शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

'जनतेला त्रास होयला नको...' पुण्यातील चांदणी चौकातल्या वाहतुक कोंडीबाबत मुख्यमंत्र्यांचे आदेश

By नितीश गोवंडे | Updated: August 28, 2022 18:30 IST

येत्या १५ सप्टेंबर नंतर नागरिकांची या वाहतुक कोंडीतून मुक्तता होईल

पुणे : चांदणी चौकातील वाहतुक कोंडीची समस्या मुख्यमंत्र्यांनी चांगलीच मनावर घेतल्याचे दिसून येत आहे. रविवारी साताऱ्याहून मुंबईकडे मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना त्यांनी चांदणी चौकात थांबून नेमकी वाहतुक कोंडी कशामुळे होते याची कारणे समजून घेत, प्रशासकीय अधिकाऱ्यांना लवकरात लवकर यातून नागरिकांची मुक्तता करा, शासन जनतेसाठी आहे, त्यांना त्रास व्हायला नको असे आदेश दिले. येत्या १५ सप्टेंबर नंतर नागरिकांची या वाहतुक कोंडीतून मुक्तता होईल ही आशा नव्याने पल्लवीत झाली आहे.

शुक्रवारी (२६ ऑगस्ट) रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा मुंबईहून साताऱ्याकडे जात असताना चांदणी चौकात नागरिकांनी अडवला होता. दररोज संध्याकाळी या चौकात होणारी वाहतुक कोंडी, त्यामुळे घरी जाण्यासाठी होणारा उशीर यामुळे वैतागलेल्या पुणेकरांनी हा मार्ग निवडला होता. या वेळी मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना पाहणी करून अहवाल सादर करण्याचे फोनद्वारे आदेश दिले होते. त्यानुसार शनिवारी अधिकाऱ्यांनी पाहणी देखील केली रविवारी (२८ ऑगस्ट) मुख्यमंत्री साताऱ्याहून मुंबईला जात असताना त्यांनी चांदणी चौकात थांबत वाहतुक कोंडीची कारणे लक्षात घेत, या परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करून जनतेला दिलासा द्या, असे आदेश त्यांनी दिले. तसेच वाहतुकीचे नियोजन करताना जनतेला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. वाहतूक नियोजनासाठी तातडीने अतिरिक्त वाहतूक मार्शल नेमण्यात यावे. चौकातील पूल पाडल्यानंतर सर्व्हिस रोड तातडीने तयार करावा. गर्दीच्या वेळी शहरात येणाऱ्या जड वाहनांची वाहतूक योग्यरितीने नियंत्रित करावी. वाहतूक नियोजनाच्यादृष्टीने आवश्यक कामे युद्धपातळीवर करावी अशा सूचना त्यांनी दिल्या.

या वेळी मुख्यमंत्र्यांनी शहरातील रिंग रोडच्या नियोजनाविषयी देखील माहिती घेतली. लवकरच याबाबत बैठक घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले. महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे, एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम यांची चांदणी चौकात उपस्थिती होती.

- १२ ते १५ सप्टेंबर दरम्यान चांदणी चौकातून पुल पाडणार.- पूल पाडल्यानंतर लगेचच मुंबई-बेंगलौर हायवेवरील दोन लेन वाढवणार.- नव्या पुलाच्या बांधकामाला देखील लगेचच सुरूवात होणार.- वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी सहा लेनची तरतूद.- यामुळे मुंबई-बेंगलौर हायवेवरील भार कमी होऊन, नागरिकांची वाहतुक कोंडीतून मुक्तता होणार.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेPoliticsराजकारणchandni-chowk-pcचांदनी चौकroad safetyरस्ते सुरक्षाTrafficवाहतूक कोंडी