शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

लोकमान्य टिळकांच्या कामाला कोणाची पावती नकोय; खापर पणतू स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 21:51 IST

समाधीसाठी लोकमान्यांनी काय केलं ते सर्वांना माहित्येय; टीकाकारांना कुणाल टिळकांचं उत्तर

पुणे: लोकमान्य टिळक यांच्या कामाला कोणाचीच पावती नको. कोणी ती द्यायचा प्रयत्नही करू नये. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी टिळकांच्या हृयातीत बांधली गेली नसेल. मात्र समाधी व्हावी यासाठी त्यांनी कायकाय केले ते मराठी जनतेला आजही चांगलेच माहिती आहे, अशा शब्दात लोकमान्यांचे खापर पणतू कुणाल टिळक यांनी समाधीवरून सुरू असलेल्या राजकारणाला उत्तर दिले.औरंगाबादच्या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगडावरील समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली असे वक्तव्य केले. त्यावर रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीबाबत लोकमान्य टिळकांचा काहीही संबध नाही, तसेच त्यासाठी निधी जमा करून टिळकांनी त्याचा वापरच केला नाही अशी टीका समाजमाध्यमांमधून होते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही त्यावर टिळकविरोधी भाष्य केले.कुणाल टिळक लोकमान्य टिळकांचे खापण पणतू आहेत. आमदार मुक्ता टिळक यांचे ते पुत्र असून भारतीय जनता युवा मोर्चाचे पुणे शहर उपाध्यक्ष आहेत. ते म्हणाले, भाजपाचा म्हणून नाही तर टिळक कुटुंबाचा एक घटक म्हणून मी याचा प्रतिवाद करतो. टीका करणाऱ्यांनी आधी इतिहासाचे वाचन करणाऱ्याला प्राधान्य द्यावे. लोकमान्य टिळकांनीच समाधीसाठी प्रयत्न केले. त्यासाठी निधी जमा केला. काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांनीच सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना छत्रपती शिवाजी महाराज हे कसे स्वातंत्ऱ्यांची प्रेरणा आहेत याबद्दल सांगितले. शिवजयंतीला सार्वजनिक स्वरूप दिले ते लोकमान्यांनीच. या सर्वच गोष्टींना पुरावे आहे व टीका करणाऱ्यांनी त्याचा अभ्यास करावा व मगच बोलावे.लोकमान्य टिळकांच्या कामाला कोणाच्या पावतीची गरज नाही, मराठी माणसांच्या मनात टिळकांना कायमच आदराचे स्थान आहे, ते तसेच राहिल, कोणाच्या टिकेने त्याला काहीही धक्का लागणार नाही असे कुणाल म्हणाले.

टॅग्स :Lokmanya Tilakलोकमान्य टिळक