शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

नागरिकांनीही विकासामध्ये योगदान द्यावे- गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 3:17 AM

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन

पुणे : प्रजासत्ताक दिन हा लोकशाहीचा उत्सव असून विविध प्रयत्नांमुळे लोकशाही अधिकाधिक मजबूत होत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने नागरिक व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध लोकोपयोगी योजना राबविल्या जात आहेत. त्याचा लाभ घेऊन शासनाबरोबर नागरिकांनीही राज्याच्या विकासामध्ये योगदान द्यावे, असे आवाहन अन्न व नागरीपुरवठामंत्री तथा पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज येथे केले.प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदनावर आयोजित ध्वजवंदन समारंभानंतर बापट बोलत होते. कार्यक्रमास पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, आमदार मेधा कुलकर्णी, आमदार नीलम गोºहे, आमदार माधुरी मिसाळ, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, यशदाचे महासंचालक आनंद लिमये, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, पोलीस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील आदी उपस्थित होते.बापट म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान, स्वस्त धान्य दुकानांतून धान्य वितरणासाठी ई-पॉस मशिनचा वापर झाल्यामुळे गरिबांना योग्य प्रमाणात आणि वेळेवर धान्य मिळत असून त्यामुळे केरोसीनची बचत झाली आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेद्वारे महिलांना गॅस जोडणी मिळाल्यामुळे महिलांचे जीवन सुखकर झाले असून मोठ्या संख्येने नागरिकांनी गॅसवरील सबसिडी सोडून दिली आहे. मागेल त्याला शेततळे, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनांच्या अंमलबजावणीमुळे शेतकºयांना फायदा झाला आहे.पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाºयांना जाहीर करण्यात आलेली पदके आणि अन्य पारितोषिके पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते वितरीत करण्यात आली. या वेळी पोलीस दल, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दल, एनसीसी व अग्निशमन दलाने संचलन करुन पालकमंत्र्यांना मानवंदना दिली. तसेच विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.जिल्हाधिकाºयांच्या हस्ते शनिवारवाड्यावर ध्वजवंदनजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शनिवारवाड्यावर ध्वजवंदन केले. या वेळी अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, भाऊसाहेब गलांडे, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, उत्तम पाटील, रामदास जगताप आदी अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. या वेळी उपायुक्त संजयसिंह चव्हाण, उत्तम चव्हाण यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे लघु उद्योगांना कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. शहराच्या सभोवताली असलेल्या भागाचा पीएमआरडीएतर्फे करण्यात येत असलेल्या विकास कामांमुळे आणि हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पामुळे सभोवतालच्या परिसराचा विकास होणार असून हा भाग इकोनॉमिकल कॉरिडॉर म्हणून ओळखला जाईल, असे प्रतिपादन बापट यांनी केले. तसेच २६ जानेवारी ते १0 फेब्रुवारीपर्यंत लोकशाही पंधरवाडा साजरा केला जात असून मतदारांनी सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन बापट यांनी या वेळी केले.

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनgirish bapatगिरीष बापट