शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

'जनतेला त्रास होयला नको...' पुण्यातील चांदणी चौकातल्या वाहतुक कोंडीबाबत मुख्यमंत्र्यांचे आदेश

By नितीश गोवंडे | Updated: August 28, 2022 18:30 IST

येत्या १५ सप्टेंबर नंतर नागरिकांची या वाहतुक कोंडीतून मुक्तता होईल

पुणे : चांदणी चौकातील वाहतुक कोंडीची समस्या मुख्यमंत्र्यांनी चांगलीच मनावर घेतल्याचे दिसून येत आहे. रविवारी साताऱ्याहून मुंबईकडे मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना त्यांनी चांदणी चौकात थांबून नेमकी वाहतुक कोंडी कशामुळे होते याची कारणे समजून घेत, प्रशासकीय अधिकाऱ्यांना लवकरात लवकर यातून नागरिकांची मुक्तता करा, शासन जनतेसाठी आहे, त्यांना त्रास व्हायला नको असे आदेश दिले. येत्या १५ सप्टेंबर नंतर नागरिकांची या वाहतुक कोंडीतून मुक्तता होईल ही आशा नव्याने पल्लवीत झाली आहे.

शुक्रवारी (२६ ऑगस्ट) रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा मुंबईहून साताऱ्याकडे जात असताना चांदणी चौकात नागरिकांनी अडवला होता. दररोज संध्याकाळी या चौकात होणारी वाहतुक कोंडी, त्यामुळे घरी जाण्यासाठी होणारा उशीर यामुळे वैतागलेल्या पुणेकरांनी हा मार्ग निवडला होता. या वेळी मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना पाहणी करून अहवाल सादर करण्याचे फोनद्वारे आदेश दिले होते. त्यानुसार शनिवारी अधिकाऱ्यांनी पाहणी देखील केली रविवारी (२८ ऑगस्ट) मुख्यमंत्री साताऱ्याहून मुंबईला जात असताना त्यांनी चांदणी चौकात थांबत वाहतुक कोंडीची कारणे लक्षात घेत, या परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करून जनतेला दिलासा द्या, असे आदेश त्यांनी दिले. तसेच वाहतुकीचे नियोजन करताना जनतेला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. वाहतूक नियोजनासाठी तातडीने अतिरिक्त वाहतूक मार्शल नेमण्यात यावे. चौकातील पूल पाडल्यानंतर सर्व्हिस रोड तातडीने तयार करावा. गर्दीच्या वेळी शहरात येणाऱ्या जड वाहनांची वाहतूक योग्यरितीने नियंत्रित करावी. वाहतूक नियोजनाच्यादृष्टीने आवश्यक कामे युद्धपातळीवर करावी अशा सूचना त्यांनी दिल्या.

या वेळी मुख्यमंत्र्यांनी शहरातील रिंग रोडच्या नियोजनाविषयी देखील माहिती घेतली. लवकरच याबाबत बैठक घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले. महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे, एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम यांची चांदणी चौकात उपस्थिती होती.

- १२ ते १५ सप्टेंबर दरम्यान चांदणी चौकातून पुल पाडणार.- पूल पाडल्यानंतर लगेचच मुंबई-बेंगलौर हायवेवरील दोन लेन वाढवणार.- नव्या पुलाच्या बांधकामाला देखील लगेचच सुरूवात होणार.- वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी सहा लेनची तरतूद.- यामुळे मुंबई-बेंगलौर हायवेवरील भार कमी होऊन, नागरिकांची वाहतुक कोंडीतून मुक्तता होणार.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेPoliticsराजकारणchandni-chowk-pcचांदनी चौकroad safetyरस्ते सुरक्षाTrafficवाहतूक कोंडी