यात यातील रक्कमेचा मोठा भाग जमा ती रक्कम मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारचे मदत करण्याचे आश्वासन

- विशाल शिर्के - पुणे : सायबर दरोड्यातील ९४ कोटी ४२ लाख रुपयांची समान भागात पुढील तीन आर्थिक वर्षांतील ताळेबंदामध्ये प्रोव्हीजन करण्याची  परवानगी द्यावी अशी मागणी कॉसमॉस बँकेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे (आरबीआय) केली आहे. त्यामुळे बँकेच्या नफ्यात एकदम मोठी घट होणार नाही. तसेच, बँकेच्या सभासदांना देण्यात येणाºया लाभांशामध्ये देखील फारशी घट होणार नाही. कॉसमॉस बँकेवर गेल्यावर्षी ११ ते १३ ऑगस्ट दरम्यान आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या सायबर हल्ल्यामध्ये कोट्यवधींची रक्कम लुटून नेली होती. या प्रकरणी पोलिसांनी देशातील काही आरोपींना देखील अटक केली आहे. मात्र, लुटीतील रक्कमेपैकी जवळपास ९२ कोटी रुपये देशाबाहेर गेले आहेत. त्यातील १३.९२ कोटी रुपये स्विफ्ट व्यवहाराद्वारे गेले आहेत. हॉंगकॉंग येथील हेनसेंग बँकेतील खात्यात यातील रक्कमेचा मोठा भाग जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे. हॉंगकॉंगमधील बँकेच्या खात्यात जमा झालेली रक्कम बँकेला मिळवून देण्याचे आश्वासन परराष्ट्र राज्य मंत्री व्ही. के. सिंग यांनी बुधवारी बँकेच्या संचालकमंडळाला दिले आहे. दरम्यान, बँकेवर हल्ला झाल्यानंतर बँकेच्या अनेक ग्राहकांच्या खात्यातील रक्कम काढल्या गेली. त्याचा फटका बँकेने ग्राहकांना बसू दिला नाही. संपूर्ण दरोड्यातील तोटा बँकेने स्वत:च्या ताळेबंदात जमा केला आहे. मात्र, बँकेच्या ताळेबंदावर याचा भार पडल्यास बँकेच्या सभासदांना या आर्थिक वर्षांत लाभांश न मिळण्याचा अथवा अल्प प्रमाणात मिळण्याची शक्यता आहे. कारण, सायबर हल्ल्यातील रक्कम बँकेच्या नफ्यातून वजा होईल. तर, नफा कमी झाल्यास लाभांश देखील त्या प्रमाणात घटेल. या बाबत माहिती देताना कॉसमॉस को ऑपरेटीव्ह बँक समुहाचे अध्यक्ष मुकुंद अभ्यंकर म्हणाले, परदेशात गेलेल्या रक्कमेपैकी एक मोठा भाग हॉंगकॉंगमधील बँकेच्या खात्यात आहे. ती रक्कम मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. सायबर हल्ल्यात गेलेल्या रक्कमेपैकी एकही पैसा बँकेला परत मिळालेला नाही. त्यामुळे ही रक्कम बँकेच्या नफ्यातून कमी होईल. मात्र, या वर्षीच्या ताळेबंदामध्ये या मोठ्या रक्कमेचा भार पडू नये यासाठी येत्या तीन आथिक वर्षांच्या ताळेबंदामध्ये प्रोव्हीजन करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी आरबीआयकडे केली आहे. बँकेवर अशा पद्धतीने सायबर हल्ला होण्याची ही अपवादात्मक घटना आहे. त्याचा विचार करुन ताळेबंदात तरतूद करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसे झाल्यास संबंधित रक्कम तीन हप्त्यात विभागली जाईल. त्यामुळे बँकेच्या नफ्यात एकदम घट दिसणार नाही. बँकेच्या सभासदांना त्या प्रमाणात अधिक लाभांश देता येईल. 

टॅग्स :Puneपुणेbankबँकcyber crimeसायबर क्राइम