शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

लोकमान्य टिळकांच्या कामाला कोणाची पावती नकोय; खापर पणतू स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 21:51 IST

समाधीसाठी लोकमान्यांनी काय केलं ते सर्वांना माहित्येय; टीकाकारांना कुणाल टिळकांचं उत्तर

पुणे: लोकमान्य टिळक यांच्या कामाला कोणाचीच पावती नको. कोणी ती द्यायचा प्रयत्नही करू नये. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी टिळकांच्या हृयातीत बांधली गेली नसेल. मात्र समाधी व्हावी यासाठी त्यांनी कायकाय केले ते मराठी जनतेला आजही चांगलेच माहिती आहे, अशा शब्दात लोकमान्यांचे खापर पणतू कुणाल टिळक यांनी समाधीवरून सुरू असलेल्या राजकारणाला उत्तर दिले.औरंगाबादच्या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगडावरील समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली असे वक्तव्य केले. त्यावर रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीबाबत लोकमान्य टिळकांचा काहीही संबध नाही, तसेच त्यासाठी निधी जमा करून टिळकांनी त्याचा वापरच केला नाही अशी टीका समाजमाध्यमांमधून होते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही त्यावर टिळकविरोधी भाष्य केले.कुणाल टिळक लोकमान्य टिळकांचे खापण पणतू आहेत. आमदार मुक्ता टिळक यांचे ते पुत्र असून भारतीय जनता युवा मोर्चाचे पुणे शहर उपाध्यक्ष आहेत. ते म्हणाले, भाजपाचा म्हणून नाही तर टिळक कुटुंबाचा एक घटक म्हणून मी याचा प्रतिवाद करतो. टीका करणाऱ्यांनी आधी इतिहासाचे वाचन करणाऱ्याला प्राधान्य द्यावे. लोकमान्य टिळकांनीच समाधीसाठी प्रयत्न केले. त्यासाठी निधी जमा केला. काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांनीच सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना छत्रपती शिवाजी महाराज हे कसे स्वातंत्ऱ्यांची प्रेरणा आहेत याबद्दल सांगितले. शिवजयंतीला सार्वजनिक स्वरूप दिले ते लोकमान्यांनीच. या सर्वच गोष्टींना पुरावे आहे व टीका करणाऱ्यांनी त्याचा अभ्यास करावा व मगच बोलावे.लोकमान्य टिळकांच्या कामाला कोणाच्या पावतीची गरज नाही, मराठी माणसांच्या मनात टिळकांना कायमच आदराचे स्थान आहे, ते तसेच राहिल, कोणाच्या टिकेने त्याला काहीही धक्का लागणार नाही असे कुणाल म्हणाले.

टॅग्स :Lokmanya Tilakलोकमान्य टिळक