शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

'जनतेला त्रास होयला नको...' पुण्यातील चांदणी चौकातल्या वाहतुक कोंडीबाबत मुख्यमंत्र्यांचे आदेश

By नितीश गोवंडे | Updated: August 28, 2022 18:30 IST

येत्या १५ सप्टेंबर नंतर नागरिकांची या वाहतुक कोंडीतून मुक्तता होईल

पुणे : चांदणी चौकातील वाहतुक कोंडीची समस्या मुख्यमंत्र्यांनी चांगलीच मनावर घेतल्याचे दिसून येत आहे. रविवारी साताऱ्याहून मुंबईकडे मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना त्यांनी चांदणी चौकात थांबून नेमकी वाहतुक कोंडी कशामुळे होते याची कारणे समजून घेत, प्रशासकीय अधिकाऱ्यांना लवकरात लवकर यातून नागरिकांची मुक्तता करा, शासन जनतेसाठी आहे, त्यांना त्रास व्हायला नको असे आदेश दिले. येत्या १५ सप्टेंबर नंतर नागरिकांची या वाहतुक कोंडीतून मुक्तता होईल ही आशा नव्याने पल्लवीत झाली आहे.

शुक्रवारी (२६ ऑगस्ट) रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा मुंबईहून साताऱ्याकडे जात असताना चांदणी चौकात नागरिकांनी अडवला होता. दररोज संध्याकाळी या चौकात होणारी वाहतुक कोंडी, त्यामुळे घरी जाण्यासाठी होणारा उशीर यामुळे वैतागलेल्या पुणेकरांनी हा मार्ग निवडला होता. या वेळी मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना पाहणी करून अहवाल सादर करण्याचे फोनद्वारे आदेश दिले होते. त्यानुसार शनिवारी अधिकाऱ्यांनी पाहणी देखील केली रविवारी (२८ ऑगस्ट) मुख्यमंत्री साताऱ्याहून मुंबईला जात असताना त्यांनी चांदणी चौकात थांबत वाहतुक कोंडीची कारणे लक्षात घेत, या परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करून जनतेला दिलासा द्या, असे आदेश त्यांनी दिले. तसेच वाहतुकीचे नियोजन करताना जनतेला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. वाहतूक नियोजनासाठी तातडीने अतिरिक्त वाहतूक मार्शल नेमण्यात यावे. चौकातील पूल पाडल्यानंतर सर्व्हिस रोड तातडीने तयार करावा. गर्दीच्या वेळी शहरात येणाऱ्या जड वाहनांची वाहतूक योग्यरितीने नियंत्रित करावी. वाहतूक नियोजनाच्यादृष्टीने आवश्यक कामे युद्धपातळीवर करावी अशा सूचना त्यांनी दिल्या.

या वेळी मुख्यमंत्र्यांनी शहरातील रिंग रोडच्या नियोजनाविषयी देखील माहिती घेतली. लवकरच याबाबत बैठक घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले. महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे, एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम यांची चांदणी चौकात उपस्थिती होती.

- १२ ते १५ सप्टेंबर दरम्यान चांदणी चौकातून पुल पाडणार.- पूल पाडल्यानंतर लगेचच मुंबई-बेंगलौर हायवेवरील दोन लेन वाढवणार.- नव्या पुलाच्या बांधकामाला देखील लगेचच सुरूवात होणार.- वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी सहा लेनची तरतूद.- यामुळे मुंबई-बेंगलौर हायवेवरील भार कमी होऊन, नागरिकांची वाहतुक कोंडीतून मुक्तता होणार.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेPoliticsराजकारणchandni-chowk-pcचांदनी चौकroad safetyरस्ते सुरक्षाTrafficवाहतूक कोंडी