शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
2
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
3
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
4
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
5
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
6
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
7
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
8
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
9
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
10
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
11
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
12
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
13
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
14
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
15
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
16
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
17
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
18
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
19
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
20
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

स्मार्ट सिटीच्या कामांमध्ये नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा : डॉ. राजेंद्र जगताप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 19:18 IST

पुणे स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत बीजगोळे (सीडबॉल) निर्मिती उपक्रम राबवण्यात आला. 

ठळक मुद्देचिंच, बहावा, आपटा, कांचन, खैर, तामण, बाभूळ, आवळा, पारिजातक, बकुळ अशा स्थानिक झाडांच्याच बिया नुसत्या बिया टाकल्यास त्याला कीड, बुरशी

पुणे : बीजगोळे निर्मिती करून पर्यावरणाला हातभार लावतानाच हा उपक्रम राबविताना नागरिकांच्या दारी स्मार्ट सिटीचे काम पोचवून आणि त्यांच्या समस्या, सूचना जाणून उपाययोजना करण्यासाठी त्या विचारात घेतल्या जातील. अशा प्रकारे आम्ही स्मार्ट सिटीच्या विकासकामांमध्ये नागरिकांना सहभागी करून घेत आहोत, असे मत पुणे स्मार्ट सिटी मिशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी व्यक्त केले.पुणे स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत सोसायटी फॉर सायन्स एन्व्हायर्न्मेंट अँड पीपल (सेप) आणि भवताल मॅगझीन यांच्या वतीने बाणेर, औंध, बालेवाडी परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये बीजगोळे (सीडबॉल) निर्मिती उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व सहभागी झाले होते. बालेवाडी येथील कम्फर्ट झोन सोसायटीमध्ये या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून पुणे स्मार्ट सिटी मिशनमध्ये थेट नागरिकांचा सहभाग वाढवता येणार आहे. तसेच तयार झालेले बीजगोळे त्या-त्या भागात झाडे लावण्यासाठी उपयोगात आणले जाणार आहेत. पुणे स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत बाणेर, औंध, बालेवाडी या भागात विविध योजना राबवण्यात येत आहे. त्यात आता या हरित उपक्रमाची भर पडणार आहे, असेही डॉ. जगताप यांनी सांगितले. यावेळी कम्फर्ट झोन सोसायटीच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आबालवृद्धांनी या उपक्रमात सहभागी होत बीजगोळे तयार केले. सीईओ डॉ. राजेंद्र जगताप यांनी नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. येथील स्थानिक विकास प्रकल्पांबाबत नागरिकांना त्यांनी माहिती दिली. स्मार्ट सिटीच्या वतीने नजीकच्या काळात होणाऱ्या विकासकामांबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी नगरसेविका स्वप्नांली सायकर, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, अनिल गायकवाड आदी उपस्थित होते. ......................निसर्ग संवर्धनाचा संस्कार बीजगोळे करताना मातीत, शेणात हात घालावा लागतो. बी हाताळावी लागते. त्यामुळे निसर्गाशी, पर्यावरणाशी जवळीक निर्माण होते. झाडाशी एक प्रकारचे नाते निर्माण होते. यातून सर्वांवरच संस्कार संवर्धनाचा घडतो. विशेषत: मुलांमध्ये याचा अधिक फायदा पाहायला मिळतो. त्याशिवाय गटामध्ये हा उपक्रम राबवला तर सांघिक भावना जोपासली जाते. ..........................बीजगोळे म्हणजे काय? बीजगोळे म्हणजे सुकलेले शेण व माती यांचा चिखल करून त्यामध्ये बी टाकायचे. त्याचा गोळा करून तो सुकवायचा आणि पावसाळ्यात तो निसर्गात टाकायचा. बीजगोळे तयार करण्यासाठी चिंच, बहावा, आपटा, कांचन, खैर, तामण, बाभूळ, आवळा, पारिजातक, बकुळ अशा स्थानिक झाडांच्याच बिया वापरल्या जातात. ...................बीजगोळ्याचे फायदे नुसत्या बिया टाकल्यास त्याला कीड, बुरशी लागू शकते. तसेच त्या पावसाच्या पाण्यासोबत वाहून जाण्याची शक्यता असते. याशिवाय किडे, मुंग्या बिया खाऊ शकतात. त्यामुळे बिया रुजण्याची शक्यता कमी होते. बीजगोळ्यांमुळे बी रुजण्याची प्रमाण वाढते. कारण, मातीमुळे बी संरक्षित होते. तसेच शेणामुळे पोषक घटकही मिळतात. बीजगोळे तयार करण्यासाठी विशेष वेगळी साधने लागत नाहीत. ही पद्धत अगदीच सोपी आणि आनंद देणारीसुद्धा आहे. 

टॅग्स :Puneपुणे