शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
2
दिल्ली ब्लास्ट: जहाल भाषणे, बाँब बनवण्याचे धडे... अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फोनमध्ये काय काय सापडले?
3
अनिल अंबानींच्या कंपन्यांच्या शेअर्सची बिकट स्थिती, ६०% पेक्षा अधिक आपटले; तुमच्याकडे आहेत का?
4
मुंबई महानगरपालिकेत भाजपा मुसंडी मारणार? १००हून अधिक जागा जिंकणार, अंतर्गत सर्व्हेतून दावा
5
IND vs SA 2nd Test : MS धोनीच्या एलिट क्लबमध्ये सामील होणार रिषभ पंत! जाणून घ्या त्याचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड!
6
पगार मिळताच अकाउंट होते खाली? '५०-३०-२०' नियमाचा वापर करून ६ महिन्यांत फरक पाहा
7
"मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही, आमचा निर्णय..."; नेते संदीप देशपांडेंनी मांडली स्पष्ट भूमिका
8
नोटांचे बंडल, सोन्याचे दागिने...; बंगाल, झारखंडमध्ये कोळसा व्यापाऱ्यांच्या घरांवर ईडीचे छापे
9
"सुनील तटकरे लवकरच भाजपमध्ये जातील, हे त्रिवार सत्य आहे", एकनाथ शिंदेंच्या नेत्याचा खळबळजनक दावा
10
खेडमध्ये वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा; पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आली वेळ, काय घडलं?
11
"देवाच्या कृपेने वाचलो...", बिग बॉस विजेत्या शिव ठाकरेच्या घरी लागलेल्या आगीत ट्रॉफीही जळाल्या
12
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
13
Spiritual: आयुष्याच्या अखेरीस प्रत्येकाची पडते शनी महाराजांशी गाठ; मार्गशीर्षात करा 'हे' बदल!
14
अल फलाह विद्यापीठाचे पुढे काय होणार? डॉक्टरकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला!
15
जपानवर मोठे आर्थिक संकट? ३० वर्षांचा 'येन कॅरी ट्रेड' मोडीत; जागतिक बाजारात मोठा उलटाफेर होण्याची भीती!
16
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
17
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
18
पाकिस्तानमध्ये मध्यरात्री भूकंपाचे हादरे; ५.२ तीव्रतेचा धक्का, डोंगराळ भागात केंद्रबिंदू
19
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
20
"अरे ऐक ना जरा हसतोस का...", मराठी गाण्यावर विद्या बालनने बनवला रील, मिथिला पालकरला टॅग करत म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

'जनतेला त्रास होयला नको...' पुण्यातील चांदणी चौकातल्या वाहतुक कोंडीबाबत मुख्यमंत्र्यांचे आदेश

By नितीश गोवंडे | Updated: August 28, 2022 18:30 IST

येत्या १५ सप्टेंबर नंतर नागरिकांची या वाहतुक कोंडीतून मुक्तता होईल

पुणे : चांदणी चौकातील वाहतुक कोंडीची समस्या मुख्यमंत्र्यांनी चांगलीच मनावर घेतल्याचे दिसून येत आहे. रविवारी साताऱ्याहून मुंबईकडे मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना त्यांनी चांदणी चौकात थांबून नेमकी वाहतुक कोंडी कशामुळे होते याची कारणे समजून घेत, प्रशासकीय अधिकाऱ्यांना लवकरात लवकर यातून नागरिकांची मुक्तता करा, शासन जनतेसाठी आहे, त्यांना त्रास व्हायला नको असे आदेश दिले. येत्या १५ सप्टेंबर नंतर नागरिकांची या वाहतुक कोंडीतून मुक्तता होईल ही आशा नव्याने पल्लवीत झाली आहे.

शुक्रवारी (२६ ऑगस्ट) रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा मुंबईहून साताऱ्याकडे जात असताना चांदणी चौकात नागरिकांनी अडवला होता. दररोज संध्याकाळी या चौकात होणारी वाहतुक कोंडी, त्यामुळे घरी जाण्यासाठी होणारा उशीर यामुळे वैतागलेल्या पुणेकरांनी हा मार्ग निवडला होता. या वेळी मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना पाहणी करून अहवाल सादर करण्याचे फोनद्वारे आदेश दिले होते. त्यानुसार शनिवारी अधिकाऱ्यांनी पाहणी देखील केली रविवारी (२८ ऑगस्ट) मुख्यमंत्री साताऱ्याहून मुंबईला जात असताना त्यांनी चांदणी चौकात थांबत वाहतुक कोंडीची कारणे लक्षात घेत, या परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करून जनतेला दिलासा द्या, असे आदेश त्यांनी दिले. तसेच वाहतुकीचे नियोजन करताना जनतेला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. वाहतूक नियोजनासाठी तातडीने अतिरिक्त वाहतूक मार्शल नेमण्यात यावे. चौकातील पूल पाडल्यानंतर सर्व्हिस रोड तातडीने तयार करावा. गर्दीच्या वेळी शहरात येणाऱ्या जड वाहनांची वाहतूक योग्यरितीने नियंत्रित करावी. वाहतूक नियोजनाच्यादृष्टीने आवश्यक कामे युद्धपातळीवर करावी अशा सूचना त्यांनी दिल्या.

या वेळी मुख्यमंत्र्यांनी शहरातील रिंग रोडच्या नियोजनाविषयी देखील माहिती घेतली. लवकरच याबाबत बैठक घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले. महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे, एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम यांची चांदणी चौकात उपस्थिती होती.

- १२ ते १५ सप्टेंबर दरम्यान चांदणी चौकातून पुल पाडणार.- पूल पाडल्यानंतर लगेचच मुंबई-बेंगलौर हायवेवरील दोन लेन वाढवणार.- नव्या पुलाच्या बांधकामाला देखील लगेचच सुरूवात होणार.- वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी सहा लेनची तरतूद.- यामुळे मुंबई-बेंगलौर हायवेवरील भार कमी होऊन, नागरिकांची वाहतुक कोंडीतून मुक्तता होणार.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेPoliticsराजकारणchandni-chowk-pcचांदनी चौकroad safetyरस्ते सुरक्षाTrafficवाहतूक कोंडी